अफगाणिस्तानच्या मुद्यावरुन अजित डोवालांचे 'या' देशांसोबत खलबतं

    10-Nov-2021
Total Views | 145
ajit doval _1  


नवी दिल्ली -
राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार (एनएसए) अजित डोवाल यांनी बुधवारी (10 नोव्हेंबर 2021) दिल्लीमध्ये अफगाणिस्तानच्या अनुषंगाने असणाऱ्या संकटाबाबत सात देशांच्या राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांसोबत बैठक घेतली. रशिया, इराण, कझाकिस्तान, किर्गिस्तान, ताजिकिस्तान, तुर्कमेनिस्तान आणि उझबेकिस्तानच्या राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांनी अफगाणिस्तानवरील दिल्ली येथील प्रादेशिक सुरक्षा संवादात भाग घेतला.


या बैठकीनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सात देशांच्या राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांची भेट घेतली. बैठकीत अजित डोवाल म्हणाले की, अफगाणिस्तानमधील घडामोडींचा केवळ तेथे राहणार्‍या लोकांवरच नाही तर त्याच्या शेजारी देशांवर आणि प्रदेशासाठी देखील महत्त्वपूर्ण परिणाम आहेत. बैठक सुरू होण्यापूर्वी डोवाल यांनी सात देशांसोबतची ही चर्चा फलदायी ठरेल, अशी आशा व्यक्त केली. ते म्हणाले, “आमच्यामध्ये अफगाणिस्तानच्या मुद्याबाबत चर्चा करण्याची वेळ आली आहे. मला खात्री आहे की आमच्या चर्चेमुळे अफगाण लोकांना मदत होईल आणि आमची सामूहिक सुरक्षा वाढेल.”
 
 
तालिबानने काबूलवर ताबा घेतल्यानंतर दहशतवाद, अतिरेकी आणि अंमली पदार्थांची तस्करी या वाढत्या धोक्यांचा सामना करण्यासाठी व्यावहारिक सहकार्यासाठी एक समान दृष्टीकोन मजबूत करण्याच्या उद्देशाने भारताने या बैठकीचे आयोजन केले. या महत्त्वाच्या बैठकीसाठी भारताने पाकिस्तान आणि चीनलाही निमंत्रित केले होते, मात्र दोन्ही देशांनी त्यात सहभागी होण्यास नकार दिल्याचे सांगण्यात येत आहे. पूर्वनियोजित कार्यक्रम पाहता चीनने या बैठकीत सहभागी न होण्याचे कारण दिले आहे. दुसरीकडे, पाकिस्तानने अफगाणिस्तानबद्दल भारताच्या "नकारात्मक वृत्ती"ला जबाबदार धरले आणि बैठक वगळण्याचा निर्णय घेतला.
अग्रलेख
जरुर वाचा
मोदी सरकारवरील विश्वासामुळे भारताचे भांडवली बाजारमुल्य ७४ लाख कोटींवर!

मोदी सरकारवरील विश्वासामुळे भारताचे भांडवली बाजारमुल्य ७४ लाख कोटींवर!

“भारताचे भांडवली बाजारमुल्य सहापटींनी वाढून ११ वर्षांत ७४ लाख कोटी रुपये इतके झाले. भारतावर मोदी सरकारच्या काळात अधिक दृढ झालेल्या विश्वासामुळे हे शक्य झाले.”, असे वक्तव्य एनएससीचे सीईओ आणि व्यवस्थापकीय संचालक आशिषकुमार चौहान यांनी केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मांडलेल्या ‘विकसित भारत २०४७’ या दृष्टीकोनातून भांडवली बाजाराची भूमिका अधोरेखित व्हावी या उद्देशाने विकसित भारताचा मार्ग आणि भांडवली बाजाराचे योगदान या विषयावर दि. ९ जून रोजी नवी दिल्ली येथे विशेष चर्चासत्र आयोजित करण्यात आले होते. तेव्हा ते ..

आ. राजन नाईक यांची सहकार राज्यमंत्र्यांकडे नवीन उपनिबंधक कार्यालयाची मागणी

आ. राजन नाईक यांची सहकार राज्यमंत्र्यांकडे नवीन उपनिबंधक कार्यालयाची मागणी

तालुक्याची लोकसंख्या जवळपास 30 लाखाच्या आसपास आहे, त्यानुसार या भागात जवळपास आठ हजार पेक्षा जास्त गृहनिर्माण संस्था, १५ पत पेढ्या, 3 नागरी सहकारी बँका, १९ सेवा संस्था व १ बाजार समिती आहेत. परंतु वसई तालुक्यात एकच उपनिबंधक कार्यालय असल्यामुळे, नागरिकांना विविध कामांसाठी किंवा तक्रारीचे निवारण करण्यासाठी वसई येथील उपनिबंधक कार्यालयात अनेकदा हेलपाटे मारावे लागतात, यामुळे नागरिकांची वेळ व पैसे दोन्ही खर्च होतात. त्यामुळे नालासोपाराचे आमदार राजन नाईक यांनी मंगळवार दिनांक १० जून रोजी महाराष्ट्र सरकारचे सहकार ..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121