हवाई : एक धगधगता ज्वालामुखी!

    15-Jun-2020   
Total Views | 65

hawaii_1  H x W

 
 
 

निसर्गसंपन्न असलेल्या जगप्रसिद्ध हवाई बेटांवरील जैवविविधतेचा ज्वालामुखी धगधगू लागला आहे. रासायनिक कीटकनाशके या बेटाला कशा पद्धतीने पोखरत आहेत, त्याविषयी आढावा घेणार हा लेख..



हवाई ! उत्तर-प्रशांत महासागरात, आशिया आणि अमेरिका खंडांच्या बरोबर मध्यभागी असलेली बेटांची रांग. जगाच्या नकाशावर दृष्टीसही पडणार नाहीत एवढी छोटीशी ही बेटं. अमेरिकेच्या पूर्व किनार्‍यापासून सुमारे चार हजार किलोमीटर दूर असूनसुद्धा अमेरिकेचाच भाग असलेली ही बेटं कधीकाळी ज्वालामुखीतून निर्माण झाली. आजही तिथे सतत ज्वालामुखीचे उद्रेक होत असतात. हवाई, काऊई, मॉलकाई, माऊई, ओआहू, लनाई, निहाऊ आणि काकोलाव्ही ही आठ मुख्य बेटं आणि इतर शेकडो लहान-लहान बेटांच्या समूहाला एकत्रितपणे ‘हवाई बेटं’ म्हणतात. अमेरिकेच्या संयुक्त संस्थानातले पन्नासावे राज्य म्हणून ही बेटं ओळखली जातात. ‘पॉलिनीशियन’ हे इथले मूळ रहिवासी. मात्र, १८४० मध्ये अमेरिकेने केलेल्या कायद्याने या बेटावरचे बहुसंख्य मूळ रहिवासी भूमिहीन झाले. एकोणिसाव्या शतकाच्या उत्तरार्धात चीन, जपान, पोर्तुगाल, फिलिपिन्स, कोरिया इ. देशांतून इथे मजूर आणले गेले आणि या बेटांवर मिश्र समाजजीवन तयार झाले. निसर्गसौंदर्याच्या बाबतीत ही हवाई बेटं म्हणजे जणू पृथ्वीवरचा स्वर्गच!

वनस्पती-प्राण्यांच्या सुमारे २५ हजार प्रजाती या बेटांवर आढळतात. वनस्पतींच्या १३०० प्रदेशनिष्ठ प्रजातींची नोंद इथे झाली आहे. त्यामुळे जैवविविधतेच्या आणि उत्क्रांतिशास्त्राच्या अभ्यासकांना हवाई बेटं म्हणजे खजिनाच आहे. पर्वतरांगा, धबधबे, बराचसा भूभाग ज्वालामुखीच्या उद्रेकातून तयार झालेला असल्यामुळे इथली जमीन अत्यंत सुपीक! ऊस आणि अननसाच्या लागवडीसाठी ही हवाई बेटं पूर्वापार प्रसिद्ध होती. शेती हा जरी अर्थव्यवस्थेचा मुख्य घटक असला, तरी गेल्या काही वर्षांत पर्यटन उद्योग हा हवाई बेटांच्या अर्थव्यवस्थेचा मुख्य आधारस्तंभ झाला आहे. पण आज या स्वर्गीय भूमीचे वाळवंट होईल की काय अशी भीती निर्माण झाली आहे. इथल्या लोभसवाण्या निसर्गाला वाचवण्यासाठी गेल्या काही वर्षांपासून हवाई बेटांवरती जनआंदोलने आणि चळवळी होऊ लागल्या आहेत.

 

 
 
