अभिनेत्री उर्मिला कानेटकर कोठारे हिने तब्बल १२ वर्षांनंतर छोट्या पडद्यावर पुनरागमन केले. 'तुझेच मी गीत गात आहे' ह्या मालिकेतून एकदा मालिकेत झळकली परंतु , थोड्या काळातच उर्मिला मालिकेतून एक्झिट घेत आहे अशी चर्चा सुरु होती .
स्वरा आणि वैदेही या मायलेकींची गोष्ट सांगणारी स्टार प्रवाहावरील 'मी गीत गात आहे' ही मालिका पहिल्या भागापासूनच लोकप्रिय झाली. परंतु ती साकारत असलेल्या 'वैदेही' या पत्राचे निधन दाखवण्यात आल्यामुळे उर्मिला मालिकेतून एक्झिट घेणार अशी चर्चा सुरु झाल्यामुळे, तिने नुकतेच आपल्या इंस्टाग्रामवर एक व्हिडिओ पोस्ट केला आहे. ह्या व्हिडिओत तिने खुलासा करत म्हटले आहे की , 'मी मालिका सोडल्याच्या अफवा पसरवल्या जात आहेत, पण कृपया तसे करू नका; लेखकाने लिहिलेल्या संहितेनुसार मालिका सुरु आहे, मी मालिका सोडलेली नाही, स्वराच्या आठवणीतून मी दिसणारच आहे.'
त्यामुळे स्वतः उर्मिला कोठारे हिनेच खुलासा करून मालिका न सोडल्याचे सांगितले आहे.