रा.जि.प.सीईओ.डॉ.किरण पाटील यांच्या उपस्थितीत झाले लोकार्पण
रायगड: काराव-गडब या ग्रामपंचायत हद्दीतली डोंगरावर वसलेली 'सुळे वाडी' गेल्या चार पिढ्यांपासून मुलभूत सुविधांपासून पासुन वंचित आहे. संपूर्ण जग एकविसाव्या शतकात प्रगतीची पावले अतिशय वेगात टाकत आहे. परंतु 'सुळे वाडी' मात्र मुलभूत सुविधांपासून मात्र अजूनही वंचित होते.
'राष्ट्रीय हितसंवर्धन मंडळ' यांच्या प्रयत्नातून सेवार्धिनी पुणे, ग्राम उर्जा प्रकल्प पुणे यांच्या माध्यमातून आणि ग्रामस्थांच्या सहभागातून सौरऊर्जा प्रकल्प उभारला गेला. या प्रकल्पाचा लोकार्पण सोहळा दि २८/१२/२०२०रोजी पार पडला. तब्बल चार पिढ्यानंतर ही मुलभूत सुविधा सगळ्यांसाठी उपलब्ध झाल्यामुळे रहिवासी सुद्धा अतिशय आनंदात होते.
सदर कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून,रायगड जिल्हा परिषद सीईओ मा.डॉ.किरण पाटील साहेब , जिल्हा नियोजन समिती अधिकारी मा.जयवंत गायकवाड साहेब, जिल्हा परिषद सदस्य मा.प्रभाकर म्हात्रे साहेब,गटविकास अधिकारी मा.चंद्रकात पाटील साहेब, मा. सरपंच सौ.अर्चनाताई तुळशीदास कोठेकर(काराव- गडब ग्रामपंचायत), रा. स्व. संघाचे कुलाबा जिल्हा संघचालक मा.रघुजीराजे आंग्रे,सेवावर्धिनी, कार्यवाह मा.नाना पटवर्धन,ग्राम उर्जा प्रकल्प किरण आवटी सर, अहिल्या महिला मंडळ अध्यक्ष सौ.अश्विनीताई गाडगीळ ,भाजप जिल्हा उपाध्यक्ष , विरोधीपक्ष नेते (रा.जि.प) वैकुंठशेठ पाटील हेसुद्धा उपस्थित होते.