पुढील वर्षाच्या मध्यापर्यंत १ लाख बीएसएनएल दूरसंचार टॉवरसह 4G नेटवर्क येणार

    11-Sep-2024
Total Views | 32
will-get-telecom-connections-bsnl


नवी दिल्ली : 
   देशातील दूरसंचार कनेक्शनच्या विस्तारासाठी केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांनी मोठी घोषणा केली आहे. २०२५ पर्यंत देशभरातील २५ हजार गावांना दूरसंचार जोडणी मिळेल. देशात कनेक्टिव्हिटी नसलेली सर्वाधिक गावे ईशान्य भारतात असून ही संख्या सुमारे ६ हजार इतकी आहे, असेही केंद्रीय मंत्री सिंधिया यांनी सांगितले.




दरम्यान, केंद्रीय दूरसंचार मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांनी २०२५ च्या मध्यापर्यंत देशातील २५ हजार गावांमध्ये दूरसंचार आणि मोबाइल इंटरनेट सुविधा पुरवल्या जातील. आजही या भागात दूरसंचार सुविधा उपलब्ध नसून देशाच्या प्रत्येक क्षेत्रात संपूर्ण प्रवेश सुनिश्चित करणे हाच उद्देश आहे, केंद्रीय मंत्री सिंधिया म्हणाले.

ऑल इंडिया मॅनेजमेंट असोसिएशन(एआयएमए)च्या ५१व्या राष्ट्रीय व्यवस्थापन परिषदेत सिंधिया म्हणाले की, देशभरात एकूण ४ लाख ५० हजार टॉवर स्थापित केले गेले आहेत. परंतु काही गावे अद्याप जोडलेली नाहीत. आम्ही अंदाजे २० हजार टॉवर स्थापित करण्यासाठी या उपक्रमांतर्गत ४५ हजार कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. २०२५च्या मध्यापर्यंत उपक्रम पूर्ण होतील, असे सिंधिया म्हणाले.



अग्रलेख
जरुर वाचा
लेखक जयेश मेस्त्री ’संत गाडगे महाराज बाल साहित्य पुरस्कार २०२५’ने सन्मानित!

लेखक जयेश मेस्त्री ’संत गाडगे महाराज बाल साहित्य पुरस्कार २०२५’ने सन्मानित!

संत गाडगे महाराज विचार मंच महाराष्ट्र राज्य आणि ज्ञानज्योत फाऊंडेशन महाराष्ट्र यांच्या वतीने देण्यात येणारा ’संत गाडगे महाराज बाल साहित्य पुरस्कार २०२५’ या वर्षी लेखक, साहित्यिक जयेश मेस्त्री यांना प्राप्त झाला आहे. दरवर्षी प्रमाणे या वर्षी देखील साहित्य क्षेत्रात उत्तम कामगिरी करणार्‍या साहित्यिकांचा गौरव करण्यात आला. दिनांक ०७ जून २०२५ रोजी पुणे येथील सदाशिव पेठेतील वेदशास्त्रोत्तेजक सभागृह येथे हा सुंदर सोहळा पार पडला. या प्रसंगी प्रसिद्ध उद्योजक डॉ. रामदास कुटे हे उद्घाटक म्हणून उपस्थित होते. तसेच ..

साताऱ्याच्या मातीत बहरणार ९९ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन!

साताऱ्याच्या मातीत बहरणार ९९ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन!

: मराठी साहित्यातील प्रतिष्ठीत मानल्या जाणाऱ्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनचा ९९ व्या सोहळा आगामी वर्षात साताऱ्यात पार पडणार आहे. ९९ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन आयोजन करण्याचा मान साताऱ्यातील महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या शाहूपुरी शाखेला आणि मावळा फौंडेशनला मिळणार आहे.अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाच्या पुणे येथे झालेल्या बैठकीत हा निर्णय एकमताने घेण्यात आला. अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे अध्यक्ष मिलिंद जोशी, उपाध्यक्ष गुरुय्या स्वामी, कार्यवाह सुनिताराजे पवार, कोषाध्यक्ष विनोद ..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121