ठाकरे सरकारने प्रभाग बदल्याने गोंधळ

रामदास आठवले यांचे वक्तव्य

    25-Aug-2022
Total Views | 58
 ramdas athawale
 
 
पुणे : राज्यातील महापलिका निवडणूक लवकर व्हाव्यात हीच आमची ईच्छा आहे. पण आधीच्या ठाकरे सरकाराने प्रभाग बदलले आणि सगळा गोंधळ झाला. त्यामुळे निवडणुका लांबणीवर पडल्या आहेत. आधीच्या सरकारने घेतलेल्या निर्णयाने अनेक अडचणी आल्या. पण आता शिंदे सरकार सगळ्या गोष्टी नीट करत आहेत. डिसेंबर अखेरपर्यंत राज्यातील महापालिकेच्या निवडणुका होतील, अशी शक्यता रामदास आठवले यांनी वर्तवली आहे.
 
 
पुण्यातील बालगंधर्व रंगमंदिरात रिपाइंचा मेळावा झाला. यावेळी रामदास आठवले यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले. शक्यता वर्तवली आहे. आधी शिवसेना ही भाजप आणि आरपीआयसोबत होती. पण मधल्या काळात आमच्यापासून दूर गेली. पण आता खरी शिवसेना आमच्या सोबतच आहे.
 
 
आम्ही एकनाथ शिंदे गट आणि भाजपसोबत युती करून स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका लढणार आहोत. दरम्यान, 50 खोके, एकदम ओके, खेळत बसा तुम्ही एक्के, आम्ही आहोत पक्के, अशा चारओळीच खा. आठवले यांनी ऐकवून विरोधकांना उत्तर दिले. विरोधक आमचं सरकार पाडण्यासाठी प्रयत्न करत आहे, मात्र तुम्ही काही केलं तरी आमचं सरकार पडणार नाही. सगळ्या निवडणुकीत आम्ही निवडून येऊ आणि सरकार स्थापन करू. विरोधक बदनाम करण्याचा प्रयत्न करत आहेत, असा हल्लाबोल त्यांनी केला.
 
 
 
 
 
अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121