विकसित देशात महागाई असताना भारताने चांगल्या पद्धतीने महागाई हाताळली!

ओईसीडी अहवालाने भारताचा जीडीपी दर ७.८ टक्क्यांनी वाढल्याची शक्यता वर्तवली

    02-May-2024
Total Views | 131

GDP
 
 
मुंबई: OECD (Organisation for Economic Cooperation and Development) ने आपला नवीन अहवाल सादर केला आहे. या अहवालात म्हटल्याप्रमाणे, भारताचा जीडीपी ७.८ टक्क्यांनी वाढू शकतो असा अंदाज व्यक्त केला आहे. त्यापुढे दोन वर्षांत जीडीपी (सकल देशांतर्गत उत्पादन) ६.६ टक्क्यांनी वाढू शकतो असे म्हटले आहे.मात्र काही वैश्विक आव्हानांचा सामना भारतीय अर्थव्यवस्थेला करावा लागेल असा अंदाज यात व्यक्त करण्यात येत आहे.
 
गुरुवारी सादर केलेल्या अहवालात, भारतातील वाढती देशांतर्गत मागणी लक्षात घेता भांडवली गुंतवणुकीत मोठी वाढ होऊ शकते असे म्हटले आहे. याशिवाय व्यक्तिगत वापरात (Personal Consumption) मध्ये घट होण्याची शक्यता आहे. जागतिक पातळीवरील अर्थ व सामाजिक पातळीवर चर्चा सल्ला मसलत ३७ देशाच्या व्यासपीठावर ही चर्चा ओईसीडी (OECD) संस्था करते. या अहवालात म्हटले की भारतात परदेशी गुंतवणूकीत मोठी वाढ होण्याची शक्यता आहे.विशेषतः माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात जगातील एकूण बाजारात भारताचा वाटा मोठा असू शकतो.
 
याखेरीज भारतातील किरकोळ हेडलाईन इन्फेक्शन (महागाईत) घट होण्याची शक्यताही संस्थेने वर्तवली आहे. मात्र याबरोबरच भाजीपालातील महागाई कायम राहू शकते असा देखील अंदाज संस्थेने व्यक्त केला आहे.
 
भारतातील कनज्यूमर प्राईज इंडेक्स (ग्राहक किंमत निर्देशांक) हा मार्चमध्ये ४.९ टक्के होता. प्रसारमाध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार गेल्या दोन महिन्यांत सरासरी दर ५.१ टक्के राहिला आहे. डिसेंबर २०२३ मध्ये हा सर्वाधिक असून ५.७ टक्क्यांपर्यंत ही वाढ गेली होती. आरबीआयच्या मते किरकोळ महागाई दर हा २-६ टक्यांच्या मर्यादेतच राहिलं साधारणपणे हा दर ४ टक्क्यांपर्यंत राहू शकतो. महागाई ही विकसित देशांप्रमाणे जागतिक समस्या असून भारताने मात्र चांगल्या पद्धतीने महागाई हाताळली असल्याचे ओईसीडीने आपल्या अहवालात म्हटले आहे.
 
याआधी आरबीआयने आपला रेपो दर जैसे थे ठेवत त्यात कुठलाही बदल केलेला नव्हता.सलग सातव्यांदा हा दर स्थिर ठेवल्याने अर्थव्यवस्थेत स्थिरतेचे संकेत गेले होते. याशिवाय अहवालात म्हटल्याप्रमाणे,भारताला अधिक जीडीपी साध्य करण्यासाठी मोठ्या प्रमाणात विकासाला आणखी वेग देण्याची गरज आहे.विशेषतः आव्हानात्मक स्थितीला तोंड देण्यासाठी ही गरज असल्याचे म्हटले आहे.
 
अग्रलेख
जरुर वाचा
क्रीडा विद्यापीठ: क्रीडा क्षेत्रातील एक महत्वपूर्ण पायरी

क्रीडा विद्यापीठ: क्रीडा क्षेत्रातील एक महत्वपूर्ण पायरी

भारतात केंद्रीय पातळीवर नवीन विद्यापीठ स्थापन करण्याची प्रक्रिया मुख्यत्वे शिक्षण मंत्रालय आणि त्याखालील उच्च शिक्षण विभाग यांच्या मार्गदर्शनाखाली केली जाते. यासंदर्भात विद्यापीठाच्या मान्यता आणि गुणवत्ता सुनिश्चित करण्यासाठी ‘विद्यापीठ अनुदान मंडळ’ (णॠउ)देखील महत्त्वाची भूमिका बजावते. तसेच, जर एखादे विद्यापीठ राज्यस्तरीय किंवा खासगी स्वरूपाचे असले, तर संबंधित राज्याचा उच्च शिक्षण विभाग किंवा राज्य सरकारचा इतर संबंधित विभाग अथवा संस्था त्यांच्यासोबत समन्वयाच्या भूमिकेत आवश्यक मंजुरी व नियमनासाठी कार्य ..

ब्रिटिश पारतंत्र्याच्या काळातील भारतीय शिक्षणव्यवस्था

ब्रिटिश पारतंत्र्याच्या काळातील भारतीय शिक्षणव्यवस्था

प्राचीन भारतीय शिक्षणव्यवस्था कशा प्रकारची होती आणि सांस्कृतिक पुनरुज्जीवनासाठी त्या व्यवस्थेच्या विविध आयामांचे आकलन का महत्त्वाचे आहे, हे आपण पाहिले. अब्राहमिक विचाराधारांशी संघर्ष झाल्यावर या व्यवस्थेला उतरती कळा कशी लागली, याही विषयाचा थोडयात आढावा आपण घेतला. वसाहतवादाचा शिक्षणावरील परिणाम हा एक समग्र ८०० ते एक हजार वर्षांच्या कालखंडाचा इतिहास आहे. परंतु, ब्रिटिश वसाहतवाद हा एक प्रकारचा सैद्धांतिक वर्चस्ववादही असल्याने या कालखंडातील शैक्षणिक अधोगतीला अनेक पैलू जोडले जातात. ब्रिटिशांचे पारतंत्र्य व ..

मेट्रो व मोनोच्या ३१ स्थानकांलगत ई स्वॅप बॅटरी स्टेशन्स

मेट्रो व मोनोच्या ३१ स्थानकांलगत ई स्वॅप बॅटरी स्टेशन्स

जागतिक पर्यावरण दिनासाठी सगळे जग सज्ज होत असताना मुंबईभर विस्तारलेल्या मेट्रो व मोनोरेलच्या स्थानकांवर ई-स्वॅप बॅटरी स्वॅपिंग स्टेशन्स सुरू करण्यासाठी महामुंबई मेट्रो ऑपरेशन्स कॉर्पोरेशन लि.ने (एमएमएमओसीएल) जपानच्या होंडा मोटर कंपनी लिमिटेडची उप कंपनी असलेल्या होंडा पॉवर पॅक एनर्जी इंडिया प्रा. लि.शी भागीदारी केली आहे. या हरित उपक्रमांतर्गत २५ मेट्रो स्थानके व ६ मोनो रेल स्थानकांच्या ठिकाणी होंडाचे हे ॲडव्हान्स्ड बॅटरी स्वॅपिंग तंत्रज्ञान बसविण्यात येईल. यातून एमएमएमओसीएलला तिकीटाव्यतिरिक्त सुमारे ₹३० ..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121