एकता कपूरविरोधात पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर सन्मान आंदोलन

    07-Sep-2020
Total Views | 103
Vikas Mahatme Ekta Kapoor
 
 
 
मुंबई : पुण्यश्लोक राजमाता अहिल्याबाई होळकर यांचे नाव ‘व्हर्जिन भास्कर’ वेबसिरीजमध्ये चुकीच्या प्रकारे वापरल्या प्रकरणी तीव्र आंदोलन करण्याचा इशारा भाजप खासदार डॉ. विकास महात्मे यांनी दिला आहे. या प्रकरणी केंद्रीय प्रसारणमंत्री प्रकाश जावडेकर यांच्याकडे तक्रार करण्यात आली आहे. या वेबसिरीजमध्ये एका महिला वसतीगृहात सुरू असलेल्या सेक्स सँण्डल दाखवण्यात आले आहे. या वसतीगृहाला देण्यात आलेल्या नावावरून आक्षेप घेण्यात आला आहे. केवळ धनगर समाजच नव्हे तर पुण्यश्लोक अहिल्याबाई यांना मानणाऱ्या सर्व अनुयायांच्या भावना दुखावल्या असून या प्रकरणी तातडीने कारवाई करावी, अशी मागणी केली आहे.
 

 
 
एकता कपूर हीने या प्रकरणी जाहीर माफी मागावी, अशी मागणीही त्यांनी केली आहे. बुधवारी दि. ९ सप्टेंबर रोजी एकता कपूर विरोधात सोशल डिस्टंसिंगचे नियम पाळून आंदोलन करणार असल्याचा इशारा त्यांनी दिला आहे. या वेबसिरीजचे चित्रिकरण तातडीने थांबवले जावे, अशी मागणीही त्यांनी केली आहे. पत्रासह या व्हीडओची लिंक आणि फोटोही जोडले आहेत. यापूर्वीही एकता कपूरच्या ‘XXX’ या वेबसिरीजविरोधात तीव्र संताप व्यक्त करण्यात आला होता. हिंदुस्थानी भाऊ म्हणजेच विश्वास पाठक यांनी या प्रकरणी कायदेशीर कारवाईची मागणी केली होती.

अग्रलेख
जरुर वाचा
मोदी सरकारवरील विश्वासामुळे भारताचे भांडवली बाजारमुल्य ७४ लाख कोटींवर!

मोदी सरकारवरील विश्वासामुळे भारताचे भांडवली बाजारमुल्य ७४ लाख कोटींवर!

“भारताचे भांडवली बाजारमुल्य सहापटींनी वाढून ११ वर्षांत ७४ लाख कोटी रुपये इतके झाले. भारतावर मोदी सरकारच्या काळात अधिक दृढ झालेल्या विश्वासामुळे हे शक्य झाले.”, असे वक्तव्य एनएससीचे सीईओ आणि व्यवस्थापकीय संचालक आशिषकुमार चौहान यांनी केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मांडलेल्या ‘विकसित भारत २०४७’ या दृष्टीकोनातून भांडवली बाजाराची भूमिका अधोरेखित व्हावी या उद्देशाने विकसित भारताचा मार्ग आणि भांडवली बाजाराचे योगदान या विषयावर दि. ९ जून रोजी नवी दिल्ली येथे विशेष चर्चासत्र आयोजित करण्यात आले होते. तेव्हा ते ..

आ. राजन नाईक यांची सहकार राज्यमंत्र्यांकडे नवीन उपनिबंधक कार्यालयाची मागणी

आ. राजन नाईक यांची सहकार राज्यमंत्र्यांकडे नवीन उपनिबंधक कार्यालयाची मागणी

तालुक्याची लोकसंख्या जवळपास 30 लाखाच्या आसपास आहे, त्यानुसार या भागात जवळपास आठ हजार पेक्षा जास्त गृहनिर्माण संस्था, १५ पत पेढ्या, 3 नागरी सहकारी बँका, १९ सेवा संस्था व १ बाजार समिती आहेत. परंतु वसई तालुक्यात एकच उपनिबंधक कार्यालय असल्यामुळे, नागरिकांना विविध कामांसाठी किंवा तक्रारीचे निवारण करण्यासाठी वसई येथील उपनिबंधक कार्यालयात अनेकदा हेलपाटे मारावे लागतात, यामुळे नागरिकांची वेळ व पैसे दोन्ही खर्च होतात. त्यामुळे नालासोपाराचे आमदार राजन नाईक यांनी मंगळवार दिनांक १० जून रोजी महाराष्ट्र सरकारचे सहकार ..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121