डोंबिवली : भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचा 'महा विजय २०२४' संपर्क अभियानांतर्गत घर चलो अभियान कार्यक्रमात नागरिकांसोबत संवाद साधला. या संवादातून त्यांनी नागरिकांच्या मनातील पंतप्रधान कोण आहे हे जाणून घेण्याचा प्रयत्न केला. यावेळी सर्वात जास्त पसंती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नावाला मिळाल्याचे दिसून आले.
डोंबिवलीतील छत्रपती शिवाजी महाराज पुतळा येथून घर चलो अभियानाला सुरुवात झाली. त्यानंतर इंदिरा गांधी चौक, बाजी प्रभू चौक मार्गे फिरून आप्पा दातार चौकात सांगता झाली. या अभियानांतर्गत महिला , व्यापारी, विक्रेते, लहान मुलांशी संवाद साधला. या अभियानात अमृत कलश रथ,महिला लेझीम पथक, ढोलताशा पथक सहभागी झाले होते.
पिटुकल्या लुभदालाही हवेत मोदीजी!
डोंबिवली येथील फडके रोडवर 'घर चलो अभियान' सुरू असताना एका दुकानाच्या पायरीवर लुभदा नावाची ही पिटुकली तिच्या आईच्या कडेवरून ही जनसंपर्क यात्रा बघत होती. ढोलपथकाच्या व लेझीमच्या तालावर तल्लीन लुबदा मोदीजी मोदीजी असा घोष करत होती. या गर्दीतही या चिमुकलीने बावनकुळे यांचे लक्ष वेधून घेतले. जवळ गेल्यावर हातातील माईक ओढून आपल्या छोटुश्या हाती घेतला. बावनकुळे यांनी तिला कडेवर घेतले व विचारले.तुला काय हवे? त्यावर तीने मोदी यांचे नाव घेताच एकच उत्साह पसरला.
मोदींनी महिलांना सन्मान दिला
पंतप्रधान मोदी यांनी महिलांना सन्मान मिळवून देण्यासाठी संसदेत महिला आरक्षण बील पारित केले. यामुळे संसदेत महिलांना ३३ टक्के आरक्षण मिळणार आहे. देशातून १९० हून अधिक खासदार तर राज्यात १०० हून अधिक आमदार जनतेचे प्रतिनिधीत्व करणार आहे. मोदीजींच्या योजनांमुळे शेतकरी, कष्टकरी, व्यापारी व सर्वच घटकांना फायदा होत आहे. विश्वकर्मा योजनेमुळे कारागिरांचा फायदा होणार असल्याचेही ते म्हणाले.
साडेतीन लाख घरी पोहचा
बावनकुळे यांनी त्यांच्या प्रवासाची सुरुवात डोंबिवली येथील ब्राह्मण हॉल येथून केली. डोंबिवली, मुंब्रा व कल्याण आणि उल्हासनगर येथील टाऊन हॉल येथे उल्हासनगर व अंबरनाथ विधानसभा क्षेत्रातील प्रमुख पदाधिकारी तसेच ‘सुपर वॉरिअर्स’ यांच्याशी संवाद साधला. कल्याण लोकसभा क्षेत्रातील साडेतीन लाख घरी पोहचून मोदी सरकारच्या योजनांची माहिती द्यावी, असे आवाहन केले. डोंबिवली येथे पंतप्रधान मोदी यांच्या ‘मन की बात’ कार्यक्रमात कार्यकर्त्यांसह उपस्थिती लावली.
जनतेतून मिळाले जोरदार समर्थन
डोंबिवली व उल्हासनगर येथे ते संपर्क से समर्थन अभियानांतर्गत ‘घर चलो मोहीमेत’ सहभागी झाले व जनतेशी हितगुंज केली व पंतप्रधान मोदी यांच्यासाठी समर्थन मागितले. डोंबिवली येथे मेरी माटी मेरा देश अभियानात सहभागी होत जनतेशी संवाद साधला.