राठोडांचा राजीनामा राष्ट्रवादीच्या पथ्थ्यावर!

    01-Mar-2021
Total Views |

sanjay rathod_1 &nbs


'या' नेत्याला मंत्रीपद मिळण्याची शक्यता!

मुंबई: गेले अनेक दिवस संपूर्ण महाराष्ट्रभर चर्चेत असलेल्या पुजा चव्हाण मृत्युप्रकरणी दोषारोप झालेल्या संजय राठोड यांनी अखेर वनमंत्री पदाचा राजीनामा दिला. आणि आता या पदावर कोण विराजमान होणार यासाठी अनेकांमध्ये चढाओढ आणि कुरघोडी सुरु असल्याच्या चर्चा रंगत आहेत. आणि सध्या राठोड यांच्या जागी आता विदर्भातल्या एका नेत्याच्या नावाची जोरदार चर्चा आहे. त्यामुळे आता राठोडांचा राजीनामा राष्ट्रवादीच्या पथ्थ्यावर पडल्याय असं म्हणता येऊ शकते.
 
 
 
 
यवतमाळमधील पुसदचे राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे आमदार इंद्रनील नाईक यांची नियुक्ती होऊ शकते, अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगते आहे. आणि याच संदर्भात बैठकीसाठी सध्या आ.नाईक मुंबईमध्ये असल्याचे सुद्धा वृत्त समोर येत आहे.
 
 
 
 
खरंतर राठोडांनी राजीनामा दिल्यानंतर हे प्रकरण इथेच संपेल असं वाटत असतानाच आता पुजाच्या चुलत आजीने चव्हाण कुटुंबीयांवर खळबळजनक आरोप केले आहेत. संजय राठोड यांनी सदर प्रकरण मिटवण्यासाठी तब्बल ५ कोटी रुपये दिल्याचा थेट आरोप त्यांनी केला आहे. त्यामुळे आता पुजा चव्हाण मृत्युप्रकरण नक्की कोणते वळण घेणार आणि यासगळ्या पुजाला न्याय मिळणार की नाही हा प्रश्न मात्र अनुत्तरीतच राहतो.




अग्रलेख
जरुर वाचा
हिंदू समाजाने जागृत होणे अत्यावश्यक: सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत

हिंदू समाजाने जागृत होणे अत्यावश्यक: सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला 100 वर्षे पूर्ण होतील. संघाचा जन्म, जन्मापासून करावा लागलेला संघर्ष, विस्तार व आज समाजातील सर्वच क्षेत्रांवर संघाचा पडलेला लक्षणीय प्रभाव, या सार्‍या प्रक्रियांबाबत समाजात, राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरही कमालीचे कुतूहल आहे. यांसारख्या विविध विषयांवर ‘ऑर्गनायझर’चे संपादक प्रफुल्ल केतकर, ‘पांचजन्य’चे संपादक हितेश शंकर, सा. ‘विवेक’च्या संपादक अश्विनी मयेकर आणि मल्याळम दैनिक ‘जन्मभूमी’चे सहसंपादक एम. बालकृष्णन यांनी सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत यांच्याशी साधलेला हा विशेष संवाद.....

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121