'हा' महाराष्ट्रद्रोह नाही का? उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा विरोधकांना सवाल

    06-Sep-2024
Total Views | 196
 
Fadanvis
 
मुंबई : आपलं राज्य पहिल्या नंबरवर आल्यानंतर जे राज्य आपल्या कितीतरी मागे आहे ते राज्य पुढे आहे, असं म्हणणं म्हणजे महाराष्ट्रद्रोह नाही का? असा सवाल उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी विरोधकांना केला आहे. त्यांनी शुक्रवारी माध्यमांशी संवाद साधला.
 
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, "महाराष्ट्राने थेट परकीय गुंतवणूकीचे सगळे रेकॉर्ड तोडले आहेत. ही अतिशय आनंदाची गोष्ट आहे. यावर्षी देशात आलेल्या एकूण गुंतवणूकीच्या ५२ टक्के गुंतवणूक एकट्या महाराष्ट्रात आली आहे. २०२१ साली महाराष्ट्र गुंतवणूकीत मागे गेला होता. २०१४ ते २०१९ आम्ही तो पहिल्या क्रमांकावर ठेवला होता. त्यानंतर गुजरात आणि कर्नाटक पुढे गेले होते. ज्यावेळी आमचं सरकार आलं तेव्हा आम्ही पुन्हा महाराष्ट्राला पहिल्या क्रमांकावर आणलं. जे लोकं महाराष्ट्रातून उद्योग बाहेर चालले आहेत, असा नरेटिव्ह तयार करण्याचे प्रयत्न करत होते त्यांना आता या आकड्याने पुर्णपणे उत्तर मिळाले आहे. सगळ्या मोठ्या कंपन्या आता महाराष्ट्रात आहेत," असे ते म्हणाले.
 
हे वाचलंत का? -  "महाविकास आघाडी आणि जरांगे दोघेही केवळ एकालाच..."; फडणवीस थेटच बोलले
 
विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवारांनी महाराष्ट्रातील गुंतवणूकीच्या आकडेवारीवर टीका केली होती. यावर बोलताना फडणवीस म्हणाले की, "वडेट्टीवार आणि काँग्रेसला गुजरातचंच गुणगान गाण्यात अधिक रस आहे. आपलं राज्य पहिल्या नंबरवर आल्यानंतर जे राज्य आपल्या कितीतरी मागे आहे ते राज्य पुढे आहे, असं म्हणणं म्हणजे महाराष्ट्रद्रोह नाही का? त्यामुळे सरकार कुणाचंही असो, पण आपलं राज्य पुढे गेलं आहे याचा त्यांनी आनंद मान्य केला पाहिजे," असेही ते म्हणाले.
 
 
 
अग्रलेख
जरुर वाचा
मोखावणे-कसारा ग्रामस्थांना दिलासा, गावठाणनिर्मितीसाठी सर्वेक्षण होणार

मोखावणे-कसारा ग्रामस्थांना दिलासा, गावठाणनिर्मितीसाठी सर्वेक्षण होणार

गेल्या ३५-४० वर्षांपासून वन जमिनीवरील हक्काच्या घरांसाठी संघर्ष करणाऱ्या मोखावणे-कसारा ग्रामस्थांना दिलासा मिळाला आहे. राज्याचे वनमंत्री गणेश नाईक यांनी मोखावणे-कसारा गावात गावठाण निर्मितीसाठी वन, महसूल आणि रेल्वे विभागाच्या जमिनीचे सर्वेक्षण करण्याचा आदेश दिला आहे. त्याचबरोबर या जमिनीवरील रहिवाशांना नोटीसा बजाविल्या जात असल्या, तरी त्यांच्याबाबत राज्य सरकारला सहानुभूती असल्याची ग्वाही वन मंत्र्यांनी दिली. माजी केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील व माजी आमदार पांडुरंग बरोरा यांच्या पुढाकाराने ही बैठक झाली...

पंतप्रधान मोदींमुळे भारताची जगातील प्रतिष्ठा वाढली

पंतप्रधान मोदींमुळे भारताची जगातील प्रतिष्ठा वाढली

“पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भारत हे जागतिक स्तरावरील एक आगळे समीकरण झाले असून, मोदी सरकारच्या कारकिर्दीमुळे भारताची जगातील प्रतिष्ठा वाढली आहे. गेल्या ११ वर्षांत मोदी सरकारच्या विविध योजनांमुळे देशातील गरीब, महिला, युवक, दलित, वंचित आणि समाजाच्या सर्व स्तरांतील जनतेच्या जीवनात आमूलाग्र बदल झाला. देशाला अभूतपूर्व प्रतिष्ठा प्राप्त करून दिल्याबद्दल मी मोदी सरकारचे आणि व्यक्तिशः पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे अभिनंदन करतो व आभारही मानतो”, अशा शब्दांत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मोदी सरकारच्या तिसऱ्या ..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121