पंतप्रधान सुरक्षा त्रुटी – निवृत्त न्यायमूर्ती इंदू मल्होत्रा समिती करणार तपास

सर्वोच्च न्यायालयाचा आदेश

    12-Jan-2022
Total Views | 93
SC

‘लवकरात लवकर’ अहवाल देण्याचे निर्देश
 
 
 
नवी दिल्ली, विशेष प्रतिनिधी : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पंजाब दौऱ्यातील सुरक्षा त्रुटींची चौकशी सर्वोच्च न्यायालयाच्या निवृत्त न्यायमूर्ती इंदू मल्होत्रा यांच्या अध्यक्षतेखालील समिती करणार आहे. सर्वोच्च न्यायालयाने बुधवारी त्याविषयीची आदेश जारी केला असून समितीस आपला अहवाल ‘लवकरात लवकर’ सादर करण्याचेदेखील निर्देश दिले आहेत.
 
 
सर्वोच्च न्यायालयाने बुधवारी समितीविषयीचा आदेश जारी केला आहे. त्यानुसार, या प्रकरणाची चौकशी सर्वोच्च न्यायालयाच्या निवृत्त न्यायमूर्ती इंदू मल्होत्रा यांच्या अध्यक्षतेखालील समिती करणार आहे. समितीमध्ये न्या. मल्होत्रा यांच्यासह राष्ट्रीय तपास यंत्रणा अर्थात एनआयएचे महासंचालक, पंजाब पोलिस महासंचालक (सुरक्षा), पंजाब आणि हरियाणा उच्च न्यायालयाचे रजिस्ट्रार जनरल यांचा समावेश समितीमध्ये करण्यात आला आहे. ही समिती सुरक्षेच्या भंगाचे कारण तपासण्यासोबतच पंतप्रधानांच्या सुरक्षेसाठी आवश्यक उपायदेखील सुचविणार आहे. समितीस आपला अहवाल ‘लवकरात लवकर’ सादर करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
 
 
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सुरक्षा त्रुटींविषयी ‘लॉयर्स व्हॉइस’ या संस्थेने सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. याचिकेवर सरन्यायाधीश न्या. एन. व्ही. रामण्णा, न्या. सूर्यकांत आणि न्या. हिमा कोहली यांच्या खंडपीठासमोर सुनावणी सुरू आहे. यापूर्वी सोमवारी झालेल्या सुनावणीवेळी न्यायालयीन समितीमार्फत चौकशी करण्यात येईल, असे स्पष्ट करण्यात आले होते. त्याचवेळी केंद्र सरकार आणि पंजाब सरकारने याप्रकरणी नेमलेल्या चौकशी समित्यांना आपले काम थांबविण्याचेबी निर्देश यापूर्वीच देण्यात आले आहेत.
 
 
 
अग्रलेख
जरुर वाचा
लेखक जयेश मेस्त्री ’संत गाडगे महाराज बाल साहित्य पुरस्कार २०२५’ने सन्मानित!

लेखक जयेश मेस्त्री ’संत गाडगे महाराज बाल साहित्य पुरस्कार २०२५’ने सन्मानित!

संत गाडगे महाराज विचार मंच महाराष्ट्र राज्य आणि ज्ञानज्योत फाऊंडेशन महाराष्ट्र यांच्या वतीने देण्यात येणारा ’संत गाडगे महाराज बाल साहित्य पुरस्कार २०२५’ या वर्षी लेखक, साहित्यिक जयेश मेस्त्री यांना प्राप्त झाला आहे. दरवर्षी प्रमाणे या वर्षी देखील साहित्य क्षेत्रात उत्तम कामगिरी करणार्‍या साहित्यिकांचा गौरव करण्यात आला. दिनांक ०७ जून २०२५ रोजी पुणे येथील सदाशिव पेठेतील वेदशास्त्रोत्तेजक सभागृह येथे हा सुंदर सोहळा पार पडला. या प्रसंगी प्रसिद्ध उद्योजक डॉ. रामदास कुटे हे उद्घाटक म्हणून उपस्थित होते. तसेच ..

साताऱ्याच्या मातीत बहरणार ९९ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन!

साताऱ्याच्या मातीत बहरणार ९९ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन!

: मराठी साहित्यातील प्रतिष्ठीत मानल्या जाणाऱ्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनचा ९९ व्या सोहळा आगामी वर्षात साताऱ्यात पार पडणार आहे. ९९ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन आयोजन करण्याचा मान साताऱ्यातील महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या शाहूपुरी शाखेला आणि मावळा फौंडेशनला मिळणार आहे.अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाच्या पुणे येथे झालेल्या बैठकीत हा निर्णय एकमताने घेण्यात आला. अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे अध्यक्ष मिलिंद जोशी, उपाध्यक्ष गुरुय्या स्वामी, कार्यवाह सुनिताराजे पवार, कोषाध्यक्ष विनोद ..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121