सुतिकागृहाचे काम सुरु करा अन्यथा गरोदर महिलांना घेऊनआंदोलन करण्याचा रिपाईचा क डोंमपा प्रशासनाला इशारा

    18-Jun-2021
Total Views | 69
 
rpi photo_1  H
 
 
 
डोंबिवली : डोंबिवलीतील एकमेव सुतिकागृह मोडकळीस आल्याने सात वर्षापूर्वी बंद करण्यात आले आहे. पण अद्याप त्याठिकाणी नवीन इमारत उभी करण्यात आली नसल्याने गोर-गरीब गर्भवती महिलांना कळव्याच्या शासकीय रुग्णालयात पायपीट करीत जावे लागत आहे. सुतिकागृहाच्या पुर्नबांधणीच्या मुद्दयावर आता रिपाई आक्रमक झाली आहे. प्रशासनाने याबाबत लवकरात लवकर पावले उचलावीत अन्यथा गरोदर महिलांना घेऊन आंदोलन करण्याचा इशारा रिपाई शहराध्यक्ष अकुंश गायकवाड यांनी दिला आहे.
 

टिळक मार्गावर ६० बेड असलेली सुतिकागृह होते. सुतिकागृहाची इमारत मोकडकळीस आल्याने सुतिकागृह बंद करण्यात आले. त्याला सात वर्षे उलटून गेली आहेत. गोर-गरीब गरोदर महिलांना या सुतिकागृहाचा मोठा आधार होता. तसेच शास्त्रीनगर रु ग्णालय सुध्दा गेल्या वर्षभरापासून कोविड रुग्णालय घोषित करण्यात आल्याने गर्भवती महिलांसमोर मोठी समस्या निर्माण झाली आहे. मोडकळीस आलेल्या वास्तूला बंद करण्यात महापालिका प्रशासनाने जी तत्परता दाखविली तीच तत्परता त्यांच्या पुर्नउभारणीत दाखविली नसल्याचे बोलले जात आहे. डोंबिवलीत गोरगरीब गर्भवती महिलांच्या उपचाराची सोय नसल्याने त्यांना कळवा किंवा मुंबईच्या रुग्णालयात धाव घ्यावी लागते. वेळप्रसंगी त्यांच्या जीवाला धोका पण निर्माण होऊ शकतो.
 

सुतिकागृह पुनर्विकास कामासाठी चालना २१ ऑक्टोबर २०१४ ला मिळाली.
क .डों.म.पा ने महासभेत ठराव २० ऑगस्ट २०१६ रोजी केला. चार वेळा स्वारस्य फेटाळण्यात आला. अखेर २५ फेब्रुवारी २०२० ला रुबी हेल्थ केअर यांनी सुतिकागृह विकसित करण्याचे ठरविले होते. परंतु अद्यापर्पयत हे काम रखडलेले आहे. म्हणून दुर्लक्षित सुतिकागृहाबाबत डोंबिवली रिपाई शहरतर्फे जन आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे.
 
 
अग्रलेख
जरुर वाचा
मी टाटा ग्रुपला २ कोटी देते, माझे वडील परत आणा; एअर इंडियाच्या विमान अपघातात वडील गमावलेल्या लेकीचा आक्रोश!

"मी टाटा ग्रुपला २ कोटी देते, माझे वडील परत आणा"; एअर इंडियाच्या विमान अपघातात वडील गमावलेल्या लेकीचा आक्रोश!

(Ahmedabad Plane Crash updates) अहमदाबादमध्ये झालेल्या एअर इंडियाच्या विमान अपघातामुळे संपूर्ण देश हादरला आहे. या भीषण अपघातात प्रियजनांना गमावलेल्यांनी आपला आक्रोश व्यक्त केला आहे. दरम्यान, मृतांच्या नातेवाईकांना टाटा समूहाकडून एक कोटी रुपयांची मदत जाहीर करण्यात आली आहे. आपल्या वडिलांच्या मृत्यूमुळे दुःखात असलेल्या फाल्गुनी यांचा एक व्हिडिओ समोर आला आहे. ज्यामध्ये टाटा समूहाकडून जाहीर करण्यात आलेल्या आर्थिक मदतीबाबत आक्षेप घेत अपघातात मृत पावलेल्या आपल्या वडिलांना परत आणल्यास आपण टाटा ग्रुपला दोन कोटी ..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121