काम माझे, क्रेडिट दुसऱ्याला... नक्की काय म्हणाला रहाणे?

    10-Feb-2022
Total Views | 70

ajinkya
 
 
नवी दिल्ली : भारतीय संघात सातत्याने खेळत रहायचे असेल तर खेळाडूंना वेळोवेळी आपल्या खेळातील सातत्य दाखवावे लागते. मात्र काही खेळाडूंमध्ये क्षमता असूनही अनेकदा ते सातत्य दाखवण्यात कमी पडतात. असच काहीसे घडले आहे भारताच्या कसोटी संघाचा माजी उप-कर्णधार अजिंक्य रहाणे सोबत. नुकतच उप-कर्णधार पद गमवल्यानंतर एका मुलाखतीत विचारलेल्या प्रश्नाला दिलेल्या उत्तरावरून एक वेगळा वाद आता निर्माण झाला आहे.
 
गेल्या काही महिन्यांपासून खेळात सातत्य न दाखवू शकणाऱ्या अजिंक्य रहाणेला नुकतेच आपले उप-कर्णधारपद गमवावे लागले आहे. नुकत्याच झालेल्या एका मुलाखती दरम्यान बोलताना "जेव्हा लोक बोलतात माझं करिअर संपले आहे, तेव्हा मला हसू येते" असे मत रहाणेनी व्यक्त केले. या शिवाय "ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या सिरिजमध्ये मी दिलेले योगदान कोणालाही आठवत नसल्याचे" दु:ख रहाणेने व्यक्त केले. पुढे बोलताना "ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या मालिकेत मी घेतलेल्या निर्णयांमुळेच भारताला विजय मिळाला, मात्र त्या विजयाचे श्रेय इतर खेळाडूंना दिले जात आहे" अशी खंतही यावेळी रहाणेनी व्यक्त केली.
 
दरम्यान, जानेवारी २०२१ पासूनच रहाणे आऊट ऑफ फॉर्म असल्याचे दिसून आले आहे. त्याने जानेवारी २०२१ नंतर १९.९५ च्या सरासरीने केवळ ५४७ धावा काढल्या आहेत. त्यामुळे श्रीलंकेविरुद्ध होणाऱ्या आगामी मालिकेत अजिंक्य रहाणेच्या जागी कुठल्यातरी युवा खेळाडूला संधी मिळे शकते याची शक्यता नाकारता येत नाही.
 
अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121