लोकलने प्रवास केलात तर कायदेशीर कारवाई

    20-Sep-2020
Total Views | 36

Railway_1  H x


मनसेच्या आंदोलनाला काही तास उरले असतानाच पोलिसांनी मनसे नेत्यांवर कारवाई करण्यासाठी पावले उचलली आहेत
.



मुंबई :
कोरोना संसर्गाच्या वाढत्या फैलावाच्या पार्श्वभूमीवर बंद करण्यात आलेली मुंबईतील उपनगरीय लोकलसेवा सर्वसामान्यांसाठी अद्यापही सुरू झालेली नाही. लोकलसेवा बंद असल्याने कामावर जाणाऱ्या कर्मचाऱ्यांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे, त्या पार्श्वभूमीवर कामावर जाणाऱ्यांना लोकल प्रवासाची मुभा द्या अन्यथा सोमवार २१ सप्टेंबर रोजी सविनय कायदेभंग आंदोलन करत लोकल प्रवास करू, असा इशारा मनसेने दिला आहे. मात्र, मनसेच्या आंदोलनाला काही तास उरले असतानाच पोलिसांनी मनसे नेत्यांवर कारवाईचा बडगा उचलला आहे. तसेच आंदोलनाची हाक देणारे मनसे नेते संदीप देशपांडे यांना पोलिसांनी नोटिस बजावली आहे.

दरम्यान, काही दिवसांपूर्वी बेस्ट बसमध्ये होणाऱ्या गर्दीचा व्हिडीओ ट्वीट करत संदीप देशपांडे यांनी ठाकरे सरकारला सवाल केला होता. लोकल सुरु न केल्यास सविनय कायदेभंग करण्याचा इशारा मनसेने दिला होता.“बसच्या गर्दीत कोरोना होत नाही, पण रेल्वेच्या गर्दीत होतो, असा सरकारचा समज आहे का??” असा प्रश्न संदीप देशपांडे यांनी विचारला आहे. खचाखच गर्दीने भरलेल्या बसचा व्हिडीओ शेअर करत त्यांनी हा मुद्दा उपस्थित केला आहे.लोकल लवकर सुरु करा अशी मागणी विशेषतः उपनगरात राहून दररोज कार्यालयासाठी मुंबईपर्यंत प्रवास करावा लागणाऱ्या नागरिकांकडून होत आहे. हीच मागणी उचलून धरत “रेल्वे सेवा सुरु करा, अन्यथा सविनय कायदेभंग करावा लागेल” असा इशारा संदीप देशपांडे यांनी बसमधील गर्दीचा आणखी एक व्हिडीओ शेअर करत दिला आहे. दरम्यान, मनसे आमदार राजू पाटील यांनीही कामासाठी घराबाहेर पडणाऱ्या सर्वसामन्यांना लोकल प्रवासाची परवानगी मिळावी, अशी मागणी केली होती.a
अग्रलेख
जरुर वाचा
हिंदू समाजाने जागृत होणे अत्यावश्यक: सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत

हिंदू समाजाने जागृत होणे अत्यावश्यक: सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला 100 वर्षे पूर्ण होतील. संघाचा जन्म, जन्मापासून करावा लागलेला संघर्ष, विस्तार व आज समाजातील सर्वच क्षेत्रांवर संघाचा पडलेला लक्षणीय प्रभाव, या सार्‍या प्रक्रियांबाबत समाजात, राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरही कमालीचे कुतूहल आहे. यांसारख्या विविध विषयांवर ‘ऑर्गनायझर’चे संपादक प्रफुल्ल केतकर, ‘पांचजन्य’चे संपादक हितेश शंकर, सा. ‘विवेक’च्या संपादक अश्विनी मयेकर आणि मल्याळम दैनिक ‘जन्मभूमी’चे सहसंपादक एम. बालकृष्णन यांनी सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत यांच्याशी साधलेला हा विशेष संवाद.....

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121