कशी बदलली संभलची डेमोग्राफी?

    24-Dec-2024
Total Views | 82

Sambhal Demography

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : (demography of Sambhal)
उत्तर प्रदेशाच्या संभल जिल्ह्यात जामा मशिदीत हरिहर मंदिराचा दावा मांडल्यानंतर मशिदीत दुसऱ्या टप्प्यातील सर्वेक्षणादरम्यान हिंसाचार उसळला होता. झालेल्या वादाच्या संदर्भात सर्वोच्च न्यायालयाने राज्य सरकारला शांतता आणि सौहार्द सुनिश्चित करण्यास सांगितले. शांतता राखण्यासाठी राज्य सरकारला आवश्यक ती सर्व पावले उचलावी लागतील, असे न्यायालयाने म्हटले. कशी बदलली संभलची डेमोग्राफी? वाचा संपूर्ण घटनाक्रम.

संभलच्या शाही जामा मशिदीच्या सर्वेक्षणाचा आदेश स्थानिक न्यायालयाने दि. १९ नोव्हेंबर रोजी जारी केला होता. २४ नोव्हेंबर रोजी कोर्ट कमिशनरचे पथक पाहणीसाठी मशिदीत पोहोचले तेव्हा जमावाने तेथे हिंसाचार केला. पोलिसांवर दगडफेक करण्यात आली आणि या घटनेत पाच जणांचा मृत्यू झाला. कार्तिकेय महादेव मंदिराचा शोध लागल्यानंतर हे प्रकरण आणखी गडद झाले. तब्बल ४६ वर्षांनंतर संभाळेश्वर महादेव मंदिराचे दरवाजे उघडल्यानंतर अनेक प्रश्न उपस्थित होऊ लागले.

हे वाचलंत का? : संभल, वाराणसी, अलिगढनंतर अमेठीमध्ये सापडले १२० वर्षे जुने मंदिर

संभलमध्ये १९७८ मध्ये उसळलेल्या हिंसाचारावर चर्चेच्या मागणीसाठी सोमवारी उत्तर प्रदेश विधानसभेत गदारोळ झाला. समाजवादी पक्षाच्या आमदारांनी हा मुद्दा उपस्थित केला. चर्चेनंतर मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ उत्तर देण्यासाठी उठले तेव्हा त्यांनी १९७८ च्या एका घटनेचा काळा अध्याय उघड केला. १९७८ च्या दंगलीत १८४ हिंदूंचा मृत्यू झाल्याचा दावा केला होता. त्यांनी संभळच्या अल्पसंख्याक हिंदूंचा उल्लेख केला. वर्षानुवर्षे बंद असलेल्या संभळ येथील मंदिराचा इतिहास सांगितला. संभळ येथे सापडलेल्या मंदिराच्या परिसरातून आणखी अनेक शिल्पे सापडली आहेत. यामध्ये बजरंगबली, नंदी आणि गणेशाच्या मूर्तींचा समावेश आहे. स्वस्तिक चिन्ह असलेल्या विटा आणि कार्तिकेयची तुटलेली मूर्तीही तेथे सापडली.

१९७८ च्या दंगलीनंतर कार्तिकेय महादेव मंदिराला कुलूप लावण्यात आल्याचा दावा हिंदू पक्षाकडून करण्यात आला. चार दशकांनंतर मंदिराचे कुलूप उघडण्यात आले. सध्या मंदिरात विधीपूर्वक पूजेला सुरुवात झाली आहे. मंदिराजवळील विहिरीतील अवैध अतिक्रमण हटविण्याची कारवाई सुरू आहे. दरवाजे उघडल्यानंतर मंदिरात दर्शनासाठी आलेल्या लोकांचे म्हणणे आहे की १९७८ च्या दंगलीमुळे द्वेषाचे वातावरण निर्माण झाले होते. जीवाच्या भीतीने हिंदू पळून गेले. ज्या ठिकाणी हे मंदिर सापडले, तेथे एकेकाळी ४५ हिंदू कुटुंबे राहत होती. नंतर लोक आपली घरे विकून तेथून निघून गेले.

हिंदू समाजाचे लोक म्हणतात की १९७८ च्या दंगलीनंतर संभल आमच्यासाठी सुरक्षित राहिले नाही. एकेकाळी संभल नगरपालिका क्षेत्रात ४५ टक्के हिंदू लोक राहत असल्याचा दावा करण्यात आला आहे. आता तिथे फक्त १० टक्के हिंदू उरले आहेत. 'आज तक' या वृत्तवाहिनीशी बोलताना संभलचे डीएम आणि एसपी म्हणाले की, स्वातंत्र्याच्या वेळी संभल नगरपालिकेत हिंदूंची लोकसंख्या ४५ टक्के होती. आता ते १५ ते २० टक्के आहे. संभळ नगरपालिकेत हिंदूंची लोकसंख्या घटल्याचे स्पष्ट झाले आहे. १९७८ रोजी उसळलेल्या हिंसाचाराने संभलमधील बंधुभावाचा गळा घोटला.

जातीय दंगलींचा इतिहास

संभळमध्ये सातत्याने जातीय दंगली उसळत आहेत. स्वातंत्र्यानंतर संभळमध्ये १६ वेळा जातीय हिंसाचाराच्या घटना घडल्या आहेत. यामध्ये २१३ जणांचा मृत्यू झाला. मृतांमध्ये २०९ हिंदूंचा समावेश आहे. संभल दंगलीचा संदर्भ देत मुख्यमंत्र्यांनी विधानसभेत आकडेवारी मांडली. १९४७ च्या दंगलीत एका व्यक्तीचा मृत्यू झाला होता. १९४८ मध्ये सहा जणांचा मृत्यू झाला. १९५८ आणि १९७६ च्या दंगलीत ७ जणांचा मृत्यू झाला होता. १९७८ मध्ये दंगल उसळली होती, ज्यात १८४ लोक मारले गेले होते. १९८० मध्ये दंगल झाली होती, त्यात एकाचा मृत्यू झाला होता. याशिवाय १९८२, १९८६, १९९२, १९९५ आणि २०१९ मध्ये संभळमध्ये दंगली झाल्या.

अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121