अहमदनगर : पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांची जयंती ३१ मे रोजी त्यांच्या जन्मगावी म्हणजे अहमदनगर जिल्ह्यातील चौंडी येथे साजरी करण्यात येणार आहे. याच जयंती सोहळ्यावरून राजकीय घमासान होण्याची शक्यता आहे. या दिवशी भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांच्या अहिल्यादेवी जागर यात्रेचा समारोप चौंडीत होणार आहे. पण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे होणाऱ्या अहिल्याबाई जन्मोत्सव सोहळ्यामुळे पडळकरांच्या यात्रेला आणि सभेला पोलिसांकडून पर्वांगी नाकारण्यात आली आहे. राष्ट्रवादीच्या या सोहळ्यास शरद पवार उपस्थित राहणार असल्याने ही परवानगी नाकारण्यात आल्याचा आर्प भाजपकडून करण्यात आला आहे.
पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर या संपूर्ण महाराष्ट्राचे श्राद्धस्थान आहेत. त्यांच्या जयंतीनिमित्त होणाऱ्या कार्यक्रमास राष्ट्रवादी काँग्रेस कडूनच राजकीय रंग दिला जात असल्याचा आरोप भाजप कडून केला जात आहे. या कार्यक्रमास शरद पवारांपासून अनेक नेते उपस्थिती लावणार असल्याने हा जयंती कार्यक्रम नसून राष्ट्रवादी काँग्रेसचा मेळावा आहे अशी टीका भाजपचे नेते आणि माजी मंत्री राम शिंदे यांनी केला आहे. पडळकरांच्या कार्यक्रमाला परवानगी नाकारून अहिल्याभक्तांची प्रशासनाकडून कुचंबणा होते आहे, प्रशासनाच्या दबावाखाली सगळे केले जात आहे असा आरोप भाजपकडून होतो आहे.