संरक्षण क्षेत्रात ‘मेक इन इंडिया’ अंतर्गत खासगी उद्योगांनी सहभाग वाढवावा : राजनाथ सिंह

    21-Aug-2019
Total Views | 23


 

संरक्षण क्षेत्रातल्या शस्त्रास्त्र आणि उपकरणांबाबत परदेशी उत्पादकांवर अवलंबून राहणं कमी करून देशी बनावटीच्या संरक्षण आयुधांचा वापर वाढवायला हवा, असे प्रतिपादन संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी केले. नवी दिल्लीत आज भारतीय हवाई दलाच्या आधुनिकीकरण आणि देशीकरणाच्या योजना या विषयावर आयोजित चर्चासत्राचे उद्‌घाटन केल्यानंतर ते बोलत होते. संरक्षण क्षेत्रासाठी सरकारने जाहीर केलेल्या धोरणांचा लाभ खासगी उद्योगांनी घ्यावा, असे सांगत संरक्षण सेवा, संरक्षण सार्वजनिक क्षेत्र आणि आयुध निर्माण मंडळासोबत चर्चा करून त्यांना आवश्यक ती आयुधं पुरवावीत, असे आवाहन त्यांनी केले. संरक्षण क्षेत्रात भारतीय उद्योगांच्या विकासात येणारे सर्व अडथळे दूर करण्यासाठी सरकार कटिबद्ध आहे, असा पुनरुच्चार त्यांनी केला. मात्र, उद्योगांनी छोटे फायदे न बघता दीर्घकालीन लाभांसाठी गुंतवणूक करावी, अशी सूचना त्यांनी केली.

भारतीय हवाई दल तंत्रज्ञानदृष्ट्या अत्यंत आधुनिक असल्याचे ते म्हणाले. अलीकडच्या काळात दहशतवादविरोधी कारवायांद्वारे देशाच्या सर्वच सैन्य दलांची सिद्धता स्पष्ट झाली आहे, असे ते म्हणाले. संरक्षण दलांच्या आधुनिकीकरणाची गरज असून त्यासाठी 'मेक इन इंडिया' अंतर्गत खासगी क्षेत्रांनी पुढे यावे, असे ते म्हणाले. सरकारने संरक्षण क्षेत्रात थेट परदेशी गुंतवणूक वाढवली आहे. याचा लाभ घेत परदेशी कंपन्यांनी भारतात येऊन कंपन्या सुरू कराव्यात, असे राजनाथ सिंह म्हणाले. संरक्षण उत्पादनासाठी आवश्यक असलेल्या गुणवत्ता मानकांच्या चाचणीसाठी खासगी क्षेत्रांना सरकारी चाचण्यांच्या सुविधा वापरता येतील, अशी घोषणाही राजनाथ सिंह यांनी यावेळी केली.

अग्रलेख
जरुर वाचा
लेखक जयेश मेस्त्री ’संत गाडगे महाराज बाल साहित्य पुरस्कार २०२५’ने सन्मानित!

लेखक जयेश मेस्त्री ’संत गाडगे महाराज बाल साहित्य पुरस्कार २०२५’ने सन्मानित!

संत गाडगे महाराज विचार मंच महाराष्ट्र राज्य आणि ज्ञानज्योत फाऊंडेशन महाराष्ट्र यांच्या वतीने देण्यात येणारा ’संत गाडगे महाराज बाल साहित्य पुरस्कार २०२५’ या वर्षी लेखक, साहित्यिक जयेश मेस्त्री यांना प्राप्त झाला आहे. दरवर्षी प्रमाणे या वर्षी देखील साहित्य क्षेत्रात उत्तम कामगिरी करणार्‍या साहित्यिकांचा गौरव करण्यात आला. दिनांक ०७ जून २०२५ रोजी पुणे येथील सदाशिव पेठेतील वेदशास्त्रोत्तेजक सभागृह येथे हा सुंदर सोहळा पार पडला. या प्रसंगी प्रसिद्ध उद्योजक डॉ. रामदास कुटे हे उद्घाटक म्हणून उपस्थित होते. तसेच ..

साताऱ्याच्या मातीत बहरणार ९९ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन!

साताऱ्याच्या मातीत बहरणार ९९ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन!

: मराठी साहित्यातील प्रतिष्ठीत मानल्या जाणाऱ्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनचा ९९ व्या सोहळा आगामी वर्षात साताऱ्यात पार पडणार आहे. ९९ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन आयोजन करण्याचा मान साताऱ्यातील महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या शाहूपुरी शाखेला आणि मावळा फौंडेशनला मिळणार आहे.अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाच्या पुणे येथे झालेल्या बैठकीत हा निर्णय एकमताने घेण्यात आला. अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे अध्यक्ष मिलिंद जोशी, उपाध्यक्ष गुरुय्या स्वामी, कार्यवाह सुनिताराजे पवार, कोषाध्यक्ष विनोद ..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121