पूरात अडकलेल्यांसाठी रा.स्व.संघानं केली भोजन व्यवस्था

    23-Jul-2021
Total Views | 168

rss_1  H x W: 0
डोंबिवली : कल्याण डोंबिवलीत तीन चार दिवस झालेल्या अतिवृष्टीमुळे गुरूवारी पूरसदृश्य परिस्थिती निर्माण झाली होती. कोपर पूर्व व पश्चिम येथील अनेक चाळीमध्ये पाणी शिरले होते. त्यामुळे या परिसरातील नागरिकांवर कोपर स्थानकात राहण्याची नामुष्की आली होती. या नागरिकांच्या जेवणाची व पिण्याच्या पाण्याची व्यवस्था रा. स्व. संघ आणि रा. स्व. संघ जनकल्याण समितीच्या कार्यकत्र्यानी केली होती.
 
वालधुनी व उल्हास नदी गुरूवारी पावसामुळे दुथडी भरून वाहत होती. त्यामुळे कल्याण डोंबिवलीत फारसा पाऊस नसताना ही सकाळपासूनच डोंबिवली पश्चिमेतील चाळ परिसरात, डोंबिवली जवळील कोपर पूर्व आणि पश्चिम परिसरात पाणी भरण्यास सुरूवात झाली होती. दुपारी १२ नंतर पाण्याची पातळी अचानक वाढतच गेली. काही कार्यकत्र्याच्या मदतीने नागरिकांना घरातून बाहेर काढण्यात आले. या पावसाच्या पाण्यामुळे नागरिकांचे मोठय़ा प्रमाणात नुकसान झाले. त्यांचे सामान, इलेक्ट्रॉनिक वस्तू सगळे पाण्यात खराब झाले.
काही नागरिकांनी कोपर स्थानक गाठले. या नागरिकांची त्यानंतर तात्पुरती शाळा आणि मंदिरात व्यवस्था केली होती. या नागरिकांच्या जेवणाची आणि पिण्याच्या पाण्याची व्यवस्था रा.स्व. संघ आणि रा. स्व. संघ जनकल्याण समितीच्या कार्यकत्र्यानी केली. यावेळी चारशे जणांची व्यवस्था करण्यात आली होती. यामध्ये निलेश काळे, गिरीष दीक्षित, प्रविण माने, अविनाश जोशी, विजय फडके, अमेय काटदरे, कल्पेश दीक्षित, निशिकांत गाणार यांनी विशेष मेहनत घेतली. यामध्ये अंदाजे 2क् कार्यकर्ते सहभागी झाले होते.


 
अग्रलेख
जरुर वाचा
लेखक जयेश मेस्त्री ’संत गाडगे महाराज बाल साहित्य पुरस्कार २०२५’ने सन्मानित!

लेखक जयेश मेस्त्री ’संत गाडगे महाराज बाल साहित्य पुरस्कार २०२५’ने सन्मानित!

संत गाडगे महाराज विचार मंच महाराष्ट्र राज्य आणि ज्ञानज्योत फाऊंडेशन महाराष्ट्र यांच्या वतीने देण्यात येणारा ’संत गाडगे महाराज बाल साहित्य पुरस्कार २०२५’ या वर्षी लेखक, साहित्यिक जयेश मेस्त्री यांना प्राप्त झाला आहे. दरवर्षी प्रमाणे या वर्षी देखील साहित्य क्षेत्रात उत्तम कामगिरी करणार्‍या साहित्यिकांचा गौरव करण्यात आला. दिनांक ०७ जून २०२५ रोजी पुणे येथील सदाशिव पेठेतील वेदशास्त्रोत्तेजक सभागृह येथे हा सुंदर सोहळा पार पडला. या प्रसंगी प्रसिद्ध उद्योजक डॉ. रामदास कुटे हे उद्घाटक म्हणून उपस्थित होते. तसेच ..

साताऱ्याच्या मातीत बहरणार ९९ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन!

साताऱ्याच्या मातीत बहरणार ९९ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन!

: मराठी साहित्यातील प्रतिष्ठीत मानल्या जाणाऱ्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनचा ९९ व्या सोहळा आगामी वर्षात साताऱ्यात पार पडणार आहे. ९९ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन आयोजन करण्याचा मान साताऱ्यातील महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या शाहूपुरी शाखेला आणि मावळा फौंडेशनला मिळणार आहे.अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाच्या पुणे येथे झालेल्या बैठकीत हा निर्णय एकमताने घेण्यात आला. अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे अध्यक्ष मिलिंद जोशी, उपाध्यक्ष गुरुय्या स्वामी, कार्यवाह सुनिताराजे पवार, कोषाध्यक्ष विनोद ..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121