पर्यावरणवादी बालहट्टाच्या दुर्बुद्धीचा फटका मुंबईकरांना

आ अमित साटम यांनी आदित्य ठाकरेंना फटकारले

    23-Aug-2022
Total Views | 133
amit
 
 

मुंबई: "तुमच्या राजकारणामुळे, पर्यावरणवादी बालहट्टाच्या दुर्बुद्धीमुले मुंबईकरांना हा फटका बसला आहे. मुंबई मेट्रो कारशेडच्या कामात वृक्षतोडीमुळे पर्यावरणाला हानी पोहोचत असल्याचे कारण देत विरोध केला. मात्र मुंबईतील पवई तलावात सायकल ट्रॅक बांधताना पर्यावरण आठवले नाही का ?" असा सवाल आमदार अमित साटम यांनी उपस्थित केला.


पवई सायकल ट्रॅकचा मुंबई महानगरपालिकेचा हट्ट कायम


माजी पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांचा ‘ड्रीम प्रोजेक्ट’ असलेल्या पवई तलावातील ‘सायकल ट्रॅक’मुळे, मगरींच्या अधिवासावर गदा येणार आहे. तसेच ‘आयआयटी मुंबई’ सारख्या संवेदनशील शिक्षण संस्थांच्या सीमेवर खुला प्रवेश ठेवणे सुरक्षेच्या दृष्टिकोनातून योग्य आहे का? याचा विचारही न करता महापालिकेने ‘सायकल ट्रॅक’ बांधण्यासाठी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. पवई तलाव परिसरातील आंबेडकर उद्यानालगत असलेल्या पाण्यात ५० मीटरहून अधिक लांबीपर्यंतचा खडी-दगडांचा भराव घालून बेदरकारपणे ‘सायकल ट्रॅक’च्या बांधण्यास सुरुवात झाली होती.

हा बांधकामाधिन असलेल्या 'जॉगिंग’ आणि ‘सायकल ट्रॅक' मुंबई उच्च न्यायालयाने यावर्षी दि. ६ मे रोजी बेकायदेशीर ठरवला होता. तसेच तलावाच्या पाणलोट क्षेत्रात कुठेही बांधकाम न करण्याचे निर्देश बृहनमुंबई महानगरपालिकेला दिले होते. केलेले बांधकाम तत्काळ हटवून तलाव क्षेत्र पूर्ववत करण्यास सांगितले होते. तसे न करता, मुंबई महापालिकेने मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशाचे उल्लंघन केले आहे. उलटपक्षी, सर्वोच्च न्यायालयात या याचिकेला आव्हान देणारी याचिका दाखल केली आहे.


हे पाणथळ नियमावलीचे उल्लंघन

याच सायकल ट्रॅकच्या बांधकामावरून आमदार अमित साटम यांनी माजी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्यावर नाव न घेता जोरदार टीका केली. यावेळी बोलताना अमित साटम म्हणाले, मुंबईतील पवई तलावात सायकल ट्रॅक बांधताना पर्यावरण आठवले नाही का ? मुंबई हायकोर्टने हे काम थांबविण्याचे आदेश दिले. त्या तलावात इंडियन मार्ष क्रोकोडाईल त्या तलावात आहेत. त्याठिकाणी भराव टाकून पिलर उभारणं म्हणजे हे पाणथळ नियमावलीचे उल्लंघन आहे. हायकोर्टाने पवई लेकमधील काम थांबविले असल्याचेही साटम यांनी यावेळी नमूद केले.


मेट्रो ३चे काम थांबवून मुंबईतील पर्यावरणाचा ऱ्हास केला

पुढे ते म्हणाले, या माझ्याच मतदार संघातून मेट्रो जाते. मात्र १९९९ ते २०१४ मुंबई शहरात केवळ १ मेट्रो झाली. ९ किलोमीटरची अंधेरी ते घाटकोपर धावणारी एक मेट्रो धावली. मात्र २०१४ ते २०१९च्या केवळ ५ वर्षाच्या कार्यकाळात २८६ किलोमीटरचं केवळ मुंबईच नाही तर उपनगरांना जोडणारे मेट्रोचे जाळे देवेंद्र फडणवीस यांच्या मुख्यमंत्री पदाच्या कार्यकाळात विस्तारले गेले. मुंबईकर उत्सुक होता कारण मेट्रो येणार, काम वेगाने सुरु झाले होते. पिलरही उभे राहत होते. मात्र त्याचवेळी २७०० झाडांकरिता त्या मेट्रो कारशेडचे काम थांबविण्यात आले.



पर्यावरण, क्लायमेट चेंज ऍक्शन चेंज प्लॅन, आंतरराष्ट्रीय समिट यासगळ्या गप्पा सुरु झाल्या. मात्र पर्यावरच्या गप्पा मानणाऱ्यानी इ तरी शिकून घ्या. २७०० झाड जितकं कार्बन उत्सर्जन एका वर्षात शोषून घेतात. तेच काम २८६ किलोमीटरची मेट्रो ४ दिवसात करते. म्हणजे २७०० झाडांच्या नावावर मुंबई मेट्रोचे काम थांबवून मुंबईतील पर्यांवरणाचा ऱ्हास करण्याचे काम केले आहे. पर्यावरणाच्या नावाखाली मुंबईतील ग्रीन मास ट्रान्सपोर्टेशन सिस्टम रोखण्याचे पाप केलं आहे. १० हजार कोटींचा खर्च वाढला आहे. जे तिकीट मुंबईकरांना १५ रुपये असतं ते आता २० रुपये पडणार आहे. तुमच्या राजकारणामुळे, पर्यावरणवादी बालहट्टाची दुर्बुद्धीममुळे मुंबईकरांना हा फटका बसणार आहे, असे म्हणत साटम यांनी आदित्य ठाकरेंवर टीका केली.
 
 


 
 
 
 
अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121