ठाणेकरांनो पाणी जपून वापरा! झोनिंगद्वारे होणाऱ्या पाणीपुरवठ्यात कपात

    17-Nov-2023
Total Views | 33
Thane Municipal Corporation Water reduction

ठाणे :
ठाणे महापालिकेस भातसा नदीवरील पिसे बंधाऱ्यातून २५० द.ल.लि. प्रतिदिन पाणीपुरवठा करण्यात येत आहे. बृहन्मुंबई म.न.पा मार्फत पिसे येथील न्यूमॅटिक गेट सिस्टिममधील एअर ब्लॅडर बदलण्याचे काम दि.२० नोव्हे. ते ०२ डिसे. या कालावधीत हाती घेण्यात येणार आहे, परिणामी या दरम्यान बंधाऱ्यातील पाण्याची पातळी कमी होणार आहे. त्यामुळे ठाणे महापालिकेस बृहन्मुंबई महापालिकामार्फत होणाऱ्या पाणीपुरवठ्यात १० टक्के कपात लागू होणार आहे. त्यामुळे कोपरी, हाजुरी, गावदेवी, पांचपाखाडी, टेकडीबंगला, किसननगर, भटवाडी या भागात झोनिंगद्वारे १० टक्के पाणी कपात लागू होणार आहे.

तसेच पिसे बंधाऱ्यातील पाण्याची पातळी कमी होणार असल्याने १० टक्के पाणी कमी उपलब्ध होणार असल्यामुळे ठाणे शहरातील दर पंधरा दिवसातून झोनिंगद्वारे होणाऱ्या पाणी कपातीची वेळ वाढवून १२ तास ऐवजी २४ तास करण्यात येत आहे. त्यामुळे नागरिकांनी पाणी कपातीपूर्वी पाण्याचा आवश्यक साठा करुन ठेवावा. तसेच कपातीच्या कालावधीत काटकसरीने पाणी वापरुन सहकार्य करावे. असे आवाहन ठाणे महापालिकेच्या पाणी पुरवठा विभागामार्फत करण्यात येत आहे.

अग्रलेख
जरुर वाचा
गोरेगाव-मुलुंड जोड रस्त्याच्या भुयारी कामाला वेग राष्ट्रीय उद्यानातील वन खात्‍याची १९.४३ हेक्‍टर जागा बीएमसीकडे वळती - केंद्रीय पर्यावरण, वन व वातावरणीय बदल मंत्रालय यांची अंतिम मान्‍यता

गोरेगाव-मुलुंड जोड रस्त्याच्या भुयारी कामाला वेग राष्ट्रीय उद्यानातील वन खात्‍याची १९.४३ हेक्‍टर जागा बीएमसीकडे वळती - केंद्रीय पर्यावरण, वन व वातावरणीय बदल मंत्रालय यांची अंतिम मान्‍यता

मुंबईतील पूर्व आणि पश्चिम उपनगरांना जोडणाऱ्या महत्वाकांक्षी गोरेगाव - मुलुंड जोड रस्ता प्रकल्प (तिसरा टप्पा) अंतर्गत बोरिवली येथील संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाखालून जाणाऱ्या जुळ्या बोगद्याच्या बांधणीला आता गती मिळणार आहे. प्रत्येकी ४.७ किलोमीटर अंतराच्या आणि ४५.७० मीटर रुंदीच्‍या जुळ्या बोगद्यासाठी आवश्‍यक असलेली १९.४३ हेक्‍टर वनजमीन बृहन्‍मुंबई महानगरपालिकेकडे वळती करण्‍यास केंद्रीय पर्यावरण, वन व वातावरणीय बदल मंत्रालय यांची अंतिम मान्‍यता मिळाली आहे. त्‍यानुसार, अटी व शर्तींचे अनुपालन तसेच पूर्ततेची ..

राज्यातील १८ हजार शाळांमध्ये पटसंख्या २० पेक्षा कमी

राज्यातील १८ हजार शाळांमध्ये पटसंख्या २० पेक्षा कमी

१ हजार ६५० गावांमध्ये प्राथमिक, तर ६ हजार ५५३ गावांमध्ये उच्च प्राथमिक शाळा नाहीत राज्यातील एक लाखांहून अधिक शाळांपैकी सुमारे १८ हजार शाळांमध्ये विद्यार्थ्यांची संख्या २० पेक्षा कमी आहे. तर १ हजार ६५० गावांत प्राथमिक आणि ६ हजार ५५३ गावांत उच्च प्राथमिक शाळा उपलब्ध नाहीत. विद्यार्थी संख्येत घट झाली असली, तरी त्या शाळा सुरूच राहतील आणि त्या ठिकाणी शिक्षणात अडथळा येणार नाही, याची संपूर्ण काळजी घेतली जाईल. ज्या ठिकाणी विद्यार्थ्यांची संख्या वाढत आहे, तेथे अतिरिक्त शिक्षकांचे समायोजन करण्यात येत असल्याची माहिती ..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121