कंत्राटी पद्धतीने तहसीलदार भरती होणार नाही! 'ती' जाहिरात रद्द

    02-Oct-2023
Total Views | 60
Government of Maharashtra Contractual Talathi Bharti Opposed

मुंबई :
राज्य शासनाच्या वतीने राज्यात नोकरभरती करण्यात येत आहे. राज्य शासनाने सदर भरती कंत्राटी पध्दतीने करण्याचे योजिले होते. त्यामुळे राज्य शासनाच्या वतीने कंत्राटी पद्धतीने तहसीलदार, नायब तहसीलदार नियुक्त करण्याबाबत प्रसिद्ध झालेल्या जाहिरातीवरून टीका झाल्यानंतर ही जाहिरात रद्द करण्याचे आदेश महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिले आहेत.

दरम्यान, जळगाव जिल्ह्यात कंत्राटी पद्धतीने तहसीलदार नियुक्त करण्याबाबत ही जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली होती. त्याला उमेदवारांकडून विरोध करण्यात आला. तसेच, कंत्राटी पद्धतीने तहसीलदार भरण्याचे शासनाचे धोरण नाही. राष्ट्रीय प्रकल्पांच्या भूसंपादनासाठी अनुभवी निवृत्त अधिकाऱ्यांना मदतीला घेतले जाते. मात्र त्याची जाहिरात प्रसिद्ध झाल्याने कंत्राटी पद्धतीने तहसीलदार भरले जाणार असा गैरसमज झाल्याचे स्पष्टीकरण जळगाव जिल्हाधिकाऱ्यांनी दिले.

त्याचबरोबर, तात्काळ ती जाहिरात रद्द करा, अशा स्पष्ट सूचना जळगाव जिल्हाधिकाऱ्यांना देऊन याबाबत सविस्तर खुलासा मागविल्याचेही विखे पाटील यांनी सांगितले. राज्यातील विविध रिक्त पदांसाठी होणाऱ्या भरतीकरिता कंत्राटी पध्दतीस विरोध करण्यात येत आहे.

अग्रलेख
जरुर वाचा

'फंडींगशिवाय असा हल्ला...'; ५५ दिवस मौन बाळगल्यानंतर पहलगाम हल्ल्यावर 'एफएटीएफ'चे मोठे विधान!

काश्मीरच्या पहलगाम येथे दि. २२ एप्रिल रोजी इस्लामिक दहशतवादी हल्ला झाला. या हल्ल्यानंतर भारताने दहशतवाद पोसणाऱ्या पाकिस्तानला ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून चोख प्रत्युत्तर दिले. जगातील बहुतेक राष्ट्र आणि काही आंतरराष्ट्रीय स्तरावरील संस्था भारताच्या बाजूने दहशतवादाविरोझात उभ्या आहेत. यातच आता फायनान्शियल अॅक्शन टास्क फोर्स (एफएटीएफ) ने देखील हल्ल्याचा निषेध केलाय. पहलगामसारखा हल्ला कोणत्याही फंडींगशिवाय (निधीशिवाय) होऊ शकत नाही, असे एफएटीएफने म्हटले आहे. या सदर्भातील निवेदन एफएटीएफने नुकतेच जारी केले आहे...

सामान्य लोकांना भारतीय मूल्यांवर आधारित दर्जेदार शिक्षण देण्यात ‘विद्या भारती’ची अतुलनीय भूमिका - केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांचे प्रतिपादन

सामान्य लोकांना भारतीय मूल्यांवर आधारित दर्जेदार शिक्षण देण्यात ‘विद्या भारती’ची अतुलनीय भूमिका - केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांचे प्रतिपादन

“शिशु मंदिर हे ओडिशाच्या शिक्षण विभागातील नाडीसारखे आहे. ‘विद्या भारती’ आणि ‘शिक्षा विकास समिती’द्वारे चालवले जाणारे सरस्वती शिशु विद्या मंदिर, भारतीय पद्धती आणि मूल्यांवर आधारित सामान्य लोकांना दर्जेदार शिक्षण देण्यात अतुलनीय भूमिका बजावते,” असे प्रतिपादन केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी केले. ओडिशाच्या कटक जिल्ह्यातील सरस्वती विद्या मंदिरात ‘विद्या भारती’ आणि ‘शिक्षा विकास समिती’द्वारा आयोजित प्रदेशिका प्राचार्य परिषदेच्या समारोपादरम्यान ते बोलत होते...

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121