निवासी डॉक्टरांनी रुग्णांना जीवदान देऊन मोलाचे कार्य केले – राज्यपाल भगत सिंह कोश्यारी

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    06-Jan-2021
Total Views |

bhagatsing koshyari_1&nbs




राजभवन येथे राज्यातील ५० निवासी डॉक्टरांचा सत्कार



मुंबई: कोरोना संक्रमण काळात राज्यातील निवासी डॉक्टरांनी कोरोना रुग्णांना सामोरे जात त्यांची सेवा करण्याचे मोलाचे कार्य केले असल्याचे गौरोद्गार राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी काढले. महाराष्ट्र निवासी डॉक्टर्स राज्यव्यापी संघटना (मार्ड) च्या वतीने राजभवन येथे राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांच्या हस्ते राज्यातील ५० निवासी डॉक्टरांचा कोरोना काळातील उल्लेखनीय कार्याबद्दल प्रातिनिधीक स्वरूपात सत्कार करण्यात आला.


राज्यपाल श्री.कोश्यारी म्हणाले, ज्यावेळी आपण रुग्णांची सेवा करता त्यावेळी रुग्ण मनापासून आपल्याला आशिर्वाद देतात. रुग्णांकरिता डॉक्टर देवदूत असतात. सर्व निवासी डॉक्टरांनी ध्येय, समर्पण भाव व निष्ठेने कार्य केले म्हणूनच देशातील कोरोना संसर्ग नियंत्रणात आला. तसेच 'नव्या कोरोना विषाणू'वर देखील आपण निश्चितपणे विजय मिळवू, असा आशावाद यावेळी राज्यपालांनी व्यक्त केला.

सदर कार्यक्रमासाठी उपस्थित वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचालक डॉ. तात्याराव लहाने यांनी सांगितले की, "कोरोना काळात स्वतःचा जीव धोक्यात टाकून रुग्णांना सेवा देणारे निवासी डॉक्टर्स सच्चे कोरोना योद्धे आहेत. निवासी डॉक्टरांनी पीपीई कीट घालून अतिदक्षता विभागात रुग्णांजवळ बसून रुग्णांची सेवा केली. आवाहनाला प्रतिसाद देत संपूर्ण कोरोना काळात मार्डच्या निवासी डॉक्टरांनी संप न करून शासनाला सहकार्य केले. मार्डचे अध्यक्ष डॉ.राहुल वाघ यांनी प्रास्ताविक केले.

@@AUTHORINFO_V1@@