अशा पध्दतीने सर्वच क्षेत्रांमध्ये कृत्रिम बुध्दीमत्तेचा वापर करण्यात येतो आहे, वाढतोही आहे. याच एआयचा भारतीतील प्रवासाचा, त्याने कुठले कुठले बदल घडवून आणले या सर्वाचा आणि सर्वात महत्वाचे म्हणजे एआय खरंच नोकऱ्या घालवणार का?
नुकतेच देशातील फूड डिलीव्हरी क्षेत्रातील अग्रगण्य कंपनी झोमॅटो कंपनीने कृत्रिम बुध्दीमत्तेचा वापर करत, नगेट नावाचा एक एआय कृत्रिम बुध्दीमत्ता प्लॅटफॉर्म लाँच केला. कंपनीने सांगितल्या प्रमाणे हा एक नो कोड कस्टमर सपोर्ट प्लॅटफॉर्म असणार आहे, ही एक बी टू बी सेवा असून यातून सध्या या क्षेत्रात काम करत असलेल्या सर्वच कृत्रिम बुध्दीमत्ता प्लॅटफॉर्म्सना त्यांना येणारे सर्व प्रश्न सोडवण्यास मदत करतो. यातून आपल्याकडे या क्षेत्रात व्यवसाय करणं अतिशय सुरळीत, अतिशय परवडेल अशा किंमतीत, कुठल्याही क्लिष्ट प्रक्रियेशिवाय आणि अतिशय सोप्या पध्दतीने हे स्वयंचलन करण्यात येईल असे कंपनी सांगते या अशा पध्दतीने सर्वच क्षेत्रांमध्ये कृत्रिम बुध्दीमत्तेचा वापर करण्यात येतो आहे, वाढतोही आहे. याच एआयचा भारतीतील प्रवासाचा, त्याने कुठले कुठले बदल घडवून आणले या सर्वाचा आणि सर्वात महत्वाचे म्हणजे एआय खरंच नोकऱ्या घालवणार का?
सर्वात पहिले आपण फूड डिलीव्हरी क्षेत्रापासूनच सुरुवात करुया. आता सुरुवातीला आपण एक उदाहरण बघितलं. मुळात हे क्षेत्रच सर्व कृत्रिम प्रज्ञेवर अवलंबून आहे. आपल्याकडे २००८ साली पहिल्यांदा झोमॅटोने फूड डिलीव्हरी ऍप लाँच केलं. त्यामुळे या क्षेत्रात झपाट्याने क्रांती झाली. यामुळे हॉटेल्स आणि ग्राहक यांना एकाच क्लिकवर एकमेकांशी जोडले गेले. आता या क्षेत्रात या कृत्रिम प्रज्ञेचा वापर फूड सेफ्टी, क्वालिटी चेकिंग, कस्टमर रिव्ह्यूज, हायजिन ट्रॅकिंग या सर्वच गोष्टींसाठी वापरलं जातं. आजच्या घडीला एआय वरती सर्वात जास्त गुंतवणुक जिथे होत असा नावलौकिक या क्षेत्राने मिळवला आहे. जगात २०२५ मध्ये या क्षेत्राची उलाढाल तब्बल साडेपाच हजार कोटींवर जाण्याचा अंदाज आहे. आता फक्त फूड डिलीव्हरी यावरच मर्यादित न राहता, ग्रोसरी, ब्रँडेड वस्तु, कपडे यांचीही ऑर्डर्स आपल्याकडे केल्या जातात. यात आता आघाडीची ऍप्स म्हणजे, स्वीगी, झोमॅटो कंपनीचेच ब्लिंकीट यांसारखी ऍप्स आपल्याकडे अतिशय लोकप्रिय आहेत.
दुसरं क्षेत्र म्हणजे बँकिंग, आपल्याकडे पूर्वी अगदी मॅन्युअली केल्या जायच्या ते जाऊन संगणकांचा जमाना सुरु झाला. त्यातही आपल्या खात्यातील पैसे काढण्यासाठी आलेली एटीएम्स ही त्यातली मोठी क्रांती होती. त्याच्यापुढे चेकबुक प्रिंटींग, पासबुक प्रिंटिंग ते आता तयार झालेली बँकाची ऍप्स ही या क्षेत्रातील प्रगतीच आहे. आपल्याला जगाच्या कुठल्याही कोपऱ्यातून आपल्याला आपले बँकांचे व्यवहार करता येतात. त्यासाठी लागणारी क्रेडिट कार्ड्स, डेबिट कार्ड्स या सर्वात महत्वाच्या गोष्टी आहेत. ज्यातून आपले बँकिंग व्यवहार करता येतात. हे फक्त एआयमुळेच शक्य आहे. यापुढचा भाग म्हणजे फिनटेक क्षेत्र. गुगल पे, फोन पे, व्हाटसॅप पेमेंट्स ही याच्यातील महत्वाची उदाहरणे आहेत. फिनटेक ऍप्समुळे भारतातील बँकिंग क्षेत्राची व्याप्ती वाढण्यात मदत होणार आहे. यात लागणाऱ्या सर्वच गोष्टी आपल्याकडे लोकरप्रिय आहेत. यासाठी आता नुकतेच काही महत्वाचे करारही केले आहेत. सातत्याने सर्वात जास्त स्टार्टअप्स या क्षेत्रात तयार होत आहेत. या क्षेत्राची गुंतवणुकीचा विचार केला तर या क्षेत्रात २०३० पर्यंत या १५० हून अधिक युनिकॉर्न्स आणि एकत्रित भांडवलाचा विचार करता या क्षेत्राचे भांडवल २०३० पर्यंत ५०० बिलियन ड़ॉलर्सवर पोहोचलेले असेल. आता या क्षेत्रात सध्या २६ युनिकॉर्न्स तयार होतील असा अंदाज तज्ज्ञ मंडळी व्यक्त करत आहेत.
यापुढचं क्षेत्र म्हणजे, निर्मिती क्षेत्र, या क्षेत्रातही एआयचा वापर दिवसेंदिवस वाढतोच आहे. यात क्लाउड मॅनेजमेंट, इंटरनेट ऑफ थिंग्स, यांचा वापरही मोठ्या प्रमाणावर होताना दिसतो आहे. या क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर आता इन्स्पेक्शन्स, डिफेक्ट्स चेकिंग, त्यानंतर, मेनटेनन्स यासाठी जास्तीत जास्त प्रमाणात, एआयचा वापर वाढला आहे. यात सर्वात महत्वाचे म्हणजे, रोबोट्सचा वाढलेला वापर, त्यातून सामानाची ने – आण, सर्वात महत्वाचे म्हणजे यात वापरल्या जाणाऱ्या मोठ्या यंत्रांची हाताळणी, त्यांची देखरेख, यांमध्येही रोबोट्सचा वापर वाढला आहे. या सर्व क्षेत्राला या कृत्रिम प्रज्ञेचा म्हणजेच एआयचा वापर उपकारकच ठरला आहे. त्यातून या क्षेत्रातील अनेक अवघड गोष्टी करणे सोयीचे तर झालेच आहे पण त्यातून कामगारांची हाताळणी तसेच त्यांच्या जीवीताला असलेला धोका कमी होणे या गोष्टी देखील साध्य झाल्या आहेत. या क्षेत्रातील कृत्रिम बुध्दिमत्तेतील गुंतवणुक ही २०३० पर्यंत ८ हजार कोटींपेक्षा जास्त होण्याची शक्यता आहे. असा अंदाज तज्ज्ञ व्यक्त करत आहेत.
या शिवाय पर्यटन, तसेच सरकारी क्षेत्र, याशिवाय, हेल्थकेअर, ह़ॉस्पीटल्स, या क्षेत्रातही एआयचा वापर वाढला आहे. याचा सर्वात मोठा फायदा म्हणजे, ग्राहकांना अतिशय चांगली सुविधा मिळणे, त्यातून या क्षेत्रातील कंपन्यांचा महसुल वाढणे, कर्मचाऱ्यांची कामाची गुणवत्ता वाढवणे यांसारखे खूप मोठे फायदे होतात. पण एक प्रश्न उरतोच एआय नोकऱ्या घालवणार का? याचे उत्तर देण्यासाठी आपल्याला एआय काय करते हे तपासून बघणे गरजेचे आहे. एआय आपले काम सुलभ करते, कामाची गुणवत्ता वाढवते. यामुळेच जर या गोष्टी आपल्या कामात आल्या तर आपण पण प्रगती करुच शकतो. पण यात एकच आहे की जर आपण कामात एआयमुळे होणारे बदल जर स्वीकारले तर आपल्याला नोकरी सोबतच आपली प्रगती करणेही श़क्य होईल आणि सर्वात महत्वाचे एआय शेवटी तंत्रज्ञान आहे. ते चालवणारी माणूसच असणार आहे. त्यामुळे एआय कितीही पुढे गेलं तरीही ते माणसाची जागा कधीच घेऊ शकणार नाहीत हे लक्षात घेतले तर ही भीती अनाठायी आहे. हे समजूनच येईल.