असा नेमका कसला धोका या बेटांना असावा? तो धोका आहे इथली जमीन विषारी होण्याचा! कृषी-जैवतंत्रज्ञान (असीेलहशाळलरश्र) कंपन्यांनी हवाई बेटं ही जनुकीय सुधारित बियाण्याच्या चाचणीसाठी निवडली आणि या बेटांचे रुपडे पालटायला सुरुवात झाली. ‘मोन्सॅन्टो’, ‘सिंजेंटा’, ‘हाय-ब्रेड’, ‘बीएएसएफ’, ’मायकोजेन सीड्स’, आणि ‘अ‍ॅग्रीजेनेटिक्स’ या बलाढ्य जैवतंत्रज्ञान कंपन्यांनी हवाई बेटांना आपल्या तंत्रज्ञानाच्या परीक्षणाचे केंद्र बनवले. निसर्गात ढवळाढवळ करण्याच्या अशा प्रयोगांचे काही भीषण परिणाम होऊ नयेत म्हणून असे प्रयोग एकाकी जागेत करावे लागतात. म्हणून जनुकीय तंत्रज्ञानाच्या चाचणीसाठी जगाचाच एक भाग असलेल्या, परंतु जगापासून फार दूर असलेल्या या बेटांची निवड केली गेली. साधारणपणे १९९० नंतर या कंपन्यांनी हळूहळू तिथे पाय रोवायला सुरुवात केली. पूर्वी छोट्या छोट्या शेतकर्‍यांकडून या बेटांवर शेती व्हायची. या बड्या कंपन्यांनी काही कालावधीतच छोट्या शेतकर्‍यांकडून जमिनी भाड्याने घेतल्या. हवाई बेटांवरचा बहुतांश भूप्रदेश कंपन्यांच्या अधिपत्याखाली आला. काऊई, मॉलकाई, माऊई आणि ओआहू या चार बेटांवरची सुमारे २५ हजार एकर जमीन कंपन्यांनी स्वतःच्या ताब्यात घेतली. त्याचा पहिला परिणाम म्हणजे इथली पारंपरिक पिकं बंद झाली. ‘सेंटर फॉर फूड सेफ्टी’ या संस्थेच्या आकडेवारीनुसार १९८० पासून हवाई बेटांवरचे पारंपरिक फळं आणि भाज्यांच्या पिकांखालचे क्षेत्र निम्म्यापेक्षा कमी झाले आहे.
 
 

एकेकाळी अन्नधान्याच्या बाबतीत स्वयंपूर्ण असणार्‍या हवाई बेटांना आज ९० टक्के अन्न आयात करावे लागते. कंपन्यांनी शोधलेल्या जनुकीय सुधारित पपई, सोयाबीन, कापूस यांची प्रायोगिक लागवड इथे सुरु झाली. आज जनुकीय तंत्रज्ञानाच्या चाचण्या घेण्याचे हवाई हे जगातले सर्वांत मोठे केंद्र बनले आहे. ‘जनुकीय तंत्रज्ञानाच्या प्रयोगांची राजधानी’ असे आज हवाई बेटांचे वर्णन केले जाते. १९८७ पासून आत्तापर्यंत हवाईमधल्या सुमारे साडेतीन हजार ठिकाणी या चाचण्या घेण्यात आलेल्या आहेत. या पिकांबरोबरच आवश्यक असलेल्या रसायनांचीही फवारणी कंपन्यांकडून होऊ लागली. ‘क्लोरोपायरीफॉस’, ’अ‍ॅट्राझीन’, ’ग्लायफोसेट’, ’डीकंबा’, ’पॅराक्वाट’ अशा जालीम रसायनांची फवारणी कीटकनाशक म्हणून वा तणनाशक म्हणून कंपन्यांकडून होऊ लागली. ही रसायने किती प्रमाणात वापरावी यावर काहीही निर्बंध नव्हता. अमेरिकेच्याच ‘सेंटर फॉर फूड सेफ्टी’ या राष्ट्रीय संस्थेने केलेल्या अभ्यासानुसार कंपन्यांकडून ९० प्रकारच्या रसायनांचा वापर हा ठरवून दिलेल्या मर्यादेपेक्षा १७ पटींनी जास्त होता. हवाई बेटांवरचे हवामान अत्यंत अनुकूल असल्यामुळे वर्षाचे बाराही महिने तिथे पिकं घेता येतात. हंगामी पिकं वर्षातून दोन-तीनदा एकाच जमिनीत घेतली जातात. त्यामुळे ३६५ दिवसांपैकी सुमारे ३०० दिवस या शेतांवर सतत रसायनांची फवारणी होते. अमेरिका आणि युरोपियन युनियनने बंदी घातलेले ‘क्लोरोपायरीफॉस’ रसायन हवाई बेटांवर चाचण्यांसाठी मात्र सर्रास वापरले जाते. काऊई बेटावरच्या स्थानिक प्रशासनाने केलेल्या एका अभ्यासात २०१३ ते २०१५ या दोन वर्षांच्या काळात १८ टन एवढा ‘मर्यादित वापरायोग्य कीटकनाशकांचा’ वापर कंपन्यांकडून झाला होता.

