"वरुण सरदेसाईंवरील आरोपांमुळे देशपांडेंवर हल्ला?"

संदीप देशपांडेंचा मनसुख हिरेन करण्याचा प्रयत्न - नितेश राणेंचा खळबळजनक दावा

    03-Mar-2023
Total Views | 207

Varun Sardesai

संदीप देशपांडे vs वरुण सरदेसाई


मुंबई
: मनसे नेते संदीप देशपांडे यांच्यावर शिवाजी पार्कवर मॉर्निंग वॉकला गेले असताना हल्ला झाला. याबाबत भाजप आमदार नितेश राणे यांनी गंभीर आरोप केले आहेत. युवासेना सचिव वरूण सरदेसाई यांच्याकडे संशयाची सुई जात असल्याचा गौप्यस्फोट नितेश राणे यांनी केला आहे.


वरुण सरदेसाईंवर मनसेतर्फे संदीप देशपांडेंनी अनेक आरोप केले आहेत. त्यामुळेच हा हल्ला झाला, असा आरोप नितेश राणे यांनी केला आहे. देशपांडेंचा सुशांत सिंह राजपुत, दिशा सालियन, मनसुख हिरेन करणार होतात का? संबधितांची चौकशी झाली पाहीजे, अशी मागणी नितेश राणे यांनी केली आहे.
नेमकं काय घडलं?

संदीप देशपांडे नेहमीप्रमाणे मॉर्निंग वॉकला गेले असताना अचानक चार अज्ञातांनी त्यांच्यावर हल्ला केला. लोखंडी रॉड आणि स्टम्पने मारहाण करत देशपांडेंना खाली पाडले. यावेळी देशपांडेंना प्रतिकारही करता आला नाही. चौघेही तोंडावर मास्क लावून आले होते. त्यानंतर पसार झाले. हल्ल्यात जखमी देशपांडेंवर हिंदुजा रुग्णालयात उपचार करण्यात आले. त्यानंतर त्यांना घरी पाठवण्यात आले आहे.
संदीप देशपांडेंची हल्ल्यानंतर प्रतिक्रीया

संदीप देशपांडेंनी हल्ल्यानंतर प्रतिक्रीया दिली आहे. हिंदूजा रुग्णालयाच्या आवाराबाहेर आल्यावर माध्यमांनी त्यांना या संदर्भात विचारणा केली. मी कुणालाही घाबरणारा नाही, माझे काम मी सुरूच ठेवणार, असेही ते म्हणाले.






अग्रलेख
जरुर वाचा
क्रीडा विद्यापीठ: क्रीडा क्षेत्रातील एक महत्वपूर्ण पायरी

क्रीडा विद्यापीठ: क्रीडा क्षेत्रातील एक महत्वपूर्ण पायरी

भारतात केंद्रीय पातळीवर नवीन विद्यापीठ स्थापन करण्याची प्रक्रिया मुख्यत्वे शिक्षण मंत्रालय आणि त्याखालील उच्च शिक्षण विभाग यांच्या मार्गदर्शनाखाली केली जाते. यासंदर्भात विद्यापीठाच्या मान्यता आणि गुणवत्ता सुनिश्चित करण्यासाठी ‘विद्यापीठ अनुदान मंडळ’ (णॠउ)देखील महत्त्वाची भूमिका बजावते. तसेच, जर एखादे विद्यापीठ राज्यस्तरीय किंवा खासगी स्वरूपाचे असले, तर संबंधित राज्याचा उच्च शिक्षण विभाग किंवा राज्य सरकारचा इतर संबंधित विभाग अथवा संस्था त्यांच्यासोबत समन्वयाच्या भूमिकेत आवश्यक मंजुरी व नियमनासाठी कार्य ..

ब्रिटिश पारतंत्र्याच्या काळातील भारतीय शिक्षणव्यवस्था

ब्रिटिश पारतंत्र्याच्या काळातील भारतीय शिक्षणव्यवस्था

प्राचीन भारतीय शिक्षणव्यवस्था कशा प्रकारची होती आणि सांस्कृतिक पुनरुज्जीवनासाठी त्या व्यवस्थेच्या विविध आयामांचे आकलन का महत्त्वाचे आहे, हे आपण पाहिले. अब्राहमिक विचाराधारांशी संघर्ष झाल्यावर या व्यवस्थेला उतरती कळा कशी लागली, याही विषयाचा थोडयात आढावा आपण घेतला. वसाहतवादाचा शिक्षणावरील परिणाम हा एक समग्र ८०० ते एक हजार वर्षांच्या कालखंडाचा इतिहास आहे. परंतु, ब्रिटिश वसाहतवाद हा एक प्रकारचा सैद्धांतिक वर्चस्ववादही असल्याने या कालखंडातील शैक्षणिक अधोगतीला अनेक पैलू जोडले जातात. ब्रिटिशांचे पारतंत्र्य व ..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121