मुंबई : ऑनलाईन गेमिंग, धर्मांतर प्रकरणं दिवसेंदिवस वाढताना दिसत आहेत. रोज एक नवी घटना समोर येत आहे. शिवाय, मणिपूर प्रकरणावरही विरोधक आक्रमक भुमिका घेत आहेत. या सर्व विषयांवरुन आ. नितेश राणेंनी विरोधकांना आरसा दाखवला. मणिपूर प्रकरणावर राजकारण करणाऱ्यांना ही त्यांनी सुनावलं. मणिपूरच्या घटनेच्या संदर्भात घटना निषेधार्यच आहे, कोणच समर्थन करू शकत नाही. विरोधकांना महिलांच्या संदर्भात चिंता आपल्याला वाटते, पण ही खरंच प्रामाणिक भावना आहे का? असा थेट सवाल राणेंनी उपस्थित केला.
नितेश राणे म्हणाले, "विरोधकांना मणिपूरच्या त्या घटनेबद्दल चिंता आहे, मग तीच चिंता राजस्थान मध्ये घडलेल्या घटनेबद्दल का वाटत नाही? सहा महिन्याचा एक लहान मुलगा राजस्थानमध्ये रामनगर जोधपूरमध्ये सहा महिन्याच्या मुलाला जाळून टाकलेलं आहे. दोन महिलांचा बलात्कार करून त्यांनाही जाळलेलं आहे. याबद्दल का कोण बोलत नाही? तेव्हा कायद्याची कुर्हाड का चालली नाही?"
"मुंबई आणि अन्य शहरांमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये हे जे रोहिंग्या आणि बांगलादेशी लोकं जे येऊन इथे बसले आहेत. त्यांच्या कुठे ना कुठेतरी आपल्याला त्यांचा शोध घेऊन आपल्याला आपलं राज्य आपल्या लोकांसाठी चालतंय का? आणि या लोकांना परत या राज्याकडून इथून बाहेर काढून आपल्या लोकांना सगळं अधिकार कसं मिळवून देऊ शकतो. यासाठी आपल्या सरकारने पावलं उचलली पाहिजे आणि त्यापद्धतीने पाऊलं उचलतायेत."
"धर्मांतर सारखे विषय हे कुठले राजकीय विषय नाही आहेत. कुठल्याही एका जातीधर्माचे विरोध नाही आहेत. आपण हा सामाजिक विषय म्हणून हाताळला पाहिजे. आपण असंख्यवेळी जेव्हा आपल्याला या घटना कानावर येतात तेव्हा आपल्याला कळतं या मुली कधी कधी आपल्याला पाकिस्तानमध्ये भेटतात कधी अफगाणिस्तानमध्ये भेटतात कधी सिरियासारख्या देशामध्ये भेटतात त्यांना जबरदस्ती करून लग्नाचं खोट स्वप्न दाखवून नेलं जातं."
"ऑनलाईन गेमिंग हा फार चिंतेचा विषय आहे. उत्तर प्रदेश असेल, गुजरात, कर्नाटक तिथे जसा विरोधी कायदा आहे. तशा पद्धतीचा एक सक्षम आणि कडक कायदा आमच्या राज्यामध्ये पण असावा." अशी मागणी राणेंनी यावेळी केली.