विद्यार्थिनीवरील अत्याचार पूर्वनियोजित, कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरणी एसआयटीचा खुलासा!

    01-Jul-2025   
Total Views | 17

कोलकाता : (Kolkata) कोलकात्यातील लॉ कॉलेजमधील विद्यार्थिनीवरील सामूहिक बलात्काराच्या आरोपाखाली अटक केलेल्या चारपैकी तीन आरोपींनी हल्ल्याची पूर्वनियोजित योजना आखली होती, असे पीटीआयने एका पोलिस अधिकाऱ्याच्या हवाल्याने सांगितले. दरम्यान, या प्रकरणी तातडीने न्यायालयीन हस्तक्षेप आणि सीबीआय चौकशीची मागणी करणारी जनहित याचिका सर्वोच्च न्यायालयाच्या वकिलाने दाखल केली आहे.

दरम्यान एसआयटीकडून या प्रकरणाची तपास सुरु आहे. आरोपी मनोजित मिश्रा, प्रमित मुखर्जी आणि जैद अहमद या तिघांवर यापूर्वी महाविद्यालयातील अनेक विद्यार्थिनींचा लैंगिक छळ केल्याचे नऊ सदस्यांच्या विशेष तपास पथकाच्या (एसआयटी) अधिकाऱ्यांना आढळून आले आहे. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, तिन्ही आरोपींनी त्यांच्याकडील मोबाइलमध्ये अत्याचाराचे चित्रीकरण केले होते. नंतर ते त्या विद्यार्थिनींना त्रास देण्यासाठी या चित्रीकरणाचा वापर करायचे. एसआयटीच्या तपासात ही घटना पूर्वनियोजित असल्याचे उघड झाले आहे. "हे संपूर्ण प्रकरण पूर्वनियोजित होते. पीडितेवर हा अत्याचार करण्यासाठी हे तिन्ही आरोपी अनेक दिवसांपासून कट रचत होते. मुख्य आरोपी पीडितेला महाविद्यालयात प्रवेश मिळाल्याच्या पहिल्या दिवसापासूनच तिला त्रास देत होता", असे अधिकाऱ्यांनी सांगितले.

अत्याचार प्रकरणातील मुख्य आरोपी मोनोजित मिश्रा हा एक गुन्हेगार आहे आणि त्याच्याविरुद्ध लैंगिक छळ आणि हिंसक गुन्ह्यांचे अनेक खटले प्रलंबित आहेत, असे पोलिसांनी सोमवारी सांगितले. दरम्यान, पश्चिम बंगाल सरकारने आरोपी मनोजित मिश्राची महाविद्यालयात एडी-एचओसी शिक्षक म्हणून झालेली कंत्राटी नियुक्ती रद्द केली आहे.




अनिशा डुंबरे

मुंबईतील पाटकर-वर्दे महाविद्यालयातून अर्थशास्त्र विषयातत पदवी. सध्या दै. मुंबई तरुण भारत मध्ये वेब उपसंपादक पदावर कार्यरत. लिखाण, वाचन आणि निवेदनाची विशेष आवड. मराठी साहित्य, इतिहास, राजकारण, आणि मनोरंजन विषयांत रस. महाविद्यालयीन काळात वक्तृत्व, कथाकथन, काव्यवाचन स्पर्धांमध्ये सहभाग आणि पारितोषिके.\
'मुंबई तरुण भारत'चं व्हॉट्सअप चॅनल फॉलो करा!
अग्रलेख
जरुर वाचा
कल्याणमध्ये भाजपाचा पाणी टंचाईच्या विरोधात रास्ता रोको केडीएमसीच्या लेखी आश्वासनानंतर आंदोलन मागे

कल्याणमध्ये भाजपाचा पाणी टंचाईच्या विरोधात रास्ता रोको केडीएमसीच्या लेखी आश्वासनानंतर आंदोलन मागे

कल्याण पूर्वेतील काही परिसरात गेल्या अनेक महिन्यापासून नागरिकांना पाणी टंचाईच्या झळा सहन कराव्या लागत असल्याने त्याविरोधात भाजपाने मंगळवारी आंदोलनाचे हत्यार उपसत मोर्चा काढला. भाजपाने महापालिकेच्या ड प्रभाग कार्यालयावर धडक दिली. यावेळी संतप्त झालेल्या नागरिकांनी प्रभाग कार्यालयासमोरील कल्याण पूना लिंक रोडवर ठिय्या मांडून तब्बल तीन तास रास्ता रोको आंदोलन केले. महापालिकेच्या विरोधात नागरिकांनी जोरदार घोषणाबाजी केली. अखेर महापालिकेने पाणी टंचाई सोडविण्याचे लेखी आश्वासन दिल्यानंतर भाजपाने रास्ता रोको आंदोलन ..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121