काश्मीरबद्दलचं ट्विट भोवलं! : ह्युंदाईचा शेअर कोसळला!

    07-Feb-2022
Total Views | 1940
 
 
 
 
hyundai
 
 
 
 
मुंबई: ह्युंदाई नंतर किया या पाकिस्तान ट्विटर हॅन्डल वरून केल्या गेल्या काश्मीरबाबतच्या ट्विट नंतर ह्युंदाईचे शेअर्स २.७ टक्क्यांनी कोसळले. ट्विटरवर #BoycottHyundai असे टॅग्स व्हायरल व्हायला लागले आहेत. ह्युंदाई कंपनीला भारतात याबद्दल प्रचंड रोषाला सामोरे जावे लागत आहे. ह्युंदाई इंडिया कडूनच नव्हे तर ह्युंदाई पाकिस्तान कडूनही माफी मागितली जावी अशी मागणी भारतीय नेटकऱ्यांकडून केली जाते आहे.
 
 
नेमकं झालं काय?
,च्या ट्विटर हॅन्डल वरून काश्मीर संधर्भात ट्विट केले गेले होते. 'किया'च्या पाकिस्तानी ट्विटर हँडलवर लिहिले की, "आम्ही सर्व काश्मीरच्या स्वातंत्र्यासाठी एकजुटीने उभे आहोत." यासोबतच कंपनीने '५ फेब्रुवारी' आणि 'काश्मीर डे'चे हॅशटॅगही लावले आहेत. तसेच, त्याचे स्थान 'किया मोटर्स क्रॉसरोड्स, प्लॉट नंबर ११, ब्लॉक १-ए, सादिक लिवना हाउसिंग स्कीम, बायपास रोड, हैदराबाद, सिंध' असे दिले आहे. त्यात तुमचा संपर्क तपशीलही दिला. भारतविरोधी प्रचारासाठी पाकिस्तानने ५ फेब्रुवारीला 'काश्मीर डे' साजरा केला होता.
 
 
या ट्विट्स नंतर भारतात ह्युंदाईविरोधात प्रचंड रोष पसरला आहे. लोक म्हणाले की, भारतात पाकिस्तानपेक्षा कितीतरी पटीने जास्त गाड्या विकल्या जातात, पण असे असतानाही 'किया' काश्मीरवर पाकिस्तानची बाजू घेत खोटे बोलण्यात गुंतलेली आहे. लोकांनी 'किया'ला विचारले की त्यांनी आता दहशतवाद्यांना आर्थिक मदतही सुरू केली आहे का? त्या ट्विटसोबत पाकिस्तानचा ध्वजही चित्रात लावण्यात आला होता. मात्र, या वादानंतर 'किया'च्या त्या पाकिस्तानी हँडलने त्याचे ट्विट डिलीट केले. मात्र, यासाठी माफी मागावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.
 
 
 
 
अग्रलेख
जरुर वाचा

'फंडींगशिवाय असा हल्ला...'; ५५ दिवस मौन बाळगल्यानंतर पहलगाम हल्ल्यावर 'एफएटीएफ'चे मोठे विधान!

काश्मीरच्या पहलगाम येथे दि. २२ एप्रिल रोजी इस्लामिक दहशतवादी हल्ला झाला. या हल्ल्यानंतर भारताने दहशतवाद पोसणाऱ्या पाकिस्तानला ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून चोख प्रत्युत्तर दिले. जगातील बहुतेक राष्ट्र आणि काही आंतरराष्ट्रीय स्तरावरील संस्था भारताच्या बाजूने दहशतवादाविरोझात उभ्या आहेत. यातच आता फायनान्शियल अॅक्शन टास्क फोर्स (एफएटीएफ) ने देखील हल्ल्याचा निषेध केलाय. पहलगामसारखा हल्ला कोणत्याही फंडींगशिवाय (निधीशिवाय) होऊ शकत नाही, असे एफएटीएफने म्हटले आहे. या सदर्भातील निवेदन एफएटीएफने नुकतेच जारी केले आहे...

सामान्य लोकांना भारतीय मूल्यांवर आधारित दर्जेदार शिक्षण देण्यात ‘विद्या भारती’ची अतुलनीय भूमिका - केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांचे प्रतिपादन

सामान्य लोकांना भारतीय मूल्यांवर आधारित दर्जेदार शिक्षण देण्यात ‘विद्या भारती’ची अतुलनीय भूमिका - केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांचे प्रतिपादन

“शिशु मंदिर हे ओडिशाच्या शिक्षण विभागातील नाडीसारखे आहे. ‘विद्या भारती’ आणि ‘शिक्षा विकास समिती’द्वारे चालवले जाणारे सरस्वती शिशु विद्या मंदिर, भारतीय पद्धती आणि मूल्यांवर आधारित सामान्य लोकांना दर्जेदार शिक्षण देण्यात अतुलनीय भूमिका बजावते,” असे प्रतिपादन केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी केले. ओडिशाच्या कटक जिल्ह्यातील सरस्वती विद्या मंदिरात ‘विद्या भारती’ आणि ‘शिक्षा विकास समिती’द्वारा आयोजित प्रदेशिका प्राचार्य परिषदेच्या समारोपादरम्यान ते बोलत होते...

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121