२०२२ राष्ट्रकुल स्पर्धेत नेमबाजी नाहीच...

    14-Aug-2019
Total Views | 24



नेमबाजीऐवजी महिला टी-२०चा थरार

 

नवी दिल्ली : २०२२मध्ये बर्मिंगहॅम येथे होणाऱ्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेमध्ये नेमबाजीचा समावेश करणार नसल्याचे राष्ट्रकुल महासंघाने स्पष्ट केले आहे. नेमबाजीच्या जागी महिला टी-२० क्रिकेटचा मात्र समावेश करण्यात आला आहे. बर्मिंगहॅम येथील ही क्रीडा स्पर्धा २७ जुलै ते ७ ऑगस्ट २०२२ या कालावधीत होणार आहे.

 

राष्ट्रकुल महासंघाच्या अध्यक्षा लुईसी मार्टिन यांनी सांगितले की, "नेमबाजी हा राष्ट्रकुल स्पर्धेचा कधीही कायम खेळ नव्हता. आम्ही त्याबद्दल विचार जरूर केला पण या स्पर्धेत त्याचा समावेश करणे शक्य नाही. आमच्याकडे जागा शिल्लक नाही."

 

भारताने घेतला होता आक्षेप

 

२०२२मध्ये राष्ट्रकुल स्पर्धेतून नेमबाजी वगळणार असल्याचे वृत्त कळताच भारतीय ऑलिम्पिक संघटनेने यावर निराशा व्यक्त केलेली. त्यानंतर भारताने या स्पर्धेवरच बहिष्कार घालणार असल्याचे सांगितले होते. क्रीडा मंत्री किरण रिजिजू यांच्याकडेही यासंदर्भात पत्र पाठवून बहिष्कारासाठी सरकारची मान्यता मिळविण्याचा प्रयत्न करण्यात आला.

अग्रलेख
जरुर वाचा
धर्मांतराची सवलत नाही - बाबासाहेबांच्या आरक्षणाचा अपमान थांबवाच!

धर्मांतराची सवलत नाही - बाबासाहेबांच्या आरक्षणाचा अपमान थांबवाच!

धर्मांतराच्या जाळ्यात नुकताच ऋतुजा राजगेसारख्या गर्भवती, सुशिक्षित युवतीचा दुर्दैवी अंत झाला. तिच्या श्रद्धेचा, संस्कृतीचा आणि स्वाभिमानाचा छळ करण्यात आला. या घटनेनंतर आता तरी आरक्षणाचा लाभ घेणार्‍या समाजाला जागं होणं अत्यावश्यक आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेली आरक्षण व्यवस्था धर्मांतरासाठी नव्हे, तर सामाजिक न्यायासाठी होती. शतकानुशतके शोषित राहिलेल्या घटकांना सन्मानाने उभं राहता यावं म्हणून होती. मात्र, आज जिहादी आणि ख्रिस्ती मिशनरी वृत्तीने प्रेरित झालेल्या धर्मांतरितांकडून, या व्यवस्थेचा दुरुपयोग ..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121