 
 
 

‘पृथ्वीवरचा स्वर्ग’ असे आत्तापर्यंत ज्यांचे वर्णन केले जात होते, त्या हवाई बेटांवरचे निसर्गसौंदर्य झपाट्याने या जैव-रसायन कंपन्यांच्या भक्षस्थानी पडत आहे. अमेरिकेतल्या एकूण जैववैविध्यांपैकी एक तृतीयांश जैववैविध्य हे हवाई बेटांवर आढळते. मात्र, आज अमेरिकेत होणार्‍या जैववैविध्याच्या र्‍हासापैकी ७५ टक्के र्‍हास हा हवाई बेटांवरच होतो आहे. या बेटांवरच्या वनस्पती-प्राण्यांच्या एकूण ४३७ प्रजातींचे अस्तित्व धोक्यात आले आहे. ‘अ‍ॅट्राझीन’, ’क्लोरोपायरीफॉस’ या महाघातक रसायनांचे अंश पिण्याच्या पाण्यात आणि हवेत मोठ्या प्रमाणावर आढळून आले आहेत. विकृतावस्थतेच जन्माला येणार्‍या मुलांचे प्रमाण वाढले आहे. या विकृतींचा थेट संबंध रसायनांच्या संपर्काशी असल्याचे इथल्या डॉक्टरांनी आणि वैद्यकीय संशोधकांनी सिद्ध केले आहे.

 
 

गेली सुमारे दहा वर्षं हवाई बेटांवरील स्वर्गीय निसर्गाची वाट लावणाऱ्या कंपन्यांविरोधात जनमानसात एक ज्वालामुखी धगधगतो आहे. लोक एकत्र येत आहेत, आंदोलने करत आहेत, त्याला काही प्रमाणात यशही येत आहे. कंपन्या कोणकोणत्या रसायनांचा वापर करतात त्याची माहिती स्थानिक लोकांना देणे बंधनकारक नव्हते, ते २०१४ च्या एका कायद्याने बंधनकारक करण्यात आले. २०१८ साली हवाई बेटांवर ’क्लोरोपायरीफॉस’युक्त सर्व रसायनांवर बंदी घालण्याचे विधेयक अमेरिकन सिनेटमध्ये पास करण्यात आले. इथल्या जनआंदोलनांचे नेतृत्व करणारी पर्यावरण कार्यकर्ती आणि ’हवाई सीड्स’ संस्थेची संस्थापक जेरी डि पिएत्रो म्हणते, संघर्ष उभा राहिला नसता, तर आज हवाई बेटांवर जे काही निसर्गसौंदर्य आणि जैवविविधता टिकून आहे तेही राहिले नसते. आम्हाला आमच्या मुलांचे भविष्य धोक्यात घालायचे नाही. अमेरिकन शासन कंपन्यांचे हितसंबंध जपत असल्याने लोकचळवळींना पर्याय नाही. रसायनांच्या लाटेने ही सुंदर बेटं गिळंकृत होऊ नयेत यासाठी आम्ही शेवटच्या श्वासापर्यंत संघर्ष करत राहू!

 

हर्षद तुळपुळे

मूळचा अणसुरे,जि. रत्नागिरी रहिवासी. रत्नागिरीच्या गोगटे-जोगळेकर महाविद्यालयात चौदावीपर्यंत शिक्षण, मुंबईच्या साठ्ये महाविद्यालयातून बी.ए. (अर्थशास्त्र) पदवी संपादन. शेती, पर्यावरण विषयांची विशेष आवड. सध्या दै. मुंबई तरुण भारत मध्ये उपसंपादक म्हणून कार्यरत.

अग्रलेख
जरुर वाचा
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ज्येष्ठ स्वयंसेवक सुनील खेडकर यांचे निधन

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ज्येष्ठ स्वयंसेवक सुनील खेडकर यांचे निधन

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ज्येष्ठ स्वयंसेवक सुनील खेडकर ( वय ६४ वर्ष) यांचे पुणे येथे निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन विवाहित मुली, जावई असा परिवार आहे. सुनील खेडकर यांनी पुणे महानगराचे बौद्धिक प्रमुख, पुणे महानगर प्रचार प्रमुख, महाराष्ट्र एज्युकेशन संस्थेचे नियामक मंडळ सदस्य, भारतीय विचार साधनाचे सहकार्यवाह, मुंबई येथील सांताक्रूझ भाग सहकार्यवाह, संभाजी भागाचे बौद्धिक प्रमुख या व अशा विविध जबाबदारी सांभाळल्या. शीख संप्रदायाचा त्यांचा विशेष अभ्यास होता. ते मूळचे मुंबई चे होते. मागील तीस वर्ष पुण्यात..

