औरंग्याच्या कबरीवर डोकं टेकवणाऱ्यांचा पाठींबा घेणारे कोसळणार!

राजू पाटलांची शिवसेनेवर खोचक टीका

    22-Jun-2022
Total Views | 118


raju patil
 
 
मुंबई : शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांच्या बंडामुळे राजकीय वर्तुळात एकच गदारोळ सुरु आहे. ठाकरे सरकार पडेल का? यासंबंधी चर्चांना वेग आला आहे. अनेक विरोधी पक्षनेत्यांकडून ठाकरे सरकारवर जोरदार टीकास्त्र सोडले जात आहे. एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर विधानसभेचे गटनेतेपद हटवून अजय चौधरी यांची शिवसेनेचे नवे गटनेते म्हणून नियुक्ती केली आहे. या सर्व घडामोडीवरून मनसे आमदार राजू पाटील यांनी ट्विट करत सेनेवर निशाणा साधला आहे.
 
"औरंग्याच्या कबरीवर डोकं टेकवणाऱ्यांचा पाठींबा घेणारे कोसळणार……वसुली सरकार बाय बाय !" असे म्हणत राजू पाटलांनी सेनेवर खोचक टीका केली आहे. "भविष्य वर्तवण्यासाठी पंचांग हवेच असे नाही. काही माणसांची वृत्ती आणि इतिहास हा भविष्याची आणि पूर्वकमाईची वासलात लावायला पुरेसा असतो." असेदेखील ते ट्विटरवरून म्हणाले.
 
 
 
 
 
 
 
 
 
अग्रलेख
जरुर वाचा
आणीबाणीतील अत्याचारांबाबत काँग्रेस माफी कधी मागणार? – माजी केंद्रीय मंत्री रवीशंकर प्रसाद यांचा सवाल

आणीबाणीतील अत्याचारांबाबत काँग्रेस माफी कधी मागणार? – माजी केंद्रीय मंत्री रवीशंकर प्रसाद यांचा सवाल

"लोकशाहीच्या इतिहासातील सर्वात काळा दिवस म्हणजे आणीबाणी. तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी केवळ आपली खुर्ची वाचवण्यासाठी मंत्रिमंडळाच्या मान्यतेशिवाय देशावर आणीबाणी लादली. त्या निर्णयामुळे सामान्य नागरिकांपासून पत्रकारांपर्यंत, कार्यकर्त्यांपासून विरोधी पक्षनेत्यांपर्यंत अनेकांनी अभिव्यक्ती स्वातंत्र्य गमावले. इतक्या मोठ्या प्रमाणावर झालेल्या अत्याचारांबाबत काँग्रेसने आजवर एकदाही देशाची माफी मागितलेली नाही. आता तरी काँग्रेसला ती सुबुद्धी सुचेल का?" असा सवाल माजी केंद्रीय मंत्री आणि भाजपचे ज्येष्ठ नेते ..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121