सैफ प्रकरणाला आव्हाडांकडून धार्मिक रंग

    18-Jan-2025
Total Views | 94

saif ali khan
 
मुंबई : (Saif Ali Khan) बॉलीवूड अभिनेता सैफ अली खानवर झालेल्या प्राणघातक हल्ल्याचा तपास सुरु असतानाच शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनी या हल्ल्यामध्ये सैफ आणि अभिनेत्री करिना कपूर यांचा थोरला मुलगा तैमूरचाच बळी जाणार होता, असा खळबळजनक दावा केला आहे. तैमूर नावावरुन त्याला लक्ष्य केलं जात असल्याचा आरोपही आमदार आव्हाड यांनी केला आहे. यासंदर्भात त्यांनी एक्स माध्यमावर पोस्ट करुन आपली प्रतिक्रिया दिली आहे. या आरोपानंतर राजकीय वर्तुळामधून आव्हाडांवर टीका होत असल्याचे पाहायला मिळाले.
 
"प्राणघातक हल्ल्यातून सैफ अली खान हा नशिबाने बचावला. खरं तर मुलाचाच बळी जाणार होता. मात्र, नशिबाने तोही वाचला. पण, सत्य बोलण्यास कोणीच धजावत नाही. तैमूर हे नाव जाहीर झाल्यापासूनच तो कट्टरपंथीयांचा लक्ष्य झाला. त्याचे नाव तैमूरलंगशी जोडणे ही विकृतीच आहे. सत्य सांगायला कुणीच पुढे येत नाही, तैमूरचा अरेबिक अर्थ मी आधीच सांगितला आहे. तेव्हा मी स्पष्ट करतो की, सत्य मांडून लोकांचे डोळे उघडण्याचा प्रयत्न आहे. कल्पनेच्या पलिकडे लहान मुलाची नावावरून कुणाशी तरी तुलना करून त्यास दूषणे लावली जात असतील, द्वेष पसरवत असतील, तर सर्वच अवघड आहे" असं आव्हाड यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे.
 
"या घटनेला सामाजिक किंवा राजकीय रंग देणं..."
 
याआधीही जितेंद्र आव्हाडांनी धार्मिक कट्टरतावाद्यांकडून हा हल्ला करण्यात आलेला असू शकतो अशी शंका उपस्थित केली होती. यावर गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी आव्हाडांना खडे बोलही सुनावले होते. योगेश कदम म्हणाले होते की, “फक्त सैफ अली खान यांचे आडनाव खान आहे म्हणून आज विरोधक त्याचं राजकारण करत असतील तर मला त्यांची कीव येते. तुम्हाला महाराष्ट्राच्या जनतेने तुम्हाला सत्तेतून बाहेर फेकलं आहे. आता विरोधी बाकावर आहेत म्हणून तुम्ही काहीही बरळाल हे खपवून घेणार नाही. जितेंद्र आव्हाड यांनी लक्षात घ्यावं की या घटनेला सामाजिक किंवा राजकीय रंग देणं म्हणजे त्यांची राजकीय परिपक्वता किती आहे हे त्यावरून लक्षात येतं. महाराष्ट्रात देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात गृह खातं काम करत असताना मुंबई हे जगातील सर्वात सुरक्षित शहर म्हणून ओळखलं जातं”, असेही गृहराज्यमंत्री योगेश कदम म्हणाले आहेत.
 
 
अग्रलेख
जरुर वाचा
समृद्धी महामार्गाच्या अंतिम टप्प्याचे आज लोकार्पण

समृद्धी महामार्गाच्या अंतिम टप्प्याचे आज लोकार्पण

राज्याची राजधानी मुंबई आण‍ि उपराजधानी नागपूर या दोन शहरांमधील अंतर केवळ आठ तासांवर आले आहे . या दोन शहरांना जोडणाऱ्या बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्गाच्या तिसऱ्या आण‍ि महत्त्वाच्या टप्प्याचे लोकार्पण आज, गुरुवार दि.५ जून रोजी होणार असून इगतपुरी येथे हा सोहळा आयोजित करण्यात आला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते इगतपुरी ते ठाणे जिल्ह्यातील आमणे या ७६ किलोमीटर अंतराच्या टप्प्याचे उद्घाटन करण्यात येणार आहे. याचवेळी सायन-पनवेल मार्गावरील वाशी खाडी पुलावरून मुंबईच्या दिशेने येणाऱ्या नव्या खाडीपूल ..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121