बाळासाहेब देसाईंप्रमाणे मी देखील लवकरच क्रांतिकारी निर्णय घेईन!

- राहुल नार्वेकरांचा सुचक इशारा

    08-Jun-2023
Total Views | 135
 
Rahul Narvekar
 
 
मुंबई : बाळासाहेब देसाई यांनी १९७७-७८ मध्ये विधानसभा अध्यक्ष म्हणून काम केलं. देसाई यांनी ज्या प्रमाणं क्रांतिकारी निर्णय घेतले. त्यातून काही तरी शिकून मी देखील लवकरच क्रांतिकारी निर्णय घेईन, असं राहुल नार्वेकर म्हणाले. लोकनेते बाळासाहेब देसाई यांच्या दौलत या चरित्र ग्रंथाच्या प्रकाशनाचा सोहळा राजभवनात पार पडला. यावेळी राज्यपाल रमेश बैस, मंत्री शंभूराज देसाई, गिरीश महाजन, मगंलप्रभात लोढा, दादा भुसे, गुलाबराव पाटील, नरहरी झिरवळ आणि विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर उपस्थित होते. दौलत या ग्रंथाचं लेखन मधुकर भावे यांनी केलं आहे. राहुल नार्वेकर यांनी यावेळी बोलताना मोठं वक्तव्य केलं.
 
नार्वेकर म्हणाले, "माझ्यासाठी या कार्यक्रमाला उपस्थित राहणं ही भाग्याची गोष्ट आहे. या पुस्तकाचं नाव अत्यंत योग्य आहे. पुढील पिढीसाठी हा ग्रंथ दौलत म्हणून असणार आहे. काही लोकं आपल्या कर्तुत्त्वातून कार्यातून आपल्याला घडवतात. काही लोकं आपल्या कर्तुत्त्वातून समाज घडवतात, देश घडवतात. लोकनेते बाळासाहेब देसाई हे त्यातलं एक व्यक्तिमत्व आहे. ज्यांनी आपल्या कार्यातून समाज घडवला, ज्यांनी आपल्या कार्यातून राज्य घडवलं. देसाई यांनी ज्या प्रमाणं क्रांतिकारी निर्णय घेतले. त्यातून काही तरी शिकून मी देखील लवकरच क्रांतिकारी निर्णय घेईन." असं राहुल नार्वेकर म्हणाले.
 
 
 
 
अग्रलेख
जरुर वाचा
लेखक जयेश मेस्त्री ’संत गाडगे महाराज बाल साहित्य पुरस्कार २०२५’ने सन्मानित!

लेखक जयेश मेस्त्री ’संत गाडगे महाराज बाल साहित्य पुरस्कार २०२५’ने सन्मानित!

संत गाडगे महाराज विचार मंच महाराष्ट्र राज्य आणि ज्ञानज्योत फाऊंडेशन महाराष्ट्र यांच्या वतीने देण्यात येणारा ’संत गाडगे महाराज बाल साहित्य पुरस्कार २०२५’ या वर्षी लेखक, साहित्यिक जयेश मेस्त्री यांना प्राप्त झाला आहे. दरवर्षी प्रमाणे या वर्षी देखील साहित्य क्षेत्रात उत्तम कामगिरी करणार्‍या साहित्यिकांचा गौरव करण्यात आला. दिनांक ०७ जून २०२५ रोजी पुणे येथील सदाशिव पेठेतील वेदशास्त्रोत्तेजक सभागृह येथे हा सुंदर सोहळा पार पडला. या प्रसंगी प्रसिद्ध उद्योजक डॉ. रामदास कुटे हे उद्घाटक म्हणून उपस्थित होते. तसेच ..

साताऱ्याच्या मातीत बहरणार ९९ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन!

साताऱ्याच्या मातीत बहरणार ९९ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन!

: मराठी साहित्यातील प्रतिष्ठीत मानल्या जाणाऱ्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनचा ९९ व्या सोहळा आगामी वर्षात साताऱ्यात पार पडणार आहे. ९९ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन आयोजन करण्याचा मान साताऱ्यातील महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या शाहूपुरी शाखेला आणि मावळा फौंडेशनला मिळणार आहे.अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाच्या पुणे येथे झालेल्या बैठकीत हा निर्णय एकमताने घेण्यात आला. अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे अध्यक्ष मिलिंद जोशी, उपाध्यक्ष गुरुय्या स्वामी, कार्यवाह सुनिताराजे पवार, कोषाध्यक्ष विनोद ..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121