मुंबई : सचिन वझे प्रकरणात ठाकरे सरकार डॅमेट कंट्रोल करण्याच्या प्रयत्नात असल्याचे पाहायला मिळते आहे. मनसुख हिरं हत्या प्रकरणानंतर राज्य पोलीस दलात मोठे फेरबदल करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतल्यानंतर आता शिवसेना अगोदर वाझे आणि आता परमवीर सिंग यांच्या बदलीची बाजू घेत असल्याने भाजपने शिवसेनेवर निशाणा साधण्यास सुरुवात केली आहे. भाजप नेते निलेश राणे यांनी ट्विट करत आर्थर रोड जेल हे नवीन मातोश्री होऊ शकतं अशी सणसणीत टोला शिवसेनेला लागलेला आहे.
निलेश राणे म्हणतात,"ज्या अर्थाने शिवसेना परमवीर सिंग यांच्या बदलीची आणि त्या अगोदर वाझे यांची बाजू घेत होती असं वाटतं मातोश्रीसाठी सगळे दोन नंबरचे धंदे करण्याची जबाबदारी त्यांच्याकडे होती. हे दोन अधिकारी खरं बोलले तर आर्थर रोड जेल हे नवीन मातोश्री होऊ शकतं." असे म्हणत त्यांनी शिवसेनवर निशाणा साधला.
दरम्यान, शिवसेनेचे मुखपत्र असणाऱ्या सामनामधून म्हंटले आहे की, उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर सापडलेल्या स्कॉर्पिओतील जिलेटीन कांड्यांमुळे राज्याच्या राजकारणात अनेक स्फोट घडले आहेत. मनसुख हिरेन मृत्यूप्रकरणावरुनही भाजपानेही सरकारला आणि गृहमंत्र्यांना धारेवर धरले आहे. तर, दुसरीकडे मुंबई पोलीस आयुक्तपदावरून परमबीर सिंग यांची उचलबांगडी करण्यात आली आहे. विशेष म्हणजे परमबीर सिंग नाराज असून, पदभार न घेताच ते रजेवर गेले आहेत. तसेच, मुंबई पोलिसांच खच्चीकरण करण्याचा हा प्रयत्न असल्याचा आरोपही शिवसेनेने केलाय.