भारतातील तीर्थक्षेत्रांमध्ये दसरा उत्सवाचे वैविध्य!

    24-Oct-2023
Total Views | 45

Dussehra


मुंबई :
संपुर्ण देशात मोठ्या उत्साहात दसरा साजरा केला जातो. देशात अनेक तीर्थक्षेत्र आहेत. या तीर्थक्षेत्रांमध्ये अनेक प्रकारे दसरा साजरा करण्यात येतो. कोणत्या तीर्थक्षेत्रावर कशाप्रकारे दसरा साजरा करतात याबाबत जाणून घेऊया..
 
१) वाराणसी
 
वाराणसीमध्ये दरवर्षी अतिशय उत्साहात दसरा साजरा केला जात असतो. गेल्या अनेक दशकांपासून वाराणसीतील बीएलडब्ल्यू मैदानावर दसऱ्याच्या दिवशी रावण दहन केले जाते. यावेळी पूर्वांचलमधील रावण, कुंभकर्ण आणि मेघनाद यांचा सर्वात मोठा पुतळा जाळला जातो. यादिवशी गंगा नदीची पूजा करण्यासाठी अनेक लोक येतात.

varanasi
 
२) कुल्लू
 
कुल्लू येथील दसरा भारतभर प्रसिद्ध आहे. याठिकाणी आठवडाभरापुर्वीच दसऱ्याची तयारी सुरु होते. इतर ठिकाणांप्रमाणे येथेही या उत्सवाची तयारी आठवडाभर आधीच सुरू होते. यादिवशी सर्वजण ढोल, ताशा, बासरीसह ज्याच्याकडे जे वाद्य असेल ते घेऊन तो बाहेर पडतो. तसेच डोंगराळ भागातील लोक मोठ्या थाटामाटात आपल्या ग्रामदेवतेची मिरवणुक काढत पूजा करतात.


kullu

 
३) कोटा
 
राजस्थानमधील कोटा येथील दसरा सण संपूर्ण देशात प्रसिद्ध असून असंख्य लोक येथील रावण दहन पाहण्यासाठी येतात. कोटा येथील जेठी समाजाची दसरा साजरा करण्याची स्वतःची एक खास परंपरा आहे. या परंपरेनुसार आखाड्यातील मातीपासून रावण तयार करून विजयादशमीला पायदळी तुडवला जातो.


kota
 
४) म्हैसूर
 
दसरा म्हटलं की, म्हैसूर आलंच. म्हैसूरमध्ये अतिशय अनोख्या पद्धतीने दसरा साजरा करण्यात येतो. म्हैसुरला १५ व्या शतकापासून दसऱ्याची परंपरा लाभली आहे. म्हैसूर पॅलेसमध्ये हा दसरा उत्सव साजरा करण्यात येतो. यावेळी नृत्य, संगीत आणि दसऱ्याशी संबंधित पौराणिक कथांचे वर्णन करण्यात येते.


kota


अग्रलेख
जरुर वाचा
कोंकण प्रादेशिक आंतरपरिमंडलीय नाट्य स्पर्धेत भांडुप परिमंडलाचे

कोंकण प्रादेशिक आंतरपरिमंडलीय नाट्य स्पर्धेत भांडुप परिमंडलाचे 'कुसुम मनोहर लेले' नाटकाने पटकाविले द्वितीय स्थान!

महावितरणच्या कोंकण प्रादेशिक आंतरपरिमंडलीय नाट्य स्पर्धेत भांडुप परिमंडलाचे ‘कुसुम मनोहर लेले’ या नाटकाने द्वितीय स्थान पटकाविले आहे. तर रत्नागिरी चे नाटक आवर्त; हे नाटक विजेते ठरले आहे. २० जून २०२५ रोजी छत्रपति संभाजी राजे नाट्यमंदिर येथे ही स्पर्धा उत्साहात पार पडली. महावितरणचे संचालक (मा सं) श्री. राजेंद्र पवार यांच्या शुभहस्ते नाट्य स्पर्धेतील विजेत्यांना पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. मुख्य अभियंता डॉ. मनीष वाठ, जळगावचे मुख्य अभियंता श्री. इब्राहीम मुलाणी, महाव्यवस्थापक (मा सं) श्री. राजेंद्र पांडे, ..

गंगापूर धरणातील विसर्गात घट१ हजार ७६० क्युसेकने विसर्ग घटविला

गंगापूर धरणातील विसर्गात घट१ हजार ७६० क्युसेकने विसर्ग घटविला

मागील तीन ते चार दिवसांपासून गोदावरी नदीला आलेला पूर काही अंशी ओसरणार असून गंगापूर धरणातून सुरुअसलेला विसर्ग घटविला जाणार आहे. सध्या ६ हजार १६० क्युसेकने सुरु असलेला विसर्गमंगळवार दि. २४ जून रोजी दुपारी २ वाजता १ हजार ७६० क्युसेकने कमी करण्यात आलाअसून ४ हजार ४०० क्युसेक इतका सुरु राहील, असे जलसंपदा विभागाने स्पष्ट केले. मागीलसहा ते सात दिवसांपासून पाणलोट क्षेत्र, घाटमाथा आणि जिल्ह्यात सर्वदूर पाऊस सुरुअसल्याने नदी-नाले दुथडी भरुन वाहायला लागले. त्यामुळे जिल्ह्यातील सर्वच २४धरणांमधील जलसाठ्यात चांगलीच वाढ ..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121