अतुल सुभाष प्रकरणात ट्विस्ट! पत्नीला विवाह करायचा नव्हता पण...

    22-Dec-2024
Total Views | 212
 
 Atul Subhash case
 
 
बंगळुरू : एआय अभियंता अतुल सुभाष यांच्या बंगळुरू येथील आत्महत्येच्या प्रकरणाच्या तापासातून एक बाब उघड झाली आहे. अतुल सुभाष यांची पत्नी निकीता सिंघानियाला त्यांच्याशी विवाह करायचा नव्हता. वडिलांची प्रकृती अस्थिर असल्याने घरच्यांच्या दबावाखाली निकिताने अतुलशी विवाह केला आणि नंतर प्रत्येक गोष्टींची किंवा घटनेची माहिती तिची आई निशाला देत असायची.
 
याप्रकरणी आता मिळालेल्या माध्यमांच्या अहवालानानुसार, हे नाते तुटण्यामागे एक कारण आहे. ते म्हणजे निकिता संघानियाची आई तिला दिवसातून पाच-सहा वेळा फोन करायची आणि तिच्या मुलीला पती आणि सासरच्यांविरोधात अनेकदा भडकवण्याचे काम करायची.
 
दरम्यान अतुल- निकिताचा विवाह हा २०२० मध्ये वाराणसी येथील एका हॉटेलमध्ये झाला होता. पुढे निकिताच्या वडिलांचे निधन झाले आणि नंतर निकिताने तिचे काका सुशील सिंघायनिया यांचा सल्ला घेतला असल्याचे सांगण्यात आले.
 
 
अग्रलेख
जरुर वाचा
कोकण रेल्वेच्या मुख्य जनसंपर्क अधिकारीपदी सुनील नारकर

कोकण रेल्वेच्या मुख्य जनसंपर्क अधिकारीपदी सुनील नारकर

कोकण रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी म्हणून सुनील नारकर यांनी पदभार स्वीकारला आहे. सुनील नारकर हे कणकवली तालुक्यातील पियाळी गावचे आहेत. या नियुक्तीबद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे. नारकर हे सन १९९७ मध्ये कोकण रेल्वेमध्ये रत्नागिरीत क्षेत्रीय ट्रॅफिक व्यवस्थापक पदावर रुजू झाले. त्यानंतर त्यांनी मडगाव येथे वरिष्ठ क्षेत्रीय वाहतूक व्यवस्थापक म्हणून काम पाहिले. पुढे बेलापूर येथे कोकण रेल्वे मुख्यालयामध्ये मुख्य वाणिज्य प्रबंधक म्हणून त्यांनी यशस्वी कामगिरी बजावली. आता पदोन्नतीने त्यांची कोकण रेल्वेचे ..

पालघरमधील १० टायर उद्योगांना टाळे - पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांची माहिती; प्रदूषणाच्या तक्रारीवरून कारवाई

पालघरमधील १० टायर उद्योगांना टाळे - पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांची माहिती; प्रदूषणाच्या तक्रारीवरून कारवाई

पालघर जिल्ह्याच्या वाडा तालुक्यातील वडवली ग्रामपंचायत हद्दीतील टायर पायरोलिसिस उद्योगामुळे प्रदूषण होत असल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. त्या तक्रारींच्या अनुषंगाने १० उद्योगांना बंद करण्याचे आदेश देण्यात आले आहे. यातील ८ उद्योग बंद आहेत. अन्य दोनपैकी एका उद्योगात भीषण आग लागल्यामुळे तो बंद आहे, तर दुसऱ्या उद्योगाला अंतरिम नोटीस देण्यात आली असून, त्यांच्याकडून माहिती मागवली आहे. त्याआधारे पुढील कारवाई होणार आहे, अशी माहिती पर्यावरण आणि वातावरणीय बदल मंत्री पंकजा मुंडे यांनी शुक्रवारी विधान परिषदेत ..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121