"ज्यांनी ज्यांनी शिवसेना पक्ष सोडला त्यांना बाळासाहेबांची हाय लागली" : सुनील राऊत

    07-Aug-2022
Total Views | 66

sunil raut 
 
 
मुंबई : शिवसेना पक्ष हा हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरेंचा पक्ष आहे. त्यांनी हा पक्ष कसा बांधला? किती कष्ट करून पक्ष बांधला? हे सर्वांनाच माहित आहे. ज्यांनी ज्यांनी शिवसेना पक्ष सोडला आहे त्यांना बाळासाहेब ठाकरे यांची हाय लागली आहे, असे वक्तव्य शिवसेनेचे आमदार सुनील राऊत यांनी केले आहे.
 
तसेच,"उद्धव ठाकरेंनी जेव्हा वर्षा हे शासकीय निवासस्थान सोडले त्यावेळी प्रत्येक महिलांच्या डोळ्यात अश्रू आले होते. हे अश्रू म्हणजे या चाळीस जणांना लागलेली हाय आहे. त्याचा न्याय होईलच," असे सुनील राऊतांनी म्हटले आहे. दरम्यान, देशातील सर्व कायदेतज्ञ म्हणतात एक तर शिंदे गट निलंबित होईल किंवा त्यांना दुसऱ्या एका पक्षात विलीन व्हावे लागले, असेही सुनील राऊतांनी स्पष्ट केले आहे.
 
त्याचप्रमाणे या सरकारचे सर्व निर्णय दिल्लीत होत असतात. आता बघूया दिल्लीतून काय निर्णय येतो. मंत्रिमंडळाचा विस्तार लवकरच होणार असे म्हणत आहे. परंतु विस्तार झालेला नाही. हेच मी कधीपासून ऐकत असल्याचे म्हणत सुनील राऊतांनी शिंदे गटावर खोचक टीका केली आहे. तसेच ‘तारीख पे तारीख’ असेच सुरू आहे. मंत्रिमंडळाचा विस्तार झाल्यावर बोलू, असा टोलाही त्यांनी शिंदे गटाला लगावला आहे.
अग्रलेख
जरुर वाचा
बांग्लादेशातसूफी परंपरा धोक्यात! कट्टरपंथींचा हैदोस; देशाच्या सांस्कृतिक वारशालाही मोठा धक्का

बांग्लादेशातसूफी परंपरा धोक्यात! कट्टरपंथींचा हैदोस; देशाच्या सांस्कृतिक वारशालाही मोठा धक्का

बांग्लादेशमध्ये सूफीइस्लामशी निगडित पवित्र स्थळांवर इस्लामिक कट्टरपंथींनी हल्ले सुरू केल्याचे निदर्शनास आले आहे. हे हल्ले इतके भीषण आहेत की १०० पेक्षा जास्त मजार व दर्गे लक्ष्य बनले शेख हसीना यांच्या सरकारचा पडाव झाल्यानंतर या घटना आणखीन वाढल्या. मोहम्मद यांच्या अंतरिम सरकारने अद्याप त्यावर ठोस पावले उचलली नसल्याचे दिसून येत आहे. या हल्ल्यांमुळे केवळ धार्मिक स्थळांचे नुकसान होत नाही, तर देशाच्या सांस्कृतिक वारशालाही मोठा धक्का बसत आहे. शतकानुशतकेबांग्ला संस्कृतीचा अविभाज्य भाग असलेली सूफी परंपरा आता धोक्यात..

देशाच्या विकासात प्रत्येकाचा वाटा हेच मोठे परिवर्तन - राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे अखिल भारतीय प्रचार प्रमुख सुनील आंबेकर यांचे प्रतिपादन

देशाच्या विकासात प्रत्येकाचा वाटा हेच मोठे परिवर्तन - राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे अखिल भारतीय प्रचार प्रमुख सुनील आंबेकर यांचे प्रतिपादन

"देशातील प्रत्येकजण अर्थव्यवस्थेसाठी, आपल्या समाजासाठी आणि विकासप्रक्रियेकरीता आपला वाटा उचलत आहे. हेच आपल्या देशात घडलेले सर्वात मोठे परिवर्तन आहे," असे प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे अखिल भारतीय प्रचार प्रमुख सुनील आंबेकर यांनी केले. शुक्रवार,दि.१९ रोजी नॅशनल स्टॉक एक्स्चेंज येथे ऑर्गनाईसद्वारे आयोजित आणि एनएसईच्या सहकार्याने 'अर्थायम- धार्मिक मॉडेल ऑफ डेव्हलपमेंट' या परिसंवादाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी पंडित दीनदयाळजी उपाध्याय यांच्या 'एकात्म मानव दर्शन'च्या ६० व्या वर्षाचे स्मरण करत विचारप्..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121