मोहाली : गेल्या अनेक दिवसांपासून विराट कोहलीच्या ७१ व्या आंतरराष्ट्रीय शतकाची वाट चाहते आतुरतेने बघत आहेत.या सामन्यात कोहली शतक झळकावेल अशी अपेक्षा क्रिकेटप्रेमींनी लागली होती. मात्र, आता कोहलीचे शतक पाहण्यासाठी क्रिकेटप्रेमींना आणखी थोडा वेळ वाट पहावी लागणार आहे.
४ मार्च पासून भारत विरुद्ध श्रीलंका दरम्यान सुरू झालेला कसोटी सामना हा कोहलीसाठी अत्यंत महत्त्वाचा सामना मानला जात आहे. याच कारण म्हणजे हा सामना कोहोलीच्या कसोटी कारकिर्दीतील १०० वा सामना आहे. या सामन्यात कसोटी क्रिकेट मध्ये ८००० धावांचा टप्पा कोहलीने पार केला.
दरम्यान, भारत विरुद्ध श्रीलंका या संघांमध्ये सुरू असलेल्या सामन्यात रोहित शर्मा पदिल्यांदाच भारताचा पुर्ण वेळ कसोटी कर्णधार म्हणून भुमिका बजावत आहे. या सामन्यात भारताने नाणेफेक जिंकून पहिल्यांदा फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. आता कोहलीला १०० व्या कसोटी सामन्यात शतक झळकावत आपल्या चाहत्यांना खुष करण्याची आणखी एक संधी उपलब्ध आहे. कोहली या संधीचे सोनं करेल की नाही? ते आता वेळ आल्यावरच समजेल