मुंबईतील शिक्षण विभाग वाऱ्यावर कार्यालयातील अर्ध्याहून अधिक जागा रिक्त शाळा संस्थाचालक मुख्याध्यापक शिक्षक शिक्षकेतरांचे प्रश्न प्रलंबित तातडीने रिक्त जागा न भरल्यास आंदोलन - अनिल बोरनारे

मुंबईतील शिक्षण विभाग वाऱ्यावर कार्यालयातील अर्ध्याहून अधिक जागा रिक्त शाळा संस्थाचालक मुख्याध्यापक शिक्षक शिक्षकेतरांचे प्रश्न प्रलंबित तातडीने रिक्त जागा न भरल्यास आंदोलन - अनिल बोरनारे

मुंबईतील शिक्षण निरीक्षक उत्तर पश्चिम व दक्षिण विभाग कार्यालयामध्ये महत्त्वाच्या समजल्या जाणाऱ्या शिक्षण उपनिरीक्षक, सहाय्यक शिक्षण उपनिरीक्षक, अधीक्षक यांच्यासह वरिष्ठ लिपिक, कनिष्ठ लिपिक, समादेशक तसेच शिपायांच्या अर्ध्याहून अधिक जागा रिक्त असल्याने मुंबईतील संस्थाचालक मुख्याध्यापक शिक्षक व विद्यार्थ्यांचे अनेक प्रश्न तसेच शासकीय योजनांचा बोजवारा उडाल्याने या जागा तातडीने भरण्यात याव्या अशी मागणी भाजपा प्रदेश कार्यकारणी निमंत्रित सदस्य व मुंबई मुख्याध्यापक संघटना उत्तर विभागाचे अध्यक्ष अनिल बोरनारे यांनी ..

स्वरसामर्थ्याचे प्रतीक म्हणजे पद्मजा!: भावगंधर्व पंडित ह्रदयनाथ मंगेशकर -  मान्यवरांच्या उपस्थितीत

स्वरसामर्थ्याचे प्रतीक म्हणजे पद्मजा!: भावगंधर्व पंडित ह्रदयनाथ मंगेशकर -  मान्यवरांच्या उपस्थितीत ' स्वर चंद्रिका - एक सांगितिक प्रवास ' या गौरवग्रंथाचे प्रकाशन

"पद्मजाचा सांगितीक प्रवास सांगणारा ग्रंथ आज इथे प्रकाशित होतो आहे, याचा मला आनंद आहे. शास्त्रीय संगीत, भावसंगीताच्या माध्यमातून तिने आपली साधना निरंतर सुरु ठेवली. खरं सांगायचं तर पद्मजाचं गाणं म्हणजे स्वरसाम्यर्थ्याचं प्रतीक आहे" असे प्रतिपादन पद्मश्री पंडित ह्रदयनाथ मंगेशकर यांनी केले. 'स्वरचंद्रीका : एक सांगितिक प्रवास' या पुस्तक प्रकाशनाच्या कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी आपले मनोगत व्यक्त करताना ते म्हणाले की " रुढार्थाने सिनेगीतांच्या वाटेवर न चालता पद्मजाने भावगीतांच्या माध्यमातून स्वताची वेगळी ..

शिवरायांच्या जागतिक दुर्गगौरावचा आम्हाला अभिमान! गिर्यारोहक, इतिहास अभ्यासकांनी व्यक्त केला आनंद.

शिवरायांच्या जागतिक दुर्गगौरावचा आम्हाला अभिमान! गिर्यारोहक, इतिहास अभ्यासकांनी व्यक्त केला आनंद.

छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनकाळाचा ऐतिहासीक ठसा उमटलेल्या महाराष्ट्रातील ११ आणि तामिळनाडू येथील १ अशा १२ किल्ल्यांचा युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळांच्या यादीमध्ये समावेश झाला. जागतिक वारसा स्थळ समितीचे ४७ वे अधिवेशन दि. ६ जुलै रोजी पॅरीस येथे सुरु झाले असून ते १६ जुलै पर्यंत चालणार आहे. या अधिवेशनातंर्गत विविध देशातीरल एकूण ३२ ठिकाणांचे मूल्यांकण व तपासणी केली जाणार आहेत. या मूल्यांकणाची प्रक्रिया शुक्रवारी सुरु झाली असून, २०२४-२५ या कालावधीसाठी भारताकडून मराठा साम्रज्याच्या साम्यर्थ्याचे प्रतिक असणाऱ्..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121