वसई-विरारमध्ये ‘भारत बंद’ला संमिश्र प्रतिसाद

    08-Dec-2020
Total Views | 73


दुकानं_1  H x W






दुध व्यवसाय
, भाजी मार्केट व इतर दुकाने स्वेच्छेने सुरूच



मुंबई: शेतकऱ्यांच्या कृषी कायद्याविरोधात पुकारण्यात आलेल्या भारत बंदला वसई- विरार मधून संमिश्र प्रतिसाद पाहायला मिळत असून शहरातील सर्व व्यवहार सुरळीत ठेवण्यात आलेले आहेत. आज सकाळपासून शहरातील सर्व व्यवहार सुरळीत सुरू असून, शहरातील काही दुकाने बंद तर काही दुकाने दुकानदारांनी स्वेच्छेने सुरू ठेवली आहेत. तसेच रस्तेवाहतूकही सुरळीत असून इतरही सर्व आवश्यक बाबी सुरूच आहेत.

 
 

देशात विविध ठिकाणी पुकारलेला बंद आजच्या एका दिवसापुरताचं असला तरी भाजीपाला व दुध व्यवसायावरसुद्धा याचा फारसा परिणाम झालेला आढळून आलेला नाही. वसईच्या ग्रामीण भागातही बंदला अगदीच कमी प्रमाणत प्रतिसाद पाहायला मिळाला मात्र कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी शहरात पोलिसांचा मात्र चोख बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.

 
 

सध्या देशातलं वातावरण शेतकरी आंदोलनावरून प्रचंड तापलेलं आहे. आणि अशातच काही पक्षांनी भारत बंद चे आवाहन केले होते. अनेक ठिकाणी या ‘बंद’वरून संमिश्र प्रतिक्रिया उमटताना दिसत आहे. शेतकरी आंदोलन हळूहळू आता राजकीय वळण घेताना दिसत आहे. तरीही लाखांचा पोशिंदा असणाऱ्या शेतकऱ्यांचे प्रश्न लवकर सुटण्याची आशा सर्वत्र व्यक्त होत आहे.

अग्रलेख
जरुर वाचा
इराणचा इस्रायलवर पलटवार! तेल अवीव, जेरुसलेमसह अनेक शहरांवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे

इराणचा इस्रायलवर पलटवार! तेल अवीव, जेरुसलेमसह अनेक शहरांवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे

(Iran Strikes 150 Missiles on Israel) इस्रायलने शुक्रवारी दि. १३ जून रोजी पहाटे इराणवर हवाई हल्ला केल्यानंतर रात्री इराणनेही इस्रायलवर मोठा हल्ला करत चोख प्रत्युत्तर दिले आहे. इराणने या हल्ल्यात इस्रायलमधील अनेक शहरांवर शेकडो बॅलिस्टिक क्षेपणास्त्रे डागली. इराणने या प्रत्युत्तरात्मक कारवाईला 'ऑपरेशन ट्रू प्रॉमिस 3' असे नाव दिले आहे. यामध्ये प्रामुख्याने तेल अवीव व जेरुसलेम या दोन मोठ्या शहरांना लक्ष्य करण्यात आले आहे. इराणी लष्कराने इस्रायलवर १५० हून अधिक क्षेपणास्त्रे डागल्याचे वृत्त इस्रायलमधील एका वृत्तप..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121