कलम '३५ ए' वरून वातावरण तापलं : काश्मिरमध्ये २८ हजार जवान तैनात

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    02-Aug-2019
Total Views |


 


श्रीनगर : जम्मू काश्मीरमध्ये कलम ३५ ए आणि कलम ३७० या मुद्द्यांवरून राजकीय वातावरण तापत असताना काश्मीर खोऱ्यात सुरक्षा यंत्रणेच्या २८० अतिरिक्त तुकड्या तैनात करण्यात आल्या आहेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार श्रीनगरमधील अतिसंवेदनशील परिसरात एकूण २८ हजार सीआरपीएफचे जवान तैनात केले आहेत. यात सीआरपीएफच्या जवानांचा मोठ्या प्रमाणात समावेश आहे. गुरुवारी रात्री अचानक काश्मीर खोऱ्यातील सुरक्षा कडक करण्यात आली आहे.

 

या कारणामुळे अतिरिक्त फौजफाटा

जवानांच्या २८० तुकड्या या परिसरात तैनात करण्यात आल्या आहेत. शहरात प्रवेश करण्यापासून ते बाहेर जाण्याच्या सर्व रस्त्यांवर सीआरपीएफ जवानांनी चोख बंदोबस्त ठेवला आहे. या परिस्थितीमुळे स्थानिकांनीही आवश्यक वस्तूंची खरेदी करण्यास सुरुवात केली. परदेशी दहशतवादी पोलीस कर्मचाऱ्यांना निशाना बनवू शकतात अशी माहिती गुप्तचर यंत्रणांना मिळाली होती. त्यामुळे या हालचालींना वेग आला आहे.

 

मेहबूबा मुफ्तींचा विरोध 

राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांनी काश्मीर दौऱ्यावरुन परतल्यानंतर दहा हजार अतिरिक्त जवान काश्मीरमध्ये तैनात केले. कायदा आणि सुव्यवस्था बिघडू नये यासाठी केंद्र सरकारकडून विशेष खबरदारी घेतली जात आहे. कलम ३५ ए हटविण्यावरुन काश्मीरमध्ये वातावरण तापत होते. कलम ३५ ए हटविणे हा राजकीय तिढा आहे, या समस्येचं निरसन लष्करी सैन्य करु शकत नाही, असे काश्मिरच्या माजी मुख्यमंत्री मेहबूबा मुफ्ती यांनी म्हणत मोदी सरकारला विरोध केला आहे.

 

देशातील विविध भागातील सीआरपीएफचे जवान आता काश्मीरमध्ये तैनात करण्यात आले आहेत. फेब्रुवारी रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काश्मीर खोऱ्यात दौरा केल्यानंतर गिलानी, मीरवाइज आणि जेकेएलएफचा मुख्य यासीन मलिक यांच्या संघटनांनी बंद पुकारला होता. १० सप्टेंबर २०१७ रोजी तत्कालीन केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांच्याकडून काश्मीर दौरा करण्यात आला. त्यावेळीही असाच विरोधा झाला मात्र, गृहमंत्री अमित शहा यांच्या दौऱ्यावेळी असे काही घडले नाही. काश्मीरमधील कलम ३७० हटविण्यावरही केंद्र सरकार विचार करत आहे. फारुख अब्दुला यांनी याला विरोध केला होता.

 

हेही वाचा - अग्रलेख : मोठ्या लढाईची तयारी?



@@AUTHORINFO_V1@@