
मुंबई: भारताचा सकल देशांतर्गत उत्पादन (GDP) दर ६.१ ते ६.७ टक्क्यांपर्यंत वाढू शकतो असे अनेक अर्थतज्ज्ञांनी आपल्या निवेदनात म्हटले आहे. मात्र तो ८ टक्यांच्या खाली राहू शकतो असा अंदाजही तज्ञांनी व्यक्त केला आहे. त्यामध्ये म्हटल्याप्रमाणे हा ६.१ ते ६.७ पर्यंत राहू शकतो परंतु ८ टक्क्यांच्या खाली राहील' असे यामध्ये सांगितले गेले आहे.
अनेक अर्थतज्ज्ञांनी म्हटल्याप्रमाणे, आर्थिक वर्ष २०२३-२४ मध्ये हा दर ७.६ ते ७.८ टक्क्यांपर्यंत राहू शकतो. भारतीय अर्थ व्यवस्था जुन तिमाहीत ८.२ टक्क्यांवर राहू शकते तर सप्टेंबर तिमाहीत ८.१ व डिसेंबर तिमाहीत ८.४ राहू शकतो असे म्हटले गेले आहे. कोटक महिंद्रा बँक मुख्य अर्थतज्ज्ञ उपासना भारद्वाज यांनी म्हटले,' आलेली आकडेवारी चांगली वाढ दर्शवत आहे. ट्रेड व हाँटेल यामध्ये देखील चांगली वाढ झाली आहे ' असे म्हटले आहे.
त्यांनी पुढे म्हटल्याप्रमाणे, ' उत्पादन प्रकिया आजही चांगली आहे. बांधकाम क्षेत्र व गुंतवणूक क्षेत्र कामगिरी दर्शवली जात आहे. मात्र शेती क्षेत्रात थोडीशी संथ गती आली असुन मागच्या तिमाहीत शेतीतील आकडेवारी कमी आहे. एकूणच चौथ्या तिमाहीत आम्ही ६.१ टक्के जीडीपी वाढेल अशी अपेक्षा करत आहोत व संपूर्ण वर्षासाठी ७.६ टक्के जीडीपीची अपेक्षा करत आहोत.' असे म्हटले गेले आहे.
तसेच यामध्ये भारद्वाज यांनी, सेवा व उत्पादन क्षेत्रात कमी वाढ होऊ शकते असे म्हटले आहे. जीवीए (Gross Value Added) नंबरमध्ये चौथ्या तिमाहीत ५.७ टक्क्यांवर वाढ होऊ शकते तर जीडीपी आकडेवारीत ६.१ टक्क्यांवर वाढ होऊ शकते ' असे देखील पुढे म्हटले आहे.
ईवाय इंडिया (EY India) चे मुख्य सल्लागार डी के श्रीवास्तव यांनी,' देशांतर्गत व आंतरराष्ट्रीय संस्थेत आर्थिक वर्ष २०२५ मध्ये ७ टक्क्यांपर्यंत वाढ होऊ शकते असे म्हटले आहे. चौथ्या तिमाहीत जीडीपी वाढ ६.५ टक्क्यांपर्यंत अथवा त्याहून अधिक वाढू शकते. आयएमएफने ७.८ टक्क्यांपर्यंत वाढ होऊ शकेल असा अंदाज आयएमएफने व्यक्त केला आहे.आणखी एका संस्थेने जीडीपी दर ६.२ टक्क्यांपर्यंत आर्थिक वर्ष २०२३-२४ पर्यंत राहू शकतो असे म्हटले आहे.
आरबीआयने आपल्या वित्तीय धोरणात ७ टक्क्यांपर्यंत वाढ राहू शकते असे म्हटले आहे.