अपघातात २० जण जखमी; ५ जणांची प्रकृती गंभीर
मुंबई : मुंबई-भुवनेश्वर लोकमान्य टिळक एक्स्प्रेस रुळावरून घसरून झालेल्या अपघातात २० हून अधिक प्रवासी जखमी झाले आहेत. यातील पाच जखमींची प्रकृती चिंताजनक आहे. सालागाव-निरगुंडी स्थानकांदरम्यान हा सकाळी सातच्या सुमारास हा अपघात झाला.
दाट धुक्यामुळे मार्ग भरकटून लोकमान्य टिळक एक्स्प्रेस (गाडी क्रमांक १२८७९) एका मालगाडीला धडकल्यामुळे हा अपघात घडला आहे. या धडकेनंतर गाडीचे सात डबे रुळावरून घसरले. त्यात अनेक जण जखमी झाले. घटनेची माहिती मिळताच रेल्वे प्रशासनानं मदत व बचावकार्य हाती घेतले आहे. जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात येत आहे. मात्र, धुक्यामुळे मदतकार्यात अडथळे येत आहेत.