हिंदूंच्या छोट्या-छोट्या कृतीवरून आवाज उठवणार्यांना गल्लोगल्ली उगवलेल्या मशिदींवरील भोंग्यांचा कर्कश आवाज कधीच ऐकू येत नाही. त्या आवाजाने परिसरातील प्राणी-पक्ष्यांना त्रास होतो. पण, त्याविरोधात आवाज उठवण्याची या टोळक्यांची हिंमत होत नाही. त्याच रांगेतले लोक आता स्वतःची सेक्युलर प्रतिमा जपण्यासाठी अहमदमियाँचा कुत्र्यांशी विकृत संबंधाचा प्रकारही पचवताना दिसतात.
स्वतःच्या विकृत लैंगिक इच्छापूर्तीसाठी ६८ वर्षीय अहमद शाहीनामक इसमाने तब्बल ३० ते ४० मादी कुत्र्यांशी कुकृत्य केल्याची धक्कादायक आणि संतापजनक घटना नुकतीच उघडकीस आली. आरोपी अहमद शाही मुंबईच्या जुहू गल्ली परिसरातील रहिवासी असून, त्याला पोलिसांनी अटकही केली. मात्र, “प्राण्यांना आक्षेप नसेल तर माझ्या वासनेला गुन्हा ठरवणारे तुम्ही कोण?” असा उद्दाम सवाल त्याने चौकशीवेळी विचारल्याचेे माध्यमातून समोर आले. अर्थात, प्राण्यांनी मानवी भाषेत अहमदमियाँशी बोलावे आणि आमच्याशी क्रूरतेने वागू नको, अशी विनवणी करावी, ही त्याची अपेक्षा असावी. मात्र, अहमद शाहीने कुकृत्य केलेले कुत्रे मर्त्य जगातील होते, जन्नतमधील घोड्यासारखे जादूई नव्हे, जे घडाघडा बोलू लागतील. प्राण्यांना त्यांच्या विशिष्ट आवाजाव्यतिरिक्त अन्य प्रकारे संवाद साधता येत नाही, तर त्यासाठी विकसित मेंदू लाभलेल्या माणसांतच तितकी संवेदनशीलता असावी लागते. ती असेल तर प्राणी ज्या हावभावातून भावना व्यक्त करतात, त्या माणूस समजून-उमजून घेऊ शकतो. पण, कुत्र्या-मांजरांना फक्त स्वतःच्या अनैसर्गिक इच्छापूर्तीसाठी खाऊ-पिऊ घालण्याचा बहाणा करणार्या अहमद शाहीकडे कसलीही संवेदनशीलता नव्हती आणि म्हणूनच तो एकामागोमाग एक कुत्र्यांवर अत्याचार करत सुटला. अखेर त्याचे भूतदयेला काळिमा फासणारे कुकृत्य उजेडात आले नि त्याला अटक झाली.
अहमद शाहीने कुत्र्यांशी संबंधाचा घृणास्पद प्रकार केला. पण, त्याविरोधात ‘बॉम्बे अॅनिमल राईट्स’वगळता अन्य कोणत्याही प्रसिद्ध प्राणिमित्र, प्राणिप्रेमी व्यक्ती, संस्था, संघटनेने आक्षेप घेतल्याचे दिसले नाही. आज सर्वत्र राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवरील प्राणिमित्र आणि प्राणिप्रेमी संघटनांचा सुळसुळाट झालेला आहे. प्राण्यांचे हित-अहित काय ते फक्त आम्हीच जाणतो, असा त्यांचा दावा असतोे आणि आमच्याहून वेगळा विचार करणारे वा कृती करणारे प्राणिद्वेष्टे, प्राणिशत्रूच असतात, अशी त्यांची भूमिका असते. तशा व्यक्ती, संस्था, संघटना आपल्या भारतात, महाराष्ट्रात आणि मुंबईतही आढळतात. पण, त्या अहमद शाहीच्या कुकृत्यावर आवाज न उठवता चिडिचूप आहेत. असे का? भारतात अगदी प्राचीन काळापासून प्राण्यांना केंद्रस्थानी ठेवून वा प्राण्यांच्या सहभागातून विविध सण-उत्सव साजरे केले जातात. ठिकठिकाणच्या यात्रा-जत्रा, वार्षिकोत्सवातही प्राण्यांची उपस्थिती असेतच असते. पण, त्यातल्या बैलांची शर्यत, प्राण्यांची झुंज वा तामिळनाडूतील जल्लीकट्टूसारखा खेळ आतापर्यंत तथाकथित प्राणिमित्र आणि प्राणिप्रेमी संघटनांच्या विरोधाला बळी पडले. अर्थात, त्या माध्यमातून प्राण्यांवर अन्याय-अत्याचार होत असतील, तर त्याविरोधात घेतलेला आक्षेप निराधार म्हणता येणार नाही. पण, मग अहमद शाहीचे प्रकरण काय कुत्र्यांवर फुले उधळणारे आहे? की अहमद शाहीने केलेला अन्याय कुत्र्यांसाठीचा न्याय असतो? देशभरातील प्राणिमित्र, प्राणिप्रेमी संस्था, संघटना आणि व्यक्तींच्या मौनातून तर तेच सिद्ध होते; अन्यथा आताही त्यांनी अहमद शाहीविरोधात रस्त्यावर उतरायला हवे होते, ‘#सॉरीडॉगी’,‘#आयएमह्युमनअशेम्ड’ यांसारखे फलक हातात घेऊन, त्याची छायाचित्रे ट्विटर, फेसबुकवर सामायिक करून मोहिमा राबवायला हव्या होत्या. पण, तसे काहीही होताना दिसत नाही, उलट मुंबईत अहमद शाही नावाचा विकृत इसम राहतो, त्याला कुत्र्यांवर अनैसर्गिक अत्याचार केल्याच्या आरोपावरून अटक करण्यात आली आणि तो त्याचे गलिच्छ समर्थन करतो, अशी घटना जणू काही घडलीच नसल्याप्रमाणे इतर वेळी आरडाओरडा करणार्यांनी स्वतःच्या तोंडाला कुलुप लावल्याचेच दिसून येते.
