प्रशासनाचे नियम धाब्यावर - पर्यटक धबधब्यावर

    27-Jun-2021
Total Views | 107

picnic_1  H x W

मुंब्रा बायपास धबधब्यावर विकेण्डला झुंबड


ठाणे : कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी ठाणे जिल्हाधिकारी यांनी तलाव,पर्यटन स्थळ,पिकनिक पॉईंट,धबधबे व किनारपट्टी या ठिकाणी पावसाळी पर्यटनाला बंदी घातली आहे.असे असताना नियम धाब्यावर बसवुन पर्यटक धबधब्यावर जात आहेत.ठाणे शहराच्या नजिक असलेल्या मुंब्रा बायपास धबधब्यावर विकेण्डला झुंबड उडाल्याचे दिसुन आले.जिल्हा प्रशासनासह स्थानिक पोलीसांचे याकडे दुर्लक्ष होत असून यामुळे कोरोना संक्रमणात भर पडण्याची भीती व्यक्त होत आहे.


 
ठाण्यातील मुंब्रा येथे मुंब्रादेवी डोंगरावर निसर्गरम्य परिसर व कोसळणारे लहान धबधबे आहेत. पावसाळ्यात याठिकाणी दररोज तसेच,विकेण्डला सुट्टीच्या दिवशी या धबधब्यावर पर्यटक गर्दी करतात.सध्या कोरोनाचा काळ असल्यामुळे राज्यात जमावबंदीचा आदेश लागू आहे.शिवाय ठाणे जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांनी धबधबे, नद्या,तलाव आणि पर्यटनस्थळे या सर्वच ठिकाणी नागरिकांना मनाई करण्यात आलेली आहे.तरीही या ठिकाणी कोणत्याही प्रकारचे सोशल डिस्टंसिंगचे नियम पाळले जात नसून, एकाही नागरिकाने मास्क घातलेला नव्हता.यामुळे मुंब्र्यात जमावबंदीचे आदेश किंवा पर्यटनस्थळांवर जाण्यास मनाई आदेश लागू होत नाही का ? अशा पद्धतीने नागरिक कायदा मोडून महामारीच्या काळात एकत्र जमत असतील आणि कोरोना संदर्भातले कोणते नियम पाळत नसतील तर तिसर्या लाटेची शक्यता नाकारता येत नसल्याचे मत नागरिक व्यक्त करीत आहेत.


अग्रलेख
जरुर वाचा
राज ठाकरेंची पक्षसंघटनेवर आचारसंहिता! म्हणाले, मला विचारल्याशिवाय...

राज ठाकरेंची पक्षसंघटनेवर आचारसंहिता! म्हणाले, "मला विचारल्याशिवाय..."

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पक्षातील सर्व नेत्यांना आणि कार्यकर्त्यांना एक ठाम आणि स्पष्ट आदेश दिला आहे. राज ठाकरे यांनी सांगितले की, "पक्षातील कोणताही नेता, कार्यकर्ता, प्रतिनिधी यांनी कोणत्याही वृत्तपत्र, वृत्तवाहिनी किंवा डिजिटल माध्यमांशी संपर्क साधू नये. तसेच, स्वतःचे मत व्हिडीओच्या माध्यमातून सोशल मीडियावर अपलोड करणेही थांबवावे." याशिवाय, त्यांनी पक्षाचे अधिकृत प्रवक्ते यांनाही इशारा दिला आहे. राज ठाकरे म्हणाले, "ज्यांना अधिकृत प्रवक्त्याची जबाबदारी दिली आहे त्यांनी सुद्धा माझी परवानगी घेतल्याशिवाय ..

महाराष्ट्र किनारी क्षेत्र व्यवस्थापन प्राधिकरणाच्या पुनर्रचनेची अधिसूचना जाहीर ; पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांच्या पाठपुराव्याला यश

महाराष्ट्र किनारी क्षेत्र व्यवस्थापन प्राधिकरणाच्या पुनर्रचनेची अधिसूचना जाहीर ; पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांच्या पाठपुराव्याला यश

राज्यातील विविध विकास कामे व प्रकल्पांना किनारी क्षेत्र नियमन (सीआरझेड) अंतर्गत वेळेवर मंजुरी मिळावी यासाठी महाराष्ट्र किनारी क्षेत्र व्यवस्थापन प्राधिकरण पुनर्रचना व्हावी यासाठी राज्याच्या पर्यावरण व वातावरणीय बदल मंत्री पंकजा मुंडे यांनी केंद्र सरकारकडे सातत्याने पाठपुरावा केला होता. त्यांच्या या प्रयत्नांना अखेर यश मिळाले असून, केंद्र सरकारच्या पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्रालयाने महाराष्ट्र किनारी क्षेत्र व्यवस्थापन प्राधिकरण पुनर्रचित करत अधिसूचना जारी केली आहे...

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121