डोंबिवली : कल्याण डोंबिवलीत तीन चार दिवस झालेल्या अतिवृष्टीमुळे गुरूवारी पूरसदृश्य परिस्थिती निर्माण झाली होती. कोपर पूर्व व पश्चिम येथील अनेक चाळीमध्ये पाणी शिरले होते. त्यामुळे या परिसरातील नागरिकांवर कोपर स्थानकात राहण्याची नामुष्की आली होती. या नागरिकांच्या जेवणाची व पिण्याच्या पाण्याची व्यवस्था रा. स्व. संघ आणि रा. स्व. संघ जनकल्याण समितीच्या कार्यकत्र्यानी केली होती.
वालधुनी व उल्हास नदी गुरूवारी पावसामुळे दुथडी भरून वाहत होती. त्यामुळे कल्याण डोंबिवलीत फारसा पाऊस नसताना ही सकाळपासूनच डोंबिवली पश्चिमेतील चाळ परिसरात, डोंबिवली जवळील कोपर पूर्व आणि पश्चिम परिसरात पाणी भरण्यास सुरूवात झाली होती. दुपारी १२ नंतर पाण्याची पातळी अचानक वाढतच गेली. काही कार्यकत्र्याच्या मदतीने नागरिकांना घरातून बाहेर काढण्यात आले. या पावसाच्या पाण्यामुळे नागरिकांचे मोठय़ा प्रमाणात नुकसान झाले. त्यांचे सामान, इलेक्ट्रॉनिक वस्तू सगळे पाण्यात खराब झाले.
काही नागरिकांनी कोपर स्थानक गाठले. या नागरिकांची त्यानंतर तात्पुरती शाळा आणि मंदिरात व्यवस्था केली होती. या नागरिकांच्या जेवणाची आणि पिण्याच्या पाण्याची व्यवस्था रा.स्व. संघ आणि रा. स्व. संघ जनकल्याण समितीच्या कार्यकत्र्यानी केली. यावेळी चारशे जणांची व्यवस्था करण्यात आली होती. यामध्ये निलेश काळे, गिरीष दीक्षित, प्रविण माने, अविनाश जोशी, विजय फडके, अमेय काटदरे, कल्पेश दीक्षित, निशिकांत गाणार यांनी विशेष मेहनत घेतली. यामध्ये अंदाजे 2क् कार्यकर्ते सहभागी झाले होते.