चाणक्य कलियुगातील ‘नारद’ झाला!

राष्ट्रवादीकडून महापौरांची खिल्ली

    06-Mar-2022
Total Views | 137

Paranjpe - Mhaske
 
 
 
ठाणे : ठाणे पालिकेच्या अखेरच्या सर्वसाधारण सभेत महापौर नरेश म्हस्के यांनी राष्ट्रवादी काँग्रेसला चिमटे काढीत, शिवसेना आणि भाजप ही नैसर्गिक युती असल्याचे सांगून पुन्हा एकदा स्वबळाचा नारा दिला. त्यामुळे राष्ट्रवादीला चांगल्याच मिरच्या झोंबल्या. “एकीकडे मुख्यमंत्री तथा शिवसेना पक्षप्रमुख महाविकास आघाडी झालीच पाहिजे, असे म्हणत असताना महापौर मात्र सेना-भाजप नैसर्गिक युतीचे दाखले देत आहेत. त्यामुळे ठाण्याची शिवसेना उद्धव ठाकरे यांच्या आदेशावर की, महापौर नरेश म्हस्के यांच्या विचाररणीवर चालते? याचा खुलासा पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी करावा,” असा टोला राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष आनंद परांजपे यांनी लगावला. तसेच, “या चाणक्याचा कलियुगातील नारद कधी झाला, हे समजलेच नाही,” अशी खिल्लीही परांजपे यांनी उडवली.
 
 
 
गेले काही दिवस शिवसेना आणि राष्ट्रवादीमध्ये कलगीतुरा रंगला आहे. परिणामतः राष्ट्रवादीने महापौरांनी सर्वपक्षीय नगरसेवकांसाठी आयोजित केलेल्या स्नेहभोजनाच्या कार्यक्रमाकडेही पाठ फिरवली. या रागातून “माझ्या स्नेहभोजनाच्या कार्यक्रमाला येऊ शकत नसाल तर, मी तुमच्यासोबत कशाला राहू,” असा इशारा महापौर म्हस्के यांनी राष्ट्रवादीला दिला. तसेच, कारकिर्दीतील शेवटच्या महासभेत शिवसेना आणि भाजपमध्ये नैसर्गिक युती असल्याचे तारेही म्हस्के यांनी तोडल्याने राष्ट्रवादीचा चांगलाच पाणउतारा झाला. यावरून आनंद परांजपे यांनी महापौरांवर चांगलेच तोंडसुख घेतले.
 
 
 
स्थायीभावाप्रमाणे नरेश म्हसके यांचा अहंपणा आणि अहंकार कायम : आनंद परांजपे
“त्यांच्या स्थायीभावाप्रमाणे त्यांच्यातील अहंपणा आणि अहंकार आजही त्यांच्यातून गेलेला नाही. खरेतर त्यांची महापौरपदाची कारकिर्द संपली तरीही त्यांचा चाणक्याचा कलियुगातील नारद कधी झाला, हे त्यांना समजलेलेच नाही,” असा टोलाही आनंद परांजपे यांनी लगावला.
 
 
 
अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121