अतुल भातखळकर यांना विजयाचा विश्वास

    19-Nov-2024
Total Views | 51
Atul Bhatkhalkar

मुंबई : कांदिवली पूर्वचे महायुतीचे उमेदवार अतुल भातखळकर ( Atul Bhatkhalkar ) यांनी दि. २४ ऑक्टोबर रोजी निवडणुकीचा फॉर्म भरण्यासोबतच प्रचाराला सुरुवात केली होती. यानंतर त्यांनी कार्यकर्त्यांसोबत कांदिवलीत प्रचाराचा झंजावात उभा केला. दि. २४ ऑक्टोबर रोजीपासून ते सोमवार, दि. १८ नोव्हेंबर रोजीपर्यंत त्यांनी कांदिवलीत १६ हून रथयात्रा, २० हून पदयात्रा, असंख्य स्थानिक भेटी आणि संवाद, तीन जाहीर सभा, खुल्या चर्चा अशा सर्व माध्यमांतून प्रचार केला.

दरम्यान, भोजपुरीचे सुपरस्टार मनोज तिवारी, रवी किशन, दिनेश लाल यादव उर्फ निराहुआ सौराष्ट्राचे कविराज लोकसाहित्यकार राजबा गढवी यांनी कांदिवलीत अतुल भातखळकरांच्या समर्थात प्रचार केला. केंद्रीय उद्योग आणि वाणिज्य मंत्री तसेच उत्तर मुंबईचे खा. पीयूष गोयल यांनीदेखील अतुल भातखळकरांच्या समर्थानात प्रचार रॅली आणि व्हिडीओ मॅसेजच्या माध्यमातून मतदारांना आवाहन केले.

सोमवार, दि १८ नोव्हेंबर रोजी प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अतुल भातखळकरांसाठी आयोजित ‘भव्य विजय संकल्प’ रॅलीत (बाईक रॅली) मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री मोहन यादव यांनीही सहभाग घेतला होता. भाजपचे विधानसभा अध्यक्ष अप्पा बेलवलकर, विधानसभा प्रभारी सुधीर शिंदे, शिवसेनेचे माजी नगरसेवक आणि विधानसभा समन्वयक एकनाथ शंकर हुंडारे, माजी नगरसेवक शिवकुमार झा, सुनीता यादव, दक्षा पटेल, सुरेखा पाटील, संगीता शर्मा, सागर सिंहसोबतच भाजप आणि महायुतीचे पदाधिकारी कार्यकर्ते आणि मतदारांनी या बाईक रॅलीला उत्स्फूर्तपणे प्रतिसाद दिला. दरम्यान, अतुल भातखळकरांनी निवडणुकीच्या प्रचारात योगदानासाठी कार्यकर्ते आणि जनतेचे आभार मानले आहेत.

यावेळी भातखळकर म्हणाले की, “दहा वर्षांत माझा फोन नंबर बदलला नाही. तसा माझ्यातही कोणता बदल झालेला नाही. मी याआधी जसा लोकांची कामे करत होतो, तसा पुढे पाच वर्षे करत राहणार आहे, असा विश्वास मी तुम्हाला देतो. यासोबतच त्यांनी मतदारांना दि. 20 नोव्हेंबर रोजी न चुकता मतदान करावे,” असे आवाहन केले आहे.

अग्रलेख
जरुर वाचा
मुंब्रा रेल्वे दुर्घटनेबद्दल मुंबई उच्च न्यायालयाचे रेल्वे विभागाला खडेबोल! विचारले... या घटनेची जबाबदारी कुणाची?

मुंब्रा रेल्वे दुर्घटनेबद्दल मुंबई उच्च न्यायालयाचे रेल्वे विभागाला खडेबोल! विचारले... या घटनेची जबाबदारी कुणाची?

मुंब्रा लोकल स्थानकाजवळ ९ जून रोजी सकाळी ९.३० वाजताच्या सुमारास दुर्घटना घडली होती. दोन लोकल गाड्या एकमेकांजवळून जाताना लोकलच्या दारात लटकलेल्या प्रवाश्यांच्या बॅगा घासल्यामुळे ६ प्रवाशांचा रेल्वे रुळावर पडून मृत्यू झाला होता. या घटनेवर मुंबई उच्च न्यायालयाने गुरूवार दि. १९ जून रोजी प्रवाशांच्या मृत्यूंबाबत एका जनहित याचिकेवर सुनावणी करत असताना चिंता व्यक्त केली आणि मध्य रेल्वेने मुंबई लोकल गाड्यांमध्ये स्वयंचलित बंद दरवाजे बसवण्याचा विचार करावा, असा सल्ला दिला...

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121