मुंबई: " हिंदूंना पवित्र असलेली हनुमान चालीसा म्हणणे हा जर राजद्रोह असेल तर आम्ही तो रोज करू " असा इशारा देत राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेनवर टीकेचा आसूड ओढला. फडणवीस एवढ्यावरच थांबले नाहीत तर त्यांनी भर पत्रकार परिषदेत हनुमान चालीसा म्हणून दाखवत महाविकास आघाडी सरकारला जोरदार चपराकच दिली. भाजप नेते मोहित भारतीय आणि किरीट सोमय्या यांच्यावर झालेल्या हल्ल्यांच्या निषेधार्थ तसेच राणा दांपत्याच्या अटकेच्या निषेधार्थ फडणवीस यांनी पत्रकार परिषद घेतली.
नवनीत राणा- रवी राणा हे दांपत्य मातोश्री बाहेर हनुमान चालीसा म्हणण्यासाठी आले होते. या राणा दांपत्यास मुंबई पोलिसांनी अटक करून त्याच्यावर राजद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. महाराष्ट्रात हनुमान चालीसा म्हणणे हा राजद्रोहाचा गुन्हा कसा काय होऊ शकतो? असा सवाल भाजप नेत्यांकडून केला जात आहे.