मुंबई: टाईम्स ऑफ इंडियाने दिलेल्या वृत्तानुसार रिलायन्स कॅपिटलचा देणेकरींना त्यांचे थकित पैसे पुढील आर्थिक वर्ष २०२५ मध्ये मिळणार आहेत.अनिल अंबानी संचलित रिलायन्स कॅपिटल बुडीत निघाल्याने हिंदुजा ग्रुपला कंपनी विकण्याचा प्रस्ताव ठेवला गेला होता. याला मान्यता मिळत पुढील वर्षीच थकीत पैसे कर्ज पुरवठा करणाऱ्या संस्थांना मिळणार आहेत.
रिलायन्सने मार्चमध्ये कंपनी विकण्याचा प्रस्ताव ठेवला होता. कंपनीत चलनाची तरलता (Liquidity) व महसूल सुरू करण्यासाठी हा प्रस्ताव हिंदूजा समुहाकडे ठेवला गेला. परंतु हिंदुजा समुहाने ही शक्यता नाकारता व्यवहारिक नसल्याचे सांगितले आहे.
एनसीएलटी (राष्ट्रीय कंपनी विधी अधिकरण म्हणजेच National Company Law Tribunal) ने दिलेल्या निर्णयानंतर दहा दिवसांच्या आत या व्यवहारात हालचाल होणे शक्यता नसल्याचे इंडसइंड होल्डिंग्स (हिंदूजा कंपनी) कडून रिलायन्स कॅपिटलला पत्र लिहिले आहे.
याशिवाय हिंदूजा समुहाकडून २७ फेब्रुवारीचा निकालानुसार दिलेल्या कालावधीत प्रकिया पूर्ण होण्यासाठी आम्ही कटिबद्ध असल्याचे सांगितले आहे.