महाकुंभ ही आपल्या देशाची आस्था! मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केल्या भावना

    14-Feb-2025
Total Views | 72
 
Fadanvis
 
लखनौ : महाकुंभ ही आपल्या देशाची आस्था असून ती बघून जगभरातील लोक अचंबित झाले आहेत, अशा भावना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केल्या. शुक्रवार, १४ फेब्रुवारी रोजी ते प्रयागराज येथे दाखल झाले असून त्यांनी सहकुटुंब महाकुंभमेळ्यात पवित्र स्नान केले.
 
हे वाचलंत का? -  सुरेश धस यांनी घेतली धनंजय मुंडेची भेट! चर्चांना उधाण
 
याप्रसंगी माध्यमांशी बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, "१४४ वर्षांनंतर महाकुंभाचा योग आला आहे. अशावेळी स्नान करण्याची संधी मिळाली, ही आनंदाची गोष्ट आहे. उत्तर प्रदेश सरकार आणि मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचे अभिनंदन करतो. इथे खूप सुंदर व्यवस्था करण्यात आली असून येणारा प्रत्येक व्यक्ती आनंदात आहे. ज्याप्रमाणे श्रद्धाळू लोक इथे येऊन महाकुंभात स्नान करत आहेत त्यामुळे याठिकाणी एक नवीन इतिहास आणि नवीन रेकॉर्ड बनत आहे. महाकुंभ ही आपल्या देशाची आस्था आहेच, पण जगभरातील अनेकांना या इथल्या व्यवस्थेने आश्चर्यचकीत केले आहे," अशा भावना त्यांनी व्यक्त केल्या.
 
 
 
अग्रलेख
जरुर वाचा
ऑपरेशन सिंधू सुरुच! आतापर्यंत ५१७ भारतीय नागरिक मायदेशी परतले, इराणमधून तिसरे विमान नवी दिल्लीत दाखल!

ऑपरेशन सिंधू सुरुच! आतापर्यंत ५१७ भारतीय नागरिक मायदेशी परतले, इराणमधून तिसरे विमान नवी दिल्लीत दाखल!

(Iran-Israel War) इराण आणि इस्त्रायलमध्ये सशस्त्र संघर्ष सुरु झाल्यापासून इराणमध्ये मोठ्या प्रमाणावर जीवितहानी झाल्याचे समोर आले आहे. या दोन्ही देशांतील संघर्ष तीव्र होत असल्याचे लक्षात घेता भारताने युद्धग्रस्त इराणमधून भारतीय नागरिकांना बाहेर काढण्यासाठी 'ऑपरेशन सिंधू' (Operation Sindhu)राबवत नागरिकांच्या सुरक्षित परतीची जबाबदारी घेतली आहे. ऑपरेशन सिंधू अंतर्गत आतापर्यंत इराणमधील ५१७ भारतीय नागरिक मायदेशी परतले असल्याची माहिती परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल यांनी दिली...

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121