शिवसेनेचे लोक आमचं पाणी बंद करतात!

सांताकुझमध्ये पाणी प्रश्नांवर मनसेचा आक्रोश मोर्चा

    11-Aug-2022
Total Views | 110
MNS Vakola
 
 
मुंबई : मुंबईतील पाणी १०० टक्के स्वच्छ असल्याचा दावा गेल्या वर्षी पालिकेने केला होता. पण सांताकुझच्या डिमोलो कम्पांऊड, सुब्रमणयम नगर, वाघरी पाडा, मिंलिद नगर, गावदेवी या भागातील नागरिकांना अनेक महिन्यांपासुन अस्वच्छ पाणी मिळत आहे. याविषयी स्थानिकांनी वांरवार लोकप्रतिनिधी आणि पालिकेच्या आधिकाऱ्यांना तक्रारी, निवेदन, अर्ज करुनही कोणतेही उपाययोजना केली जात नव्हती. यासमस्येच्या विरोधात स्थानिक नागरिक आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने बुधवार, दि. १० ऑगस्टला पालिकेच्या एच पुर्व प्रभाग कार्यालयावर आक्रोश मोर्चा काढला.
 
 
याआंदोलनात स्थानिक नागरिकांचा मोठ्या प्रमाणात सहभाग होता. गेल्या अनेक महिन्यांपासुन वाकोल्यातील डिमोलो कम्पांऊड, सुब्रमणयम नगर, वाघरी पाडा, मिंलिद नगर, गावदेवी या झोपडपट्टी भागात नागरिकांना अस्वच्छ पाणी येत आहे. यामुळे नागरिकांना पाण्यामुळे होणारे आजार आणि त्वचेच्या खाज येणे यासारख्या समस्येला तोंड द्यावे लागत आहे. याविषयी लोकप्रतिनिधी आणि पालिकेच्या संबधीत अधिकाऱ्यांना तक्रारीचे अर्ज केले असता, फक्त आधिकारी पाहणी करुन जातात. पण कोणताही उपाय या निघत नसल्याचे 'दै. मुंबई तरुण भारत' च्या प्रतिनिधीला मोर्चाच्या दरम्यात स्थानिकांनी सांगितले.
 
आंदोलन चिघलवण्याचा प्रयत्न केला गेला
"हा मोर्चा वाकोल्याचा पाटक महाविद्यालय ते पालिकेच्या एच पुर्व प्रभाग कार्यालय पर्यंत हा मोर्चा निघाला होता. या मोर्चा विषयीची पुर्वसुचना देत रितसर परवानगी असूनही, लोकप्रतिनिधीच्या दबावामुळे मोर्चा पालिकेच्या कार्यालयावर नेण्यास पोलिस आडकाटी करत होते. स्थानिक लोकप्रतिनिधींचा दबाव मोर्चावर आणला गेला. फक्त पाच जणांना कार्यालयावर जाण्याची पोलिसांनी विनंती केली. हे आंदोलन चिघलवण्याचा प्रयत्न केला गेला." असे स्थानिक महिला सुकन्या सांवत यांनी प्रतिक्रिया दिली.
 
 
आधिकारी सेनेचे दलाल झाले...
"या सर्व आधिकाऱ्यांना शिवसेनेच्या लोकांनी बांधुन ठेवलं आहे. नागरिकांनी तक्रारी केल्या तर चार दिवस पाणी सोडतात. सेनेने पाणी सोडलं असं लोकांना भासवलं जातयं. चार दिवसांनंतर परिस्थिती जैसे थे आहे. आज गेल्या २० वर्षांपासुन सेनेची सत्ता आहे तरी सांताकुझच्या परिसररात पाण्याचा दुष्काळ पडला आहे. धंनजय रॉय हा आधिकारी सेनेचा दलाल आहे."  अशी संतप्त प्रतिक्रिया मनसेच्या स्थानिक महिला पदाधिकारी सुगंधा भोगलेंनी यावेळी दिली.
 
 
नागरिक पाण्याचा बील नाही भरणार
"गेल्या १५ वर्षापासुन या समस्येचा पाठपुरवठा करत आहे. त्या संबधीचे सर्व कागदपत्रे माझ्याकडे आहे. रॉय म्हणुन जे आधिकारी आहेत. ते गेल्या १५ वर्षांपासुन एकाच विभागावर आधिकारी आहे. हा आधिकारी यांची कधी बदली झाली नाही. त्यांना पैसे दिले जात आहे. बाजुला नवीन इमारतींचे बांधकाम सुरु आहे. त्यांना पालिकेच्या जलवाहिनीतुन पाणी मिळते पण स्थानिकांना वाऱ्यावर सोडले आहे. नागरिकांना स्वच्छ आणि मुबलक पाणी जो पर्यत मिळत नाही. तो पर्यत नागरिक पाण्याचा बील भरणार नाही. सोबत वाघरीपाडा, रामजी डेरी भागात एच पी चा पाणी प्रेशरचा पंप लावण्यात येणार आहे. अशी दोन आश्वासने, मागणी आम्ही पुर्ण करुन घेतली आहे." असे मनसेचे प्रभाग क्र. ९१ चे शाखाअध्यक्ष संतोष उप्रलकर यांना विचारले असता उत्तर दिले.
 
 
पालिकेच्या एच पुर्व प्रभागातील सहाय्यक आयुक्त, आलका ससाणे यांची आंदोलकांनी भेट घेतली. पाण्याच्या समस्येवर विभागीय आधिकारी आणि स्थानिक नागरिक यांच्या सोबत चर्चा झाली. समस्या सोडवण्यासाठी विविध पर्याय त्यांनी समोर ठेवले. पाण्याचे नमुने तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठवण्याचे निर्देश यावेळी दिले. लवकरच नागरिकांना या समस्येतुन सुटका मिळेल असे आश्वासन त्यांनी यावेळी दिले. याचर्चेत स्थानिक नागरिक, मनसेचे पदाधिकारी, आरोग्य विभागाचे आधिकारी, पोलिस आधिकारी, पाणी पुरवठा विभागाचे आधिकारी, सहाय्यक अभियंते, तसेच माध्यम प्रतिनिधी उपस्थित होते.
 
 
 
 
अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121