गेल्या वर्षी ईदच्या सुट्टीनिमित्त घरी जात असताना औरंगजेब या भारतीय जवानाचे दहशतवाद्यांनी अपहरण केले आणि त्याची हत्या केली होती. औरंगजेब ४४ राष्ट्रीय रायफल्ससोबत शोपियनमध्ये तैनात होते. काश्मीरच्या शोपियन जिल्ह्यात त्याची पोस्टिंग होती. जवान औरंगजेबचा मृतदेह पुलवामाच्या गुस्सूमध्ये सापडला होता. औरंगजेबच्या डोक्यावर आणि मानेवर गोळी मारली होती. औरंगजेब यांचे पार्थिव १४ जून २०१८ ला पोलिसांच्या हाती लागला होता. औरंगजेबच्या हत्येनंतर संरक्षणमंत्री निर्मला सीतारामण आणि लष्कर प्रमुख बिपीन रावत औरंगजेबच्या कुटुंबियाना भेटण्यासाठी घरी गेले होते. शहीद जवान औरंगजेब यांना भारत सरकारने वीरता पुरस्कार शौर्य च्रकाने सन्मानित केले होते.
अभिमानास्पद बाब ही की शहीद जवान औरंगजेबच्या दोन्ही भावांनी भारतीय लष्करात जाण्याचा निर्णय घेतला आणि शहीद भावाकडून प्रेरणा घेऊन ते लष्करी सेवेत रुजू झाले आहेत. या दोघांच्या आई वडिलांनी आपल्या मुलांच्या निर्णयाचे कौतुक केले आहे. त्याचप्रमाणे अवघ्या देशाला अभिमान वाटेल अशीच ही या दोघांची कृती आहे.