इथेच तथाकथित प्राणिमित्र आणि प्राणिप्रेमी व्यक्ती, संस्था, संघटनांचा निवडक विरोध व दुटप्पीपणा स्पष्ट होतो. त्यामागे सहिष्णू हिंदूंच्या सण, उत्सव, प्रथा, परंपरांना विरोध केला तर काय बिघडणार आणि अहमदमियाँवर आक्षेप घेतला तर आपल्याला मुस्लीमविरोधी, जातीयवादी ठरवले जाणार, हीच भीती असणार, म्हणूनच संक्रांतीला पतंग उडवू नका, कारण त्यामुळे पक्ष्यांना त्रास होतो, गणपती विसर्जनाला ढोलताशा-डीजे लावू नका, कारण त्याने परिसरातील प्राण्यांना त्रास होतो, होळी-रंगपंचमीला प्राण्यांवर रंग उधळू नका, कारण त्याने प्राण्यांना त्रास होतो, म्हणत प्राणिमित्र, प्राणिप्रेमी संस्था-संघटना थयथयाट करतात. पण, हिंदूंच्या छोट्या-छोट्या कृतीवरून आवाज उठवणार्यांना मुंबईसह देशभरातील गल्लोगल्ली उगवलेल्या मशिदींवरील भोंग्यांचा कर्कश आवाज कधीच ऐकू येत नाही. त्या आवाजाने जवळपासच्या परिसरातील प्राणी-पक्ष्यांना त्रास होतो. पण, त्याविरोधात आवाज उठवण्याची या टोळक्यांची हिंमत होत नाही. त्याच रांगेतले लोक आता स्वतःची सेक्युलर प्रतिमा जपण्यासाठी अहमदमियाँचा कुत्र्यांशी विकृत संबंधाचा प्रकारही शब्द न काढता पचवताना दिसतात. यावरूनच, संबंधितांचे प्राणिमित्रत्व आणि प्राणिप्रेम केवळ ढोंगबाजी असल्याचे समजते, म्हणजेच माणसावरील अन्याय-अत्याचाराकडे, हिंसाचार-दंगलीकडे जसे जात, धर्माच्या चश्म्यातून पाहिले जाते आणि आपल्याला प्रिय जात-धर्मावरील अन्याय-अत्याचाराची बनावट कहाणीही मीठ-मसाला लावून रंगवायची तर आपल्याला अप्रिय जात-धर्मावरील निर्घृणतेवर ‘ब्र’ही काढायचा नाही, हा प्रकार आता प्राण्यांवर कोणत्या जात-धर्मातील व्यक्तीने अन्याय-अत्याचार केला हे पाहून तोंड उघडायचे अथवा नाही, हे ठरवण्यापर्यंत आल्याचे स्पष्ट होते. परिणामी, आताच्या कुत्र्यांवरील कुकृत्याच्या प्रकरणात अहमद शाही जितका विकृत, तितकीच विकृती त्याविरोधात आवाजही न काढणार्या तथाकथित प्राणिमित्र, प्राणिप्रेमी व्यक्ती, संस्था, संघटनांमध्येही ठासून भरल्याचे स्पष्ट होते.
दरम्यान, कुत्र्यांवर अत्याचाराच्या कुकृत्यामुळे पोलिसांनी अहमद शाहीवर भारतीय दंड संहितेतील ‘कलम ३७७’ (अनैसर्गिक अपराध), ‘कलम ४२९’ (सस्तन प्राण्याची हत्या वा पंगू करणे) आणि १९६० सालच्या प्राण्यांविषयी क्रूरता प्रतिबंधक कायद्यातील ‘कलम ११’ अंतर्गत ‘एफआयआर’ नोंदवला. मात्र, भारतीय दंड संहिता मानवी गुन्ह्यांबद्दलच कमालीचा सहिष्णुभाव बाळगते नि त्यामुळे प्राण्यांवरील अन्यायानंतर संबंधिताला कठोरातील कठोर शिक्षा होईलच, असे नाही. कारण, १९६०सालच्या प्राण्यांविषयी क्रूरता प्रतिबंधक कायद्यातील शिक्षेच्या तरतुदी अगदी किरकोळ आहेत नि त्याचीही कितपत अंमलबजावणी होईल, हाही एक प्रश्न आहे. तसेच इथे आरोपी ६८ वर्षांचा वृद्ध आहे, तेव्हा त्याच्या वयाचा दाखला देऊन त्याला मोकाट सोडण्याची मागणीही कोण्या मानवाधिकारवाल्याकडून केली जाऊ शकते. या पार्श्वभूमीवर प्राण्यांविरोधातील अन्याय, हिंसाचारावर निर्बंध आणायचे असल्यास संबंधित कायदा आणखी कडक करायला हवा, त्याची अंमलबजावणी व्हावी, तरच असे प्रकार थांबू शकतील. तोपर्यंत अहमदमियाँसारख्या विकृतांवर लगाम कसता येणार